Wednesday, 24 November 2021

स्वतंत्र भारताचे असे राष्ट्रपती जे धर्माने मुस्लिम होते…

 

स्वतंत्र भारताचे असे राष्ट्रपती जे धर्माने मुस्लिम होते….

 

अनेक वर्षांपासून आपल्या भारतात हिंदू मुस्लिम हा वाद कोणत्या ना कोणत्या कारणास्तव पेटवला जातो आणि तो सहज पेटतो. असे असंख्य उदाहरण आपल्या देशात तसेच शेजारच्या देशात आहेत. भारताच्या भूमीतून धार्मिक अजेंडा च्या जोरावर स्वतंत्र झालेले पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान हे असे मुस्लिम राष्ट्र आहे जिथे आजवर एकही हिंदू हा राष्ट्रपती झाला नाही अन तिथे हिंदूंची संख्या हि विरळ होत चाललेली आहे. पण हिंदू बहुसंख्य असलेला भारत असा एकमेव राष्ट्र आहे ज्या राष्ट्राच्या मानाच्या स्थानावर राष्ट्रपती ह्या पदावर चार मुस्लिम राष्ट्रपती विराजमान होते.

खरंतर भारताने धर्मभेद कधी पळाला नाही. सर्व धर्माचा आदर अन सर्व धर्म समभाव हि भारताची ओळख. म्हणून अनेक परकीय धर्माना देखील भारतात स्थान आहे त्यांची प्रार्थना स्थळे आहेत. भारतावर जितकी परकीय आक्रमणे झालीत त्यातील सगळ्यात जास्त आक्रमणे हि धार्मिक विजय मिळवण्याच्या दृष्टीने होती. हे भारतीयांना माहित असताना देखील भारताने अन भारतीयांनी परकीय धर्माना स्वीकारले. त्यांच्या संस्कृतीचा स्वीकार केला, त्यांना आपलस केलं.

आम्ही अभिमानाने सांगू कि भारत हा इतर मुस्लिम राष्ट्रा सारखा धार्मिक विचारांच्या पिंजऱ्यात अडकलेला देश नाही. तो स्वतन्र आहे. म्हणून तर झाकीर हुसेन , मोहमद हिदयातुल्लाह , फक्रूद्दीन अली अहमद अन अवूल पाकिर जैनुलब्दिन अब्दुल कलाम सारखे व्यक्ती राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. चला ह्या स्वतंत्र भारताच्या ह्या चार राष्ट्रपती बद्दल थोडं जाणून घेऊया.

1.       डॉ. झाकिर हुसेन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. मे १३, .. १९६७ ते मे , .. १९६९ पर्यंत त्यांनी राष्ट्रपतीपद सांभाळले. हुसेन नामवंत शिक्षणतज्ज्ञ होते. १९५७  ते १९६२  या काळात त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून कार्य केले आणि १९६२ ते १९६७ पर्यंत भारताचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. हुसेन यांच्याखाली, जामिया भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी घनिष्ठपणे संबंधित झाले. .. १९६३ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान, भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. भारतीय राष्ट्राध्यक्ष पदावर मरण पावणारे हे पहिले राष्ट्रपती.

 

2.       मोहम्मद हिदायत उल्लाह हे भारत देशाचे ११वे सरन्यायाधीश, सहावे उपराष्ट्रपती १९६९ साली एक महिन्याकरिता कार्यवाहू राष्ट्रपती होते. त्यांनी देशात परदेशांत काही महत्त्वाच्या संस्थांवर सदस्य, उपाध्यक्ष अध्यक्ष या नात्याने काम केले. नागपूर विद्यापीठाच्या कार्यकारी शैक्षणिक मंडळाचे ते एकोणीस वर्षे (१९३४५३) सदस्य होते. दिल्ली पंजाब विद्यापीठाचे कुलगुरू (१९७९८४) जमियत मीडिया हुसनलियत विद्यापीठाचे कुलगुरू (१९६९८५) म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. इंटरनॅशनल लॉ असोसिएशन या संस्थेत त्यांनी भारतीय शाखेचे अध्यक्ष म्हणून काम केले. तसेच भारतीय रेडक्रॉस संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. कार्यकाळ - २० जुलै १९६९ ते २४ ऑगस्ट १९६९. ( ३५ दिवस)

 

 

3.       फक्रुद्दीन अली अहमद हे भारताचे पाचवे राष्ट्रपती होते . १९३५ मध्ये आसामच्या विधिमंडळावर ते निवडून आले आणि अर्थ महसूल मंत्री झाले (१९३८-३९). ‘छोडो भारत आंदोलना (१९४२) त्यांनी सक्रिय भाग घेतला ते स्वातंत्र्य चळवळीत पडले. त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला. १९६६ पर्यंत त्यांनी अर्थ, कायदा समाजकल्याण या खात्यांचे मंत्रिपद सांभाळले. १९६६ ते १९७४ या काळात त्यांनी केंद्रीय मंत्री या नात्याने वीज पाटबंधारे, शिक्षण, औद्योगिक विकास, कृषी . अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. ते राष्ट्रपती असताना त्यांनी इंग्लंड, जर्मनी, बल्गेरिया, हंगेरी, फ्रान्स, इटली, ईजिप्त, सोव्हिएट रशिया, श्रीलंका, इराण . देशांना भेटी दिल्या. तसेच अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समित्यांवर त्यांनी काम केले. त्यांच्या कारकीर्दीतच २५ जून १९७५ रोजी आणीबाणीची जाहीर घोषणा करण्यात आली होती. कार्यकाळ २४ ऑगस्ट १९७४ ते ११ फेब्रुवारी १९७७ ( वर्ष १७१ दिवस)

 

4.       .पी.जे अब्दुल कलाम हे भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तामिळनाडूमधील रामेश्वरम् येथे झाला होता.ते एक एरोनॉटिकल अभियांत्रिक होते. त्यांनी डी.आर डी.. मध्ये कार्य केले भारताच्या अग्नी-, अग्नी- आणि अग्नी- प्रक्षेपण अस्त्रांची निर्मिती केली. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते स्वतः आध्यात्मिक होते, युवकांशी त्यांची नाळ जोडली गेली होती आणि ते सर्व जाती-धर्मातील लोकांमध्ये एकजूट राहावी यासाठी अथक प्रयत्न करत राहिले. त्यांच्यामध्ये विज्ञान, कला आणि अध्यात्म यांचा अनोखा मिलाप होता.  कार्यकाळ - २५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७ ( वर्ष)

 

सचिन कृष्णा तळे

 

 

Monday, 22 November 2021

जाणून घ्या भारतातली सर्वात स्वस्त इलेकट्रीक कार कोणत्या ?

 

जाणून घ्या भारतातली सर्वात स्वस्त इलेकट्रीक कार कोणत्या ?

पेट्रोल डीझेल महाग झालंय अन CNG सुद्धा १०० च्या दिशने वाटचाल करत आहे अश्या अवस्थेत पर्यायी मार्ग हवाच. जो आपल्या खिश्याला परवडेल. इंधन चा तुडवडा अन हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच पेट्रोल डीझेल ला पर्याय म्हणून आपल्याला CNG हा पर्याय उपलब्ध झाला अन लोकांनी मनसोक्त प्रवास केला ते हि कमी खर्चात. जर CNG पेक्ष्या कमी खर्चात तुम्हाला प्रवास करायचा असेल तर ते आता शक्य आहे. ज्यात तुम्हाला  १ किलोमीटर च्या प्रवासासाठी फक्त १ रुपये मोजावे लागणार आहे.  मग हा पर्याय कोणता चला ते पाहूया..

भारता बाहेर अनेक देशात पेट्रोल अन डिझेल चे पंप बंद होत आहे. विद्यमान कॅबिनेट मंत्री गडकरी ह्यांनी सुद्धा एका सभेत हीच ईच्छा व्यक्त केली कि देशातली पंप बंद व्हावे पण ते इतक्यात शक्य नाही. कारण सर्वात मोठा फ़ंड हा ह्याच माध्यमातून सरकार ला मिळत असतो. तर हा पर्याय म्हणजे इलेक्ट्रिक वाहन आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेकट्रीक वाहने रस्त्यावर धावताना दिसतील आणि ती धावत देखील आहेत.  इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक विचारात होते काळजीत होते, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहेत. सध्या ह्या मार्केट मध्ये टाटा , एमजी, ह्युंडई , महिंद्रा ह्याची वाहने आहेत आणि लवकरच मारुती सुद्धा ह्या मार्केट मध्ये उतरण्याच्या तयारीत आहे.

सर्वात स्वस्त इलेकट्रीक वाहन चा विचार केला तर टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक , टाटा टिगॉर अन महिंद्रा ची ई-व्हेरिटो आहे. चांगल्या सेफ्टी सहित कमी खर्चात हि कार आपल्याला उपलब्द होते .  भारतीय बाजारात महिंद्रा ई-व्हेरिटो हि 9.13 लाख ते 11.6 लाख रुपयांदरम्यान आहे जी सिंगल चार्जवर कार 181 किलोमीटरपर्यंत धावते. या कारमध्ये 21.2 kWh लिथियम ऑयन बॅटरी देण्यात आली आहे. टाटा Tigor EV ची किंमत 11.99 लाख रुपयांपासून सुरू होते  टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत 13.99 लाख रुपये ते 16.25 लाख रुपयांपर्यंत आहे. फुल चार्ज झाल्यानंतर टाटा नेक्सॉन 312km पर्यंत धावू शकते. तर टाटा Tigor EV ही कार सिंगल चार्जवर 250 किमीपर्यंतची रेंज देईल, असा दावा कंपनीने केला आहे.

मग वाट कसली पाहताय आजच आपली EV बुक करा अन पर्यावरण वाचावा. चांगले भविष्य आपल्या हातात आहे.

 

सचिन तळे

Thursday, 18 November 2021

वायू प्रदूषण

 

 

भारताची राजधानी दिल्ली आज पुन्हा लॉक डाऊन च्या पायरीवर उभी आहे ती कॉवीड १९ मुळे नाही तर आपल्याच आरामाच्या स्टेटसला शोभणाऱ्या चार चाकी वाहनांमुळे, इंधनाचे अतिप्रमाणात जळण्यामुळे , वाढते बांधकामामुळे.. हो दिल्लीत वायू प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात वाढलंय. दिल्लीने ४७१ सह सर्वात वाईट वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) पातळी नोंदवली आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायर्नमेंट (सीएसई) संस्थेच्या अहवाला नुसार वायू प्रदूषणामुळे दरवर्षी  १० ते ३० हजार लोकांचा मृत्यू होतो. खरतर वायू प्रदूषण मुळे आपल्या आयुष्यातील १० ते २० वर्ष कमी होतात. वायू प्रदूषणाने श्वासाचे रोग, हृदयरोग, ब्राँकायटिस, फुफ्फुसाचा कर्करोग अश्या आजारांना आपण निमंत्रित करत असतो. वाढत्या लोकसंख्या सॊबत रोज वाढणारे वायू प्रदूषण येत्या काही दिवसात भारताला डोकेदुखी ठरणार  ह्यात शंका नसावी. नित्कृष्ट दर्जाच्या हवेमुळे अनेक लोक शहर  सोडून थोडं शहरापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत आहेत  परत्नू हा त्यावर उपाय नाही त्यासाठी क्रांती अन कडक धोरणे राबवणे गरजेचे आहेत. वायू प्रदूषण ही केवळ शहरी भागातील समस्या नाही ती आता गावात हि पोहचली आहे .

 

चिंताजनक बाब म्हणजे आपल्या राज्याची राजधानी मुंबई आणि काही शहरे हि सुद्धा ह्याच मार्गावर आहेत. मुंबई अन मुंबईच्या उपनगर भागात सुद्धा सर्वात वाईट वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) पातळी नोंदवली गेली आहे. जास्त लोकवस्ती, अशुद्ध हवा आणि ऑक्सिजन ची कमतरता भविष्यात मोठा स्फोट घडवू शकतो. ज्याची आपण आता कल्पना करू शकत नाही. फक्त वाहनच नाही तर वायू प्रदूषण ला अजूनही काही घटक कारणीभूत आहेत आणि त्यावर मात करायची असेल अन आपली भावी पिढी जर चांगल्या वातावरणात राहावी अशी ईच्छा असेल तर सरकारची वाट न पाहता आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. शहरीकरणाच्या नादात आपण आजवर अनेक जंगल नष्ट केली. फक्त झाडे लावली कि वायू प्रदूषण रोखता येईल हा गैरसमज आहे. हा गैरसमज खोडून आपण वायू प्रदूषण रोखण्यासाठी अजून काय करू शकतो ह्याचा विचार झाला पाहिजे. तज्ञांनी विचारवंतांनी आपले विचार मांडत जनजगृती करावी अन सरकारने सहकार्य करावं हि अपेक्षा. वायू प्रदूषण कोणकोणत्या घटकामुळ निर्माण होतात ह्याची माहिती  त्याबाबतची जाहिराती येणे गरजेचे आहे .

 

आपल्या डोळ्यसमोरच एक छोटंसं उदाहरण म्हणजे कोविड १९ मुळे गेल्या वर्षी राबवण्यात आलेले कडक लॉक डाऊन. जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर लॉक डाऊन च्या काळात रस्त्यावर वाहने नव्हती , कारखाने बंद होती त्या काळात वायू प्रदूषण खूप कमी झालं होत. वायू ची गुणवत्ता हि सुधारलेली होती. ह्याचा अर्थ असा नाही कि वाहन वापरू नये , कारखाने बंद ठेवावी. वायू प्रदूषण च्या या संकटात आपण फक्त वाहनामार्फत निर्माण होणार प्रदूषण रोखू शकलो नियंत्रित करू शकलो तरी आपण चांगल्या वातावरणात राहू. पेट्रोल आणि डिझेल च्या उपयोग ने आपल्या आसपास किती वायू प्रदूषण होतंय हे सगळ्यांना माहित आहे पण आपल्याकडे पर्याय नाही. CNG हा पर्याय आहे आणि आता इलेक्ट्रिक हा पर्याय आपल्या समोर उभा राहतोय. सध्या हवे त्या प्रमाणात इलेक्ट्रिक स्टेशन नाहीत . CNG चा पुरवठा सुद्धा कमी आहे . पण CNG आणि इलेक्ट्रिक वाहनांची डिमांड आपण वाढवू शकतो . जर डिमांड वाढवली तर सप्लाय वाढतो आणि सप्लाय सोबत सर्विस सुद्धा मिळू लागते.

 

वायू प्रदूषण ला आपण नियंत्रित करू शकतो. आपण शुद्ध हवेत चांगल्या अन निरोगी आयुष्य जगू शकतो फक्त बदल घडवण्याची तयारी हवी.

सचिन कृष्णा तळे

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale