Wednesday, 10 September 2025

भारताला डळमळीत पाहण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ठाम विरोध!

 🔴 माझं मत 🔴

“भारताला डळमळीत पाहण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ठाम विरोध!”

शेजारी राष्ट्रांमध्ये गेल्या काही वर्षांत आपण सतत अस्थिरता, सत्तापालट आणि जनआंदोलनं पाहतोय. श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि आता नेपाळ. या सगळ्यांमध्ये जनतेचा त्रास, अराजकता आणि राष्ट्राची दुर्दशा हेच दिसून येतं.


हे प्रसंग आपल्याला शिकवणारे आहेत, पण धोक्याचं मूळ बाहेर नाही… ते आत आहे. कारण खरी भीती या घटनांमध्ये नाही, तर त्या लोकांमध्ये आहे जे आपल्या भारतातही अशीच परिस्थिती व्हावी, असं स्वप्न पाहतात. जे लोक राष्ट्राच्या स्थैर्याला डळमळीत करण्यासाठी विषारी विचार करतात, तेच खरे घातक आहेत.

राष्ट्र म्हणजे फक्त सत्ता नाही, राष्ट्र म्हणजे संस्कृती, परंपरा, कुटुंब आणि आपली अस्मिता. या सगळ्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. बाहेरचं संकट आपण सहज पेलू शकतो, पण आतून फुट पाडणाऱ्यांच्या राक्षसी वृत्तीचा मुकाबला केला नाही तर आपली वाटचाल धोक्यात येईल.

म्हणूनच —

👉 विचारांनी भारताला अस्थिर करू पाहणाऱ्यांना स्पष्ट विरोध केला पाहिजे.

👉 एकतेचं, स्थैर्याचं आणि लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी सजग राहणं गरजेचं आहे.

भारताला अशा विषारी इच्छांची गरज नाही. भारताला लागतो तो प्रगतीचा विचार, लोकांच्या कल्याणाचा विचार आणि एकतेचा विचार.

🇮🇳 भारत स्थिर आहे, भारत समर्थ आहे… आणि भारताला कोणीही डळमळीत करू शकत नाही!

✍️ Sachin Jayshree Krishna Tale

आहे ते आहे

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale