Sunday, 28 April 2019

डॉ . तात्याराव लहाने , मराठी चित्रपट


हा माझा दूसरा मराठी चित्रपट डॉ. तात्याराव लहाने . हा चित्रपट ते हि एका मोठ्या माणसावर आणि त्या चित्रपटाचा शेवट माझ्या शब्दांनी हि आनंदाची गोष्टच  माझ्यासाठी . 




Friday, 26 April 2019

आझादी


… आणि
स्वातंत्र्य सूर्याचे तेज घेवून तळपलेले वीर
जे फासावर देशासाठी चढले
जे परकीयांच्या गोळीला हि न घाबरले
जे एकतेने देश देव धर्मासाठी लढले
त्या क्रांतिकारकांच्या रक्ताचे थेंब
ह्या  मातीच्या काळजात सोडा …
आणि पहा... रे
त्या मातीतून उगवणारी पिढी
हि कोणत्या धर्माची आहे
कोणत्या जातीची आहे
कोणत्या राज्याची आहे
कोणत्या पक्षाची आहे
त्यांची जात , धर्म , राज्य व भाषा
फक्त एकचं असणार
तो  म्हणजे …
माझा हिंदुस्थान …
आपलं भारत ...
माझा तिरंगा
मग
ते हि आझादी मागतील
भारतावर वारंवार ज्यांनी आक्रमणे केली त्यांच्या पासून
भारताची अफाट संपत्ती ज्यांनी लुटली त्या लोकांपासून
ज्यांनी मंदिरे व बुद्ध विहार तोडली व लुटली त्यांच्या पासून
ज्यांनी आमच्या संस्कृतीवर घात केला त्यांच्या पासून
हिंसेने धर्मांतर करायला लावले त्यांच्या पासून
राष्ट्रांचे ज्यांनी तुकडे केले त्यांच्या पासून
दंगली  ज्यांनी माजवली त्यांच्या पासून
स्वार्थासाठी राजकारण ज्यांनी केले त्यांच्या पासून
देशविरोधी ज्यांनी घोषणा दिल्या त्यांच्यापासून
देशविरोधी ज्यांनी कारवाई केल्या त्यांच्यापासून
देशात आतंकी हल्ले घडवण्यात
ज्यांनी मदत केली त्यांच्यापासून
आणि हो...
ते आझादी मागतील
अखंड हिंदुराष्ट्रासाठी
भारताच्या हितासाठी
हो ते आझादी मागतील
खोट्या राजकीय नेत्यांपासून
खोट्या राजकीय भाषणापासून
खोट्या सभेपासून
खोट्या गर्दीपासून
स्वार्थासाठी सत्तेसाठी चाललेल्या
ह्या निवडणुकी पासून
त्या बिनबुडाच्या कार्यकर्त्यापासून
त्यांच्या धमक्यापासून
त्यांच्या राजकीय विचारापासून
हो ते आझादी मागतील
लोकशाहीच्या उंबरटयावर बसून
आक्रोश करत
नव्या संघटनाला जन्म देत
नव्या क्रांतीच जाळ विणत
नव्या तरुणांना साद घालत
नव्या भारतासाठी
नव्या लोकशाहीसाठी
सत्यासाठी
जग जिंकण्यासाठी
अधिकार मिळवण्यासाठी
शिक्षणासाठी
असत्या विरोधी चळवळ उभारण्यासाठी
हो ते आझादी मागतील
लेखकांच्या लेखातून
ज्वलंत काव्यातून
हजारो लोकांच्या विचारातून
घरा घरातून
वृत्तपत्रातून संपादकीय शब्दातून
वैचारिक चळवळीतून
ते आझादी मागतील
वंचितांच्या हक्कासाठी
शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी
कामगारांच्या प्रश्नासाठी
ते आझादी मागतील
बलात्काराच्या घटनेतून
गुन्हेगारीच्या  जगातून
पैशाच्या काळा बाजारातून
देहाच्या विक्रीतून
हो ... ते आझादी मागतील
अखंड भारतासाठी
सिंधू नदीच्या स्वागतासाठी
गंगेच्या पूजेसाठी
स्वच्छ सुंदर भारतासाठी
भारतात जन्मलेल्या धर्मासाठी
भारताच्या एकतेसाठी
भारतीयांसाठी
हो ते आझादी मागतील

सचिन कृष्णा तळे

कात्रज पुणे
७७०९०९९६४६

Wednesday, 24 April 2019

केसरी रंग देशाचा


राम नामाचा जप करणारा
हिंदू दहशतवाद ठरतो
भगव्या कपड्यांमध्ये इथे
आतंकवाद ठरवला जातो

कट्टर हिंदूंची व्याख्या
त्यांनी आम्हास शिकवावी
ज्यांनी धर्मांतराच्या खाली
मळकी लंगोट मिरवली

अफवांच्या बाजारात म्हणे
त्यांना मिळे भाव चांगला
म्हणोनि केला हट्टहास हा
खोट्याचा बाजार बसवता

तुमचा नाही दोष हा
कळणार काय तुम्हाला
आम्ही पाहतो रोज
तो केसरी रंग देशाचा

सचिन कृष्णा तळे

Friday, 19 April 2019

माझ्या देशात

माझ्या देशात गाढवांचा कळप किती
त्या गाढवांसाठी लढणारा कळप किती

माझ्या देशात आहे सत्तेची हौस मोठी
त्या सत्तेसाठी पैशाची लालच मोठी

माझ्या देशात आहे नेत्यांची दादागिरी
त्या नेत्यांसाठी कार्यकर्त्यांची दादागिरी

माझ्या देशात फसवा बाजार मोठा
त्या बाजारात नेत्यांचा भ्रष्टाचार मोठा

माझ्या देशात घराणेशाहीचा झेंडा
त्या घराणेशाहीत कुजलेला झेंडा

माझ्या देशात जाती धर्माचा अजेंडा
त्या जाती धर्मात विकासाचा अजेंडा

माझ्या देशात नेता मिळतो विकत
त्या नेत्या सोबत कार्यकर्ता फुकट

सचिन कृष्णा तळे
पुणे
७७०९०९९६४६

Wednesday, 17 April 2019

वाचाळवीरांवर केलेली कार्यवाही पुरेशी आहे का ?

वाचाळवीरांवर केलेली कार्यवाही पुरेशी आहे का ?

सोशल मीडिया हे इतक प्रभावी माध्यम राजकीयांच्या हाती आहे कि तिथून थेट लाखो जनतेशी सवांद साधता येतो . जर राज्यात पाहिलं तर आज अनेक राजकीय पुढारी जे निवडणूक लढतयात आणि जे लढत नाहीयत पण सक्रिय आहेत ते हि वाटेल त्या भाषेत बोलतायत. त्यामुळे निवडणूक आयोग तरी कोणाकोणावर लक्ष ठेवेल. निवडणूक आयोगाने जमलं तस कारवाई करावी. सत्तेची हौस आणि प्रचाराची धूम असताना नेते आरोप प्रत्यारोप मध्ये इतके गुंतले जातात कि त्यांना ते काय बोलतायत ह्याच हि  भान नसत. राज ठाकरे , प्रकाश आंबेडकर , सुप्रिया सुळे , अजित पवार असे बरेच नेते आजच्या निवणुकीत त्यांच्या वक्तव्य मुळे चर्चेत आहेत. मतदान हे लोकशाहीत सर्वात श्रेष्ठदान आहे आणि त्याचा लेखाजोखा हा निवडणूक आयोगाकडे आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने आजून ठाम नियमावली तयार करने हे गरजेचे आहे. जे नेते देशाची आणि जनतेची दिशाभूल भर सभेतून करतात खोट पसरवतात त्यांच्यावर निवडणुकीने बंदी घालावी. साधं उदहारण आहे शाळेत जर मुलं मस्ती करत असतील तर मास्तर फक्त एक दोघांवर कारवाई करतो बाकीचे सगळे गप्प बसतात अगदी तसेच जर निवडणूक आयोगाने ठाम कारवाई केली तर बरेच नेते जीभ  भाषा सांभाळूनबोलतील.

सचिन कृष्णा तळे
तिरुपती निवास , सुखसागर नगर
लेन नंबर ७ कात्रज पुणे
७७०९०९९६४६

राहुल गांधींचे आठवावे रूप


राहुल गांधींचे आठवावे रूप ।
राहुल गांधींचा आठवावा प्रताप ।
राहुल गांधींचा आठवावे काम ।
या महाराष्ट्री  ।।१।।

राहुल गांधींचे कैसें बोलणें ।
राहुल गांधींचे कैसें चालणें ।
राहुल गांधींस सलगी देणे ।
मोदी द्वेषाने ।।२।।

राहुल गांधी एकमेव आधार ।
राहुल गांधी घराणदाज ।
राहुल गांधी ज्ञानाचा भांडार ।
काँग्रेस गावी ।।३।।

राहुल गांधी कीर्तिवंत ।
राहुल गांधी बुद्धिवंत ।
राहुल गांधी एकमेव ।
परम पूज्य ।।४।।

राहुल गांधी खासदार ।
राहुल गांधी पंतप्रधान ।
राहुल गांधी अभिमान ।
स्वप्नामध्ये ।।५।।

राहुल गांधींचा करावा प्रचार ।
राहुल गांधींचा धरावा हात ।
राहुल गांधींचा भारी अंदाज ।
या भारतात ।।६।।

राहुल गांधीचे शब्द अफाट ।
राहुल गांधींचा पहावा थाट ।
राहुल गांधीं सर्वधर्मात ।
सत्तेसाठी ।।७।।

सचिन कृष्णा तळे














Tuesday, 16 April 2019

तुझ्या प्रेमाची पालखी हलकी

तुझ्या प्रेमाची पालखी हलकी
तुला पाहताच भरते धडकी

मनामध्ये पोरी मनामध्ये
पाहतो तुला मी फुलामध्ये
रानामध्ये पोरी रानामध्ये
सांगू का तुला कानामध्ये
तुझ्या प्रेमात किती हि गोडी
तुला पाहताच भरते धडकी

कोणासाठी पोरी माझ्यासाठी
येशील का तू प्रेमासाठी
झाडाखाली त्या नदीकाठी
हात हातात घेण्यासाठी
छान दिसल आपली जोडी
तुला पाहताच भरते धडकी

नाक्यावरी पोरी गावामध्ये
चर्चा तुझी माझ्या नावापुढे
तुझ्याघरी पोरी माझ्याघरी
वाटू पत्रिका थाटामध्ये
जवळ येशील का तू थोडी
तुला पाहताच भरते धडकी

दिलामध्ये पोरी दिलामध्ये
तुझी जागा माझ्या हृदयामधे
दर्यावरी पोरी सागर किनारी
प्रेमाची भरती लाटांमध्ये
लाव वाटेल माझी तू होडी
तुला पाहताच भरते धडकी 

सचिन कृष्णा तळे , पुणे
७७०९०९९६४६

Friday, 12 April 2019

प्रचाराची धूळ

प्रचाराची धूळ

सावध हो अन कर मतदान हक्काचे
तूच आहेस हा देश तुझ्या मालकीचे

तुला भुरळ नसावी पैशाची खोट्याची
नेत्यांच्या शब्दांनी सजलेल्या मैदानाची

तुझ्या एक मताने चमत्कार घडतो
हा विश्वास ठेव देश तूच घडवतो

इथे धर्म जात भाषा वरुनी दंगल
इथे मिळतो फक्त घोषणांचे बंडल

तुझ्या मताने मिळो प्रश्नाचे उत्तर
प्रत्येक घरात .. विकासाचे अत्तर

दुष्काळावर कोण बोले दाखवा
प्रत्येकाचा एकच ठरलेला अजेंडा

पाण्यासाठी वणवण फिरणारी मुलं
नेत्यांच्या गळ्यात मात्र ताजी फुल

प्रचाराची धूळ आज दारोदारी
नेत्यांची हीच परीक्षा आहे खरी

सचिन कृष्णा तळे , पुणे कात्रज
७७०९०९९६४६



















Thursday, 11 April 2019

राजकीय कत्तलखाने


राजकीय कत्तलखाने

भारतात लोकशाही स्थापन झाल्यापासून अन राजेशाही काळ भूतकाळाच्या कागदावर इतिहासात जमा झाल्यापासून. राजकीय थाट हा जनतेच्या एका मतावर देशावर सत्तेचं राजकारण करू लागलं. राजकरणातून समाजकारण आणि देशाची प्रगती होऊ लागली. ह्या दरम्यान देशात अनेक छोटे मोठे राजकीय पक्ष जन्मास आले आणि नष्ट सुद्धा झाले . काहींची घराणेशाही आजवर टिकली जगली पोसली ते राजकारण वर . अनेक राजकीय पक्षाने अभूतपूर्ण उत्तम कामगिरी देशात राबवून जनतेच्या मनात हृदयात स्थान मिळवलं. त्याच कामाचे दाखले देत पुढील वाटचालीचे धोरणे रणनीती आखत सगळेच राजकीय पक्ष आता सत्तेसाठी , खास करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचाराची धूळ उडवत आहेत. ह्याच धुळीत नेता आणि त्या नेत्याचे कार्यकर्ते आणि जनता पूर्णतः माखणार.  निवडणूक होई पर्यंत.

झेंडे हजार रंगवून झाले
नेते पालखीत बसवून झाले

लोकशाहीचे स्वप्ने पाहताना
दिस गुलामीचे आठवून झाले

नेता आणि कार्यकर्ता . लोकांसाठी लढणारा नेता आणि त्या नेत्यासाठी लढणारा कार्यकर्ता. एक अतूट नातं . नेता म्हणजे विश्वास आदर्श दैवत्वच कार्यकर्त्यांसाठी आणि कार्यकर्ते म्हणजे खरी दौलत ताकद नेत्यांची. नेता सांगेल त्या दिशेने कार्यकर्ते कार्य करत आणि कार्यकर्त्यांना काय हवे ते अचूक जाणून ठाम विचार नेता मांडत असे. त्याच्या एका विचारावर शब्दावर लाखो लोकांचे आणि समाजाचे प्रश्न मार्गी लागत.  त्यामुळे तेव्हाचे कार्यकर्ते हे निष्ठावंत होते आपल्या नेत्याशी एकमत होते.  ज्यांना त्या नेत्याचे निर्णय पटले नाहीत किंवा त्यांना काम करून हि योग्य तो अधिकार मिळाला नाही ते सोडचिट्टी देऊन चालते झाले. काहीं स्वतःचे पक्ष स्थापन करून स्वतःच नशीब अजमावत आहेत तर काहींनी दुसऱ्या पक्षाची पायरी धरली. काही उदाहरणार्थ सांगायचं तर शरद पवार काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस , नारायण राणे स्वाभिमान पक्ष , सेनेतून राज  ठाकरे ह्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेन पक्ष , छगन भुजबळ राष्ट्रवादी मध्ये इ .  राजकारणी भाषेत सांगायच झालं तर फितूर झाले , बंडखोरी केली , बेईमान झाले , खाल्या ताटात वैगैरे वैगैरे . पण नेत्यांनी हि विचार करणे खूप गरजेचे आहे जो कार्यकर्ता आपल्यासाठी आपल्या सुखदुःखात रात्रंदिवस झटला प्रचारासाठी हिंडला आणि स्वतःला सिद्ध करत पक्ष मदतीने नेतृत्व करू लागला तो अचानक नाराजी प्रकट करून पक्षातून बाहेर का पडतो . एक मजबूत कार्यकर्ता जेव्हा पक्षातून फुटतो त्यासोबत हजार कार्यकर्ते फुटतात त्या हजारांना मानणारा वर्ग हि नकळत पक्षापासून दूर होतो . फोडाफोडी हि खूप मोठी हानी सर्व राजकीय पक्षांना लागू पडते. ती हानी भरून काढण्यासाठी  पुन्हा खंबीर कार्यकर्ते उभे करण्यासाठी पक्षप्रमुखाना जीवाचं रान करावं लागत. खरंतर त्याच्यातल्या कार्यकर्त्याची कत्तल नक्की कुठे होतीय हे आजच्या राजकीय पुढार्यांनी संमजून घेयला हवं
.
राजकीय पक्ष म्हंटल तर स्वार्थ हा आलाच, वैचारिक चिखलफेक आलीच, चांगलं वाईट राजकारण हि आलच दिखावे पण आले. आताचे राजकारण पाहता कित्येक नेत्यांच्या निर्णयाने कार्यकर्त्यांचे खच्चीकरण म्हणजेच राजकीय दृष्ट्या वैचारिक कत्तल झाली आहे आणि होतीय. हे चित्र फक्त एका पक्षापुरता नसून सगळ्या राजकीय पक्षात आहे.  पक्षांतर्गत नाराजी चे प्रमाण खूप वाढले आहेत. त्याचे कारण फक्त एक निर्णय. भर सभेत एकमेकांवर तोंडसुख घेणारे नेते  कार्यक्रमात जेव्हा एक होतात, दिलेल्या शब्दावर जागता शब्दांची हेराफेरी करत कार्यकर्त्यांना तोंडावर पाडतात तेव्हा त्या कार्यकर्त्यांची काय मानसिक स्थिती होत असेल हे विचार करणे खूप गरजेचे आहे. आजचे नागरिक हे शिक्षित आहेत जाणते आहेत चांगल्या वाईट गोष्टीवर प्रखर मत मांडणारे आहेत. त्यात सोशल मीडिया म्हणजे स्वतःला प्रकट करण्याचे स्वतःचे मत मांडण्याचे एक अदृश्य असे व्यासपीठ प्रत्येकाला मिळालंय. देशात आणि राज्यात जर नजर फिरवली तर कार्यकर्त्यांची नाराजी हि सहज दिसून येईल. शिवसेना भाजपची युती तर महाआघाडीत मनसेची एन्ट्री तर मायावती अखिलेष ची झप्पी . चित्र डोळ्यासमोर आहे . नेते एक झाले पण जे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधी लढले ते एक होतील का ? त्यांची वैचारिक लढाई एक होईल का ? 
सत्तेसाठी जगता जगता
सत्याला पार ठेचून झाले

अनेक जाती अन धर्मातुनी
असंख्य धागे विणून झाले

कालपर्यन्त भाजप आणि शिवसेना युती करणार नाही आम्ही स्वबळावर लढू आणि जिंकून दाखवूची वार्ता करत करत अचानक आज युतीच्या बंधनात अडकून निवडणुकीचं रणशिंग फुंकले. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत मैदानात उतरण्याची तयारी करते आणि त्याला काँग्रेस कडून नकार मिळतो . काँग्रेसला विरोध करणारे कार्यकर्ते आघाडीत तसेच युती ला विरोध करणारे कार्यकर्ते महायुतीत खुश असतील का ? राजकीय दृष्ट्या नेत्यांनी निर्णय घेतले पण भावनिक दृष्ट्या कार्यकर्त्यांनी काय करावे. तेरी चूप मेरी चूप म्हणत फक्त कार्य करायचं कि सन्यास घेऊन दारा आत राहून फक्त बातम्या बघायचं. ज्या नेत्यासवे काम केलं ज्या पक्षाच काम केलं त्याची चुकीची भूमिका पाहून मत प्रकट करणे हि आजच्या कार्यकर्त्यांना सोपं नाहीय. जर तो पदाधिकारी असला तर प्रोटोकॉल पाळत त्याच पक्षात चूप बसायचं नाहीतर बाहेरचा रस्ता आहेच. जो प्रकट होतो तो बाटगा आणि जो गप्प बसतो तो निष्ठावंत. शेवटी हे सगळे वैचारिक भांडण असावं तरच चांगलं नाहीतर देशात राजकीय दंगे जास्त माजतील. प्रत्येक राजकीय पक्षाची एक वेगळी भूमिका आणि ओळख आहे त्यामुळे तेच पक्ष एकत्र दिसतील ज्यांचे विचारधारा हि एक आहे एका मुद्द्यावर आहे. काही राजकीयांची अशी हि ओळख आहे.  " तोडा फोड राज्य करा " " तुम्ही खा आम्हाला पण खाऊ द्या " " सत्तेसाठी काही हि "

महाराष्ट्राचे मुखमंत्री देवेंद्र फडवणीस आपल्या प्रचारातून शिवसेनेची खिल्ली उडवत मोठ्या भावाला कवटाळले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या सभेतून वाघाची डरकाळी फोडत स्वबळावर लढण्याचे स्वप्न दाखवत सत्तेला लाथ मारता मारत पुन्हा भाजप च्या मदतीने भगवे झेंडे मिरवत निवडणुकीला सज्ज झाले.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या व्यंग चित्रातून आपल्या शाब्दिक तोफखान्यातून अजित पवार, काँग्रेस ह्यांच्यावर टीका करून इंजिन आघाडीच्या सोबत ठेवून भाजप सेनेच्या विरोधी रुळावर सुसाट सोडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार साहेब केंद्रातून निशाणा लावत, रामदास आठवले आपल्या कवितेतून भाजप चे गुणगान गात फक्त एका जागेसाठी विद्रोही कवितांचा पाऊस मीडियासमोर पाडू लागले.

राज्यात घडणाऱ्या ह्या घटना पाहता कार्यकर्त्यांचे दिशाभूल हे त्यांचेच नेते करतांना दिसतायत. सत्ता असो नसो मिळो या मिळो स्वतःच्या ठाम भूमिकेवर एकही नेता आज नाही. जर असं असत तर देशात राम मंदिर असत , बेळगाव मधला मराठी बांधव महाराष्ट्रात असता , ओरंगाबाद आज संभाजी नगर म्हणून असत ,  काश्मीर मधील ३७० कलम कधीच उठवली असती, देशाशी गद्दारी करणारे देशाबाहेर नसते वैगैरे वैगैरे . 
शेवटी कार्यकर्त्यांच्या अफाट शक्तीचे भर सभेत खच्चीकरण करत वैचारिक खून केला जातो. त्याच्या कार्यावर त्याने पक्षसाठी दिलेल्या वेळेवर पाणी सोडल जात म्हणजेच आजचे राजकारण हे राजकीय कत्तलखाने आहेत जिथे कार्यकर्त्याचे वैचारिक कत्तल करत बळी दिली जाते.

मोर्चे बंद आणिक भाषणे
शंभर वेळा ऐकून झाले

दाराआड त्या बंगल्यामध्ये
कार्यकर्त्याना फसवून झाले

-सचिन कृष्णा तळे

Wednesday, 10 April 2019

धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर


धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर

उत्तरम्य समुद्रस्य, हिमाद्रे शैव लक्षणम्

वर्षम् भारतम् नाम् ,भारतीय यत्र संततिः

म्हणजे समुद्रापासून उत्तरेला आणि हिमालयापासून दक्षिणेला अशी जी भूमी तिचे नाव आहे भारत अन् त्या भारतभूमीची संतती म्हणजेच जे भारतात जन्मले  ते भारतीय. भारत ... हिंदुस्थान ... इंडिया. जगातल्या प्राचीन संस्कृती पैकी एक. क्षेत्रफळात सातव्या क्रमांकावर आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसंख्याच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असणारा आपला भारत देश. अनेक भाषा , प्रांत, रीतिरिवाज , तसेच अनेक सण आणि अनेक धर्माना आश्रय आणि श्रद्धा पूर्वक मानसन्मान देणारा एकमेव देश म्हणजे आपला भारत . जिथे मंदिराची आरती होते ,मस्जिद ची आजण होते , बुद्धांचे स्मरण होते , चर्चमधून प्रार्थना होते तर जिथे बदल अन परिवर्तन हे निश्चित आहे , जिथे अन्यायाला न्याय मिळते , जिथे भारताचे संविधान तितकेच महत्वाचे मानले जाते जिथके धर्मग्रंथ आहेत. अनेकतेतून एकता हीच ओळख आपल्या भारताची. हीच एकता कायम टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक भारतीय हा प्रतन्यशील असतो फक्त काही राजकीय समाजकंठक अन धृत माणसं सोडली तर. 

हिंदू म्हणून जन्मलो का हाच माझा अपराध आहे

माझ्याच देशात हिंदू म्हणून का माझा विरोध आहे

जागतिक पातळीवर जर पाहिलं तर  भारत हा असा एकमेव राष्ट्र असेल जिथे त्याच्याच भूमिपुत्रांना हक्कासाठी लढावं लागत , मरावं लागत . देशासाठी त्याच्या धर्मासाठी त्याला बलिदान द्यावं लागत. भाषेवरून अन धर्मावरून वेळोवेळो त्याचे खच्चीकरण केले जात. जर प्राचीन भारतावर नजर फिरवली तर सहज लक्ष्यात येईल कि , हिंदू आणि बोद्ध ह्या दोन विश्व सुंदर धर्माची , वटवृक्षाची मुळे हे भारतातच रुजली अन फुलली . इतर धर्म कसे आले आणि लादले गेले हे इतिहासाच्या रक्तरंजित पानांनी आजही ग्रंथालय सजले आहेत. त्याचे अवशेष सहज दिसून येतात. अन्न वस्त्र निवारा माणसाच्या ह्या मूलभूत गरजा त्याशिवाय माणूस जगू शकत नाही. ह्या गरजा जितक्या महत्वाच्या तितकंच महत्व आहे धर्म भाषा आणि देश. मूलभूत गरजा जगण्यासाठी तर घडण्यासाठी आणि घडवण्यासाठी मानव हा धर्म जात अन भाषाचे वापर करतो.

ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाचे आपण देणे लागतो ह्याच धर्मावर माणूस हा समूह करून राहू लागला. आपली परंपरा संस्कृती जपणे आणि पुढच्या पिढीला ती समजून सांगणे हे आद्य कर्तव्य. धर्माची रक्षा करणे धर्म वाढवणे म्हणजे आपल्या धर्मात असलेले चांगले  विचार हे लोकांपर्यंत पोहचवणे , त्यांना मार्ग दाखवणे .  धर्मांतर हे स्वखुशीने असावे. ज्याला त्याला मार्ग मोकळा आहे. ज्याचे त्याचे विचार हे स्वतंत्र आहे . परंतु धर्माच्या ह्या कडव्या प्रचारात धर्मांतराची ठिणगी अशी पेटली कि माणूस हा अत्याचाराने , जबरदस्तीने , अन्यायाने धर्मांतर करू लागला ... लादू लागला.

वाटून घेतली धर्म जात अन माती

वाटून घेतली भाषा रंग अन नाती

वर्चस्व गाजवायच असेल तर एकता हि तोडायलाच हवी . एकमेकांबद्दल मतभेद निर्माण करणे , वैर निर्माण करणे , फूट पाडून कार्य सिद्धी करणे. "तोडा फोड राज्य करा" कदाचित ह्याच वाक्यावर धर्मांतर आणि राष्ट्रांतरच बीज पेरलं गेलं असावं. राष्ट्रांतर घडलं ते धर्मांतराच्या जोरावर हे जग जाहीर आहे. जर इतिहासाची पाने चाळली तर धर्मांतरच्या वाहत्या प्रवाहात किती राष्ट्रांचा जन्म झाला हे सहज कळेल. जगाच्या पाठीवरती जितके युद्ध झाले ते सगळे युद्ध स्वतःचे साम्राज्य वाढवण्यास कमी तर धर्माच्या प्रचारास अधिक झाले हे कटू सत्य आहे आणि ह्याच आगीच्या धुराळात असंख्य निष्पाप जीवांची होळी पेटवण्यात आली. पुढच्या पिढीला इतिहास कळू नये म्हणून असंख्य ऐतिहासिक स्थळे भुईसपाट करण्यात आले उध्वस्त केले गेले. आठ वर्षांपूर्वी अफगाणिस्थान मधील हिंदुकुश पर्वतरांगात जगातील मोठ्या मुर्त्यांपैकी असणारी बमियानचे  बुद्ध नष्ट  करण्यात आले. इतकेच नाही तर रस्त्यात येईल ते सर्व बोद्ध आणि हिंदूंचे धार्मिक स्थळांची तोडफोड अन विटंबना करून नष्ट करण्याचे प्रयत्न करण्यात आले. 

"देहकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो " सावरकरांच्या अश्या क्रांतिकारी विचारांना आपण सहज विसरतो किंवा त्या शब्दांच महत्व कळत नाही. जशी आपली संस्कृती तसा आपला देश. जर हि संस्कृतीचं बदली गेली तर देश हा बदलणारच. धर्मांतर जर वाढले तर राष्ट्रातंर हे होणारच.

Tuesday, 9 April 2019

नाव त्याचे शिवाजीराव आढळराव पाटील हो जी जी जी


मानाचा पहिला मुजरा शिवाजी राजांना
दुसरा शूरवीर शंभूराजांना
तिसरा ह्या महाराष्ट्र भूमीला
चौथा मुजरा घालितो बाळासाहेबांना त्यांच्या शिवसेनेला

ह्या महाराष्ट्र नगरी
शिरूर तालुका शिवधारी
भगव्याची कथा हि न्यारी
बांधून विकासाची दोरी
समाज सेवेतुन आला एक लोकनेता हो ... दारी
नाव त्याचे शिवाजीराव आढळराव पाटील हो जी जी जी

शून्यातून वाढवली गती
सामन्यातून त्यांची प्रचिती
कपाळी शिवतीर्थाची माती
लोकसभेत दादांची महंती 
सोबत मावळ्यांची गर्दी हो जी जी जी
नाव त्याचे शिवाजीराव आढळराव पाटील हो जी जी जी

कामातून दादांची ओळख
जनतेला हिऱ्याची पारख
त्यांनी उभारली शाळा
लोकांसाठी पतसंस्था
बैलगाडी शर्यतींना
अंगावर घेऊन दिली लढत
अणे-माळशेज रेल्वे मार्गाचा
केला त्यांनीच पाठपुरवठा
चाकण विमानतळासाठी
जनतेला मिळन्या संधी
पुढाकार घेतला दादांनी
रोजगार निर्मितीसाठी
जनसामान्यांचे प्रश्न
त्याला उत्तर दादांचं काम
बहू आले बहुरंगी
मैदानी दादाच ठाम
त्या शिरूर तालुक्याची
केंद्रात घेतली दाद हो जी जी जी
नाव त्याचे शिवाजीराव आढळराव पाटील हो जी जी जी

-  सचिन तळे

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale