Friday, 23 September 2022

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था

 

 


महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था

 

'महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था' ही महाराष्ट्रातील सर्वांत जुनी साहित्य संस्था आहे. आधुनिक महाराष्ट्राचे आद्द्य प्रवर्तक न्या. महादेव गोविंद रानडे, जागतिक कीर्तीचे संस्कृत पंडित डॉ. सर रामकृष्ण भांडारकर, प्रसिद्ध कादंबरीकार हरी नारायण आपटे, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अशा पंचवीस द्रष्ट्या महाराष्ट्रीय समाजधुरीणांनी २९ ऑक्टोबर १८९४ रोजी ही संस्था स्थापन केली. त्या वेळी संस्थेचे नाव 'डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी' असे होते. १९४८ मध्ये ते 'महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था' असे करण्यात आले.ही संस्था १२५ हुन अधिक वर्षे उत्कृष्ट मराठी ग्रंथांना पुरस्कार देऊन उत्तेजन देण्याचे कार्य करत आहे.

 

पेशव्यांच्या राजवटीत दरवर्षी चातुर्मासात विद्वानांना दक्षिणा दिली जात असे. त्यामध्ये वैदिक विद्वान, इतर पंथीय विद्वान आणि अन्य धर्मातील पंडितांचा समावेश असे. पुढे इंग्रजांच्या राजवटीत ब्रिटीशांनी दक्षिणा प्राइझ कमिटी या नावाने एक स्वतंत्र कमिटी स्थापन केली.1895 साली या कमिटीचे सर्व काम संस्थेकडे आले. संस्थेच्या संग्रही 1895 पासून विद्वानांनी केलेली परिक्षणे आहेत, शंभर वर्षांपूर्वीपासूनची हस्तलिखिते आहेत आणि दुर्मीळ ग्रंथ, पेशवे दप्तर, विविध प्रकारचे 32 कोश, जुन्या पोथ्या, न्यायमूर्ती रानडे यांचा राइज ऑफ मराठा पाॅवर हा ग्रंथ देखील आहेत. संस्थेकडे असलेल्या सुमारे 7000 हजार ग्रंथांचे स्कॅनिंग आणि डिजीटायझेशनचे कार्य सध्या सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 3000 ग्रंथांचे डिजीटीयझेशन पूर्ण झाले आहे. संस्थेची आणखी एक योजना म्हणजे आदिवासी बोलींचे संवर्धन. सेंटर फाॅर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस) याच संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येतो. धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधील आदिवासी समाजाची बोलीभाषा, त्याच्या बोलीतील म्हणी, त्यांचे संगीत, नृत्य आदी सर्वांचे जतम करण्याचा प्रकल्प संस्था पूर्ण करणार आहे.

 

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेला वनाझ कंपनीतर्फे पुण्यात पौड रस्त्यावर १०००० चौरस फुटाची जागा देणगी म्हणून प्राप्त झाली. त्या जागेत दक्षिणा भवन या नावाची वास्तू उभारण्याची कल्पना असून. संस्थेचे कार्यालय, वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका, पाहुण्यांची राहण्याची सोय अशा प्रकारची वास्तू उभारण्याचे काम प्रस्तावित आहे. वृत्तपत्रे, रस्त्यांवरील पाट्या अशा सार्वजिनक ठिकाणी होत असलेल्या अशुद्ध मराठी भाषेचा वापर थांबावा यासाठी काही मोहीम संस्थे मार्फत राबवले जात आहेत. मराठी भाषा कशी शिकवावी या विषयावर संस्थेत एक अभ्यासक्रम चालवला जातो. शारदा शिंत्रे या मराठीच्या अभ्सासक हा उपक्रम चालवतात. संस्थेला अन्यही बरेच उपक्रम सुरू करायचे आहेत. त्यासाठी संस्थेला तरूण अभ्यासक आणि धनाची मदत करणारे दानशूर अशा दोहोंच्या मदतीची गरज आहे, जेणेकरून आणखी शेकडो वर्ष संस्था मजबूतपणे काम करत राहील.

