Wednesday, 25 November 2015

गांधी तुमचा देश असहिष्णू झाला …



        असहिष्णुता आणि सहिष्णुता ह्या दोन शब्दांचा अर्थ भारतीयांनी फक्त पुस्तकात वाचला असावा त्यानंतर सोशल मिडीयावर . कारण काबाड कष्ट करून , सोशल मिडीयावर जास्त विश्वास ठेवणाऱ्या बऱ्याच भारतीय बंधूना असहिष्णुता आणि सहिष्णुता म्हणजे नक्की काय हे माहित ही  नसेल .  पण गेल्या काही महिन्यापासून हे दोन शब्दांनी चांगलाच रंग घेतलाय . भारताचे पंतप्रधान मोदी ह्यांचा विरोध करणारा तसेच एका वयस्कर सुरक्षा रक्षकाला धक्का बुक्की करणारे शारुख खान पी के ह्या चित्रपटातून फक्त आणि फक्त हिंदू दोष दाखून देणारे आमिर खान ह्यांना तुमचा देश असहिष्णु  असुरक्षित वाटू लागला आहे . म्हणून तर दोघांनी ही हा देश सोडून जाऊ अशी इच्छा तमाम भारतीयान समोर मांडलीय ( आमिर खान पत्नीच्या सांगण्यावरून ). मत मांडण हे चुकीच नाहीय घटनेत हा अधिकार सर्वाना दिलाय . सर्वाना आपल मत मांडून व्यक्ती स्वातंत्र चा हक्क आहे मग जर शारुख आणि आमिर ला देश सोडून जायच असेल तर त्याने  नक्की जावे . कारण ईतर देशापेक्षा , भारत हा  कितीतरी पटीने सहिष्णु आहे . सर्वधर्म समभाव हा ह्याच देशात मिळेल ईतर देशात धार्मिक कट्टरता ची बातम्या आपण पाहतच असतो . बघा ना सीमेवरील  शहीद कर्नल संतोष महाडिक पेक्ष्या आमिर आणि शारुख महत्वाचा झालाय , कारण त्याने भारताला ,, हिंसेचा विरोध करणाऱ्या महात्मा गांधींच्या देशाला असहिष्णू ठरवलंय . राग तर येणारच .. स्वतंत्र पूर्व स्वतंत्र मिळाल्यानंतर ही आम्ही किती लढे दिले किती सहन केल पण भारताच्या अस्मितेला धक्का लावून दिला नाही . अफगाणिस्तान पासून कितीतरी परकीयांनी आमच्या वर आक्रमणे केलीत पण आम्ही लढलो पण देश सोडला नाही  , पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या देशांना जन्म दिला इथल्या हिंदुना वार्यावर सोडून तिथल्या लोकांना आश्रय दिला पण देश सोडला नाही . साहेबाच्या देशात जावून उच्च शिक्षण घेवून इथे लढा देणाऱ्या आमचे महात्मा गांधी बाबसाहेब आंबेडकर ह्यांना कळणार तर कसे . त्या काळात असहिष्णू ता जितकी होती तितकी आता आहे का ह्याचा वैचारिक विचार कार्याला शुटींग मधून वेळ तरी मिळाल पाहिजे .
        १९९३ पासून ते २०११ पर्यंतच्या सर्व बॉम्बस्फोटात एक तरी सिलेब्रेटी ला आपला प्राण गमवाव लागल आहे का ? ह्या देशाला  कोणी ही विरोध करू शकतो पण त्यावर कारवाई झालीय का ? इतका सहिष्णू व सुरक्षा  इतर देशात असेल तर नक्क्की च हा देश सोडून त्या देशात  जाण्यातच शहाणपण आहे . ह्या देशावर भाईजान दाउद कडून व पाकिस्तान कडून  जे हल्ले झालेत त्यावेळी आमिर ला भीती नाही वाटली त्यावेळी परिवाराची चिंता नव्हती का ?त्यावेळी  आवाज का नाही उठवला . कदाचित छोटा शकील हा आता भारताच्या हाती आलाय आणि दाउद व इतर दहशतवादी संघटना ना आपल्या काही भारतीय कलाकार खुलेआम मदत करतायत हे विधानाने तर आमिर असुरक्षित तर झाला नसेल ना . आतंकवादी हाफिज सईद चे सहयोगी जमील च्या सोबत चे तुमचे छाया चित्र पाहिले ,  पी के चित्रपटातून गालावर कानाखाली न मिळो ह्यासाठी गालावर देवांचे फोटो लावलेत  , रॉंग नंबर कसा असतो ते दाखून दिलेत , शंकराच्या पिंडीवरील दुधापासून ते सर्वच बाबा हे भोंदू दाखवलेत पण मुसलीम आणि मस्जिद मधील जिहाद का नाही दाखवला , देशात आज ही मुस्लिम घरात दोन ते तीन लग्न करून महिलांवर अत्याचार केला जातोय हे नाही दिसत , आमिर चे ही तीन लग्न झालीत . आज ही मुस्लिम घरात  ५ ते १० मुलांना जन्म दिला जातो ह्याने देशाची लोक्संखेत स्फोट होतोय हे का नाही दर्शवले . मंदिरात जाणारे भित्रे असतात , का ? मस्जिद मध्ये ५ वेळा नमाज पडणारे मग कोण असतात . मक्का मध्ये जावून एका हातात छोटासा दगड घेवून त्या शैतान ला मारताना अंधश्रधा नाही वाटली . ह्या असल्या प्रत्येक गोष्टी मुळें मला च आता हा देश असुरक्षित वाटू लागला आहे . मी कोणाचे चित्रपट पाहतोय , कोणाला हृदयाशी घेतोय , कोणाला सुपर स्टार करतोय . उद्या जावून गैर मुस्लिम राष्ट्र म्हणून इसीस ने आमच्या वर हल्ला केला तर , त्यावेळी तुम्ही कुठे असाल , आमच्या सोबत कि दुसर्या देशात हा विचार ही मनात थोडा रेंगाळत आहे . काश्मीर मध्ये जेव्हा पाकिस्तानी झेंडे फडकावले व भारता विरुद्ध घोषणा दिल्या त्यावेळी प्रिय आमीर खान तुम्हाला असहिष्णू  ता नाही वाटली का ? दिल्ली मध्ये शहीद जवानांचे स्मारक तोडले तेव्हा असहिष्णू ता नाही वाटली का ? आणि आज माननीय मोदी ह्यांची बढती व पसंती तुम्हाला कुठतरी खटकतीय पण बोलू नाही शकत म्हणून ह्या सरकार ला कस लक्ष्य करता येईल आणि आपल्या आगामी चित्रपटाला ( दंगल ला ) कसं पब्लिकसिटी मिळेल ह्याच विचारात तुम्ही जाणून बुजून केलल हे तुमच वक्तव्य फार चुकीचे आहे . माझ्या घरा समोर पूल तयार केला तर मी हा देश सोडेल अस भारतरत्न लता दीदी नि म्हंटल होत पण त्यांनी त्याची देश वासियांना जाहीर माफी मागितली . तुमच्या दंगल चित्रपट पूर्वी असहिष्णू तेच दंगल निर्माण करून तुम्ही चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे पण ह्यातून राजकीय पोळी शिजताना कित्येक असहिष्णू आणि सहिष्णू ता अर्थ न समजणारे माझ्या भारतीय सामान्य नागरिक भरडले जातील हीच चिंता . 

गांधी तुमचा देश असहिष्णू झाला I
इस्लाम राष्ट्र मात्र सहिष्णू राहिला II

सचिन कृष्णा तळे

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale