अखिल भारतीय महानुभाव साहित्य
मंडळ.
'‘महान अनुभवोस्तेजा बलं
वा यस्य सः महानुभावः'’ या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो
महानुभाव पंथ, असे म्हटले जाते. ज्ञानेश्वरांच्या काही काळ अगोदर 'महानुभाव' संप्रदाय
महाराष्ट्रात उदयास आला. या संप्रदायाचे मूळचे नाव ‘परमार्ग’ असे असून महानुभाव पंथ हे नाव प्रथम एकनाथांनी वापरले. महानुभाव
पंथ महाराष्ट्रात उगम पावलेला असला तरी त्याचा प्रसार उत्तर भारतात पंजाब आणि काश्मीरपर्यंत
झाला. तत्त्वाचिंतनात्मक लेखन हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. ग्रंथांवर भाष्ये-महाभाष्ये
लिहिली गेली. या संप्रदायातील अनेक भाष्यकार संस्कृतज्ञ विद्वान आणि त्यांनी आपले भाष्यग्रंथ
स्वामींच्या आदेशानुसार लोकभाषा मराठीतून लिहिले आहे. त्यांचे सूत्रपाठ, सतिग्रंथ,
आख्यान काव्य, साधना ग्रंथ, टीकाग्रंथ आणि भाष्यग्रंथ अत्यंत मोलाचे आहेत. मराठीत लिहिलेले
सूत्रपाठ हिंदी अथवा पंजाबी मातृभाषा असलेले अनुयायी अद्यापही वाचतात. महानुभाव पंथाचे
संस्थापक चक्रधर हे स्वतः गुजराती भाषक असले, तरी ते मराठी भाषा अस्खलित बोलत. आपल्या
तत्त्वज्ञानाचा मराठी या लोकभाषेत त्यांनी प्रचार केला.
श्री चक्रधर स्वामी यांचे
विचार समाजातील सर्व स्तरांवर पोहचवण्यासाठी महानुभाव पंथातील सर्व संत महंत यांनी
मिळून अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळ ची
स्थापना केली. ह्या मंडळातर्फे दरवर्षी महानुभाव पंथाच्या साहित्याचे संमेलन भरवण्यात
येते. जन्मोस्तव निम्मित अखिल भारतीय महानुभाव संमेलन हे नाशिक गंगापूर येथे २९ ते
३१ ऑगस्ट २०२२ भरवण्यात आले होते. या साहित्य संमेलनात तीन दिवस विविध धार्मिक , अध्यात्मिक
, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले गेले. अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळ तर्फे
धर्मसभा भरवणे , संत महंतांची मिरवणूक अन शोभायात्रा काढणे , भजन करणे, संतांची कीर्तने
,कथावाचन ठेवणे ,कवींच्या काव्य वाचन चा कार्यक्रम राबवणे तसेच चक्रधर स्वामींच्या
तत्वज्ञानावर चर्चा आणि मार्गदर्शन आयोजन करणे, महानुभाव पंथाशी निगडित साहित्य प्रकाशित
करून त्यांना व्यासपीठ मिळवून देणे असे अनेक उपक्रम हे मंडळातर्फ़े राबवले जातात. आचार्य
भानुकवी जामोदेकर साहित्य संघाचे पहले आद्य कवयित्री महदंबा साहित्य संमेलन जालना जिल्ह्यातील
दहीपुरी येथे भरले होते. 2018 साली अखिल भारतीय महानुभाव साहित्य महा मंडळाने सुद्धा
12वे तपपूर्ती महानुभाव साहित्य संमेलन जालना येथे भरविले होते. या संमेलनात राज्यातील
सर्व साहित्यिक, राजकीय नेते, विद्यार्थी, संशोधक, मराठी साहित्य प्रेमी व महानुभाव
पंथाचे अनुयायी सहभागी झाले होते.
महानुभावांच्या मराठीविषयक
आत्मीयतेच्या भावनेमुळे या पंथातील व्यक्तींनी विविध वाङ्मयप्रकारांत रचना करून मराठी
साहित्य समृद्ध केला आहे. स्मृति-संकलनात्मक गद्य चरित्रवाङ्मय ही या पंथाची मराठी
साहित्यास लाभलेली महत्त्वाची देणगी होय.
सचिन कृष्णा तळे

No comments:
Post a Comment