 

सचिन कृष्णा तळे 

Thursday, 22 September 2022

अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळ.

 

अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळ.




 

'‘महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावः'’ या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो महानुभाव पंथ, असे म्हटले जाते. ज्ञानेश्वरांच्या काही काळ अगोदर 'महानुभाव' संप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला. या संप्रदायाचे मूळचे नाव ‘परमार्ग असे असून महानुभाव पंथ हे नाव प्रथम एकनाथांनी वापरले. महानुभाव पंथ महाराष्ट्रात उगम पावलेला असला तरी त्याचा प्रसार उत्तर भारतात पंजाब आणि काश्मीरपर्यंत झाला. तत्त्वाचिंतनात्मक लेखन हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. ग्रंथांवर भाष्ये-महाभाष्ये लिहिली गेली. या संप्रदायातील अनेक भाष्यकार संस्कृतज्ञ विद्वान आणि त्यांनी आपले भाष्यग्रंथ स्वामींच्या आदेशानुसार लोकभाषा मराठीतून लिहिले आहे. त्यांचे सूत्रपाठ, सतिग्रंथ, आख्यान काव्य, साधना ग्रंथ, टीकाग्रंथ आणि भाष्यग्रंथ अत्यंत मोलाचे आहेत. मराठीत लिहिलेले सूत्रपाठ हिंदी अथवा पंजाबी मातृभाषा असलेले अनुयायी अद्यापही वाचतात. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर हे स्वतः गुजराती भाषक असले, तरी ते मराठी भाषा अस्खलित बोलत. आपल्या तत्त्वज्ञानाचा मराठी या लोकभाषेत त्यांनी प्रचार केला.

 

श्री चक्रधर स्वामी यांचे विचार समाजातील सर्व स्तरांवर पोहचवण्यासाठी महानुभाव पंथातील सर्व संत महंत यांनी मिळून  अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळ ची स्थापना केली. ह्या मंडळातर्फे दरवर्षी महानुभाव पंथाच्या साहित्याचे संमेलन भरवण्यात येते. जन्मोस्तव निम्मित अखिल भारतीय महानुभाव संमेलन हे नाशिक गंगापूर येथे २९ ते ३१ ऑगस्ट २०२२ भरवण्यात आले होते. या साहित्य संमेलनात तीन दिवस विविध धार्मिक , अध्यात्मिक , सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले गेले. अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळ तर्फे धर्मसभा भरवणे , संत महंतांची मिरवणूक अन शोभायात्रा काढणे , भजन करणे, संतांची कीर्तने ,कथावाचन ठेवणे ,कवींच्या काव्य वाचन चा कार्यक्रम राबवणे तसेच चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानावर चर्चा आणि मार्गदर्शन आयोजन करणे, महानुभाव पंथाशी निगडित साहित्य प्रकाशित करून त्यांना व्यासपीठ मिळवून देणे असे अनेक उपक्रम हे मंडळातर्फ़े राबवले जातात. आचार्य भानुकवी जामोदेकर साहित्य संघाचे पहले आद्य कवयित्री महदंबा साहित्य संमेलन जालना जिल्ह्यातील दहीपुरी येथे भरले होते. 2018 साली अखिल भारतीय महानुभाव साहित्य महा मंडळाने सुद्धा 12वे तपपूर्ती महानुभाव साहित्य संमेलन जालना येथे भरविले होते. या संमेलनात राज्यातील सर्व साहित्यिक, राजकीय नेते, विद्यार्थी, संशोधक, मराठी साहित्य प्रेमी व महानुभाव पंथाचे अनुयायी सहभागी झाले होते.

 

महानुभावांच्या मराठीविषयक आत्मीयतेच्या भावनेमुळे या पंथातील व्यक्तींनी विविध वाङ्मयप्रकारांत रचना करून मराठी साहित्य समृद्ध केला आहे. स्मृति-संकलनात्मक गद्य चरित्रवाङ्मय ही या पंथाची मराठी साहित्यास लाभलेली महत्त्वाची देणगी होय.

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 

Tuesday, 20 September 2022

लोकराज्य ग्रंथालय

 लोकराज्य प्रतिष्ठान संचालित लोकराज्य ग्रंथालय


चला पुस्तकं वाचूया...वाचन चळवळ पुढे नेऊया !


आजच्या मोबाइल आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण वाचन संस्कृती पासून फार दूर गेलो आहोत.लहान मुलांपासून तरुण ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच मोबाईलच्या जगात हरवले आहेत. खास करून तरुणाई वाचन संस्कृती पासून दूर जाताना पाहायला मिळतेय.त्यामुळेच आपली वाचन संस्कृती टिकावी आणि वाढावी यासाठी लोकराज्य प्रतिष्ठान संचालित लोकराज्य ग्रंथालयामार्फत गेल्या काही वर्षांपासून वाचन चळवळ राबविली जातेय. या मुंबई,नवी मुंबई,ठाणे,पनवेल या परिसरात लोकराज्यच्या टीम मार्फत ही चळवळ राबवली जातेय.


घरोघरी पुस्तक पोहोचावे आपल साहित्य,संस्कृती,इतिहास, विज्ञान पुस्तकांच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचाव या पुस्तकांमुळे आयुष्य समृद्ध व्हावे यासाठी लोकराज्य ग्रंथालयाच्या मार्फत प्रयत्न सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रयत्नांना वाचक प्रेमींचाही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.अगदी काही पुस्तक आणि काही वाचक प्रेमींपासून सुरू झालेल्या या लोकराज्य ग्रंथालयात दिवसागणिक पुस्तक आणि वाचक प्रेमींची संख्या वाढतेय. मुख्यतः पुस्तक का वाचावे ? पुस्तकांमुळे आपल्या आयुष्यात किती बदल घडू शकतो याची जाणीव ग्रंथालयाशी जोडल्या जाऊ लागलेल्यांना होऊ लागली आहे.


महत्त्वाचं म्हणजे आगामी काळात शाळा,महाविद्यालय या ठिकाणीच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी नवीन येणारी पुस्तक माहित पडावी आणि शाळा कॉलेजच्या वयातच विद्यार्थ्यांना आयुष्य समृद्ध करणाऱ्या आयुष्याला वळण देणाऱ्या पुस्तकांशी मैत्री व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासोबत गाव तिथे ग्रंथालय,वाडी वस्ती,रहिवासी इमारत त्या त्या ठिकाणी छोटे खानी का होईना ग्रंथालय उभारण्याचा लोकराज्य प्रतिष्ठानचा मानस आहे.


ही पुस्तक चळवळ वाढावी यासाठी सर्व वाचक प्रेमींचा हातभार महत्त्वाचा आहे.घरोघरी पुस्तक पोहोचावे आपल साहित्य,संस्कृती,इतिहास, विज्ञान पुस्तकांच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचाव या पुस्तकांमुळे आयुष्य समृद्ध व्हावे यासाठी वाचक प्रेमींच्या मदतीची आवश्यकता आहे.


गरजू वाचकांपर्यंत पुस्तक पोहोचावी यासाठी वाचलेली पुस्तकं लोकराज्य ग्रंथालयाला दान करावीत त्याच सोबत वाढदिवस,एखाद्या चांगल्या प्रसंगी ग्रंथालयाला पुस्तकं दान करून तो प्रसंग साजरा करावा अशी विनंती लोकराज्य प्रतिष्ठानच्या टीम मार्फत सर्व वाचक प्रेमींना करण्यात आली आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच ही वाचन चळवळ वाढवू शकते या वाचन चळवळीत प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला तरी देखील सध्या वाचनापासून दुरापास्त झालेल्या पिढीला वाचन संस्कृतीशी जोडता येऊ शकतो आणि या माध्यमातूनच आयुष्य समृद्ध होऊ शकतं.


टीम-लोकराज्य प्रतिष्ठान 

संचालित लोकराज्य ग्रंथालय

संपर्क: ०९८७०५९३४४५


“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale