Thursday, 7 May 2026

फाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहास

फाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहास


पाकिस्तानातील मुल्तानमध्ये आजही उभा असलेला तो भग्न खांब… ज्याच्याबद्दल श्रद्धा आहे की त्या खांबातून भगवान श्रीनृसिंह प्रकट झाले होते…तो खांब पाहताना प्रत्येक हिंदूच्या मनात वेदना निर्माण होते. कारण तो फक्त एक दगडी स्तंभ नाही… तो आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि हजारो वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे.




आज त्या जागेभोवती ना भव्य मंदिर आहे, ना आरत्या, ना घंटानाद… उरल्या आहेत फक्त तुटलेल्या भिंती, भग्न अवशेष आणि इतिहासाच्या जखमा.

पुण्यातील सदाशिव पेठेतील जोशी कुटुंबातील श्री अनंत जोशी यांनी २००४ मध्ये पाकिस्तानात जाऊन त्या पवित्र स्थळाचं दर्शन घेतलं. त्यांनी आणलेला हा फोटो म्हणजे इतिहासाचं जिवंत स्मारकच आहे. जिथे भक्ती होती, तिथे आज शांतता आहे. जिथे हजारो दिवे लावले जात होते, तिथे आज ओसाडपणा आहे.



मुल्तान…

जे एकेकाळी “मूलस्थान” म्हणून ओळखलं जायचं.

सूर्योपासनेचं जागतिक केंद्र. असं म्हणतात की मुल्तानचं सूर्य मंदिर इतकं संपन्न होतं की त्याची तुलना आजच्या तिरुपती किंवा पद्मनाभ स्वामी मंदिराशी केली जात असे.

पण फाळणी झाली…

सीमा आखल्या गेल्या… आणि त्या सीमांसोबत लाखो हिंदूंच्या आठवणी, देवस्थानं आणि संस्कृतीही तुटली.

आज पाकिस्तानात असंख्य हिंदू मंदिरं उद्ध्वस्त अवस्थेत आहेत.काहींवर अतिक्रमण झालं, काही गोदामं झाली, काहींचं अस्तित्वच मिटवलं गेलं. तिथे उरलेले हिंदू आपल्या श्रद्धा लपवत जगतात.

आणि दुसरीकडे भारताकडे पाहा…

इथे अजूनही मशिदी सुरक्षित आहेत.

दर्ग्यांवर चादरी चढवल्या जातात.

अजान दिली जाते.

सरकार निधी देते.

कायद्याने संरक्षण दिलं जातं.

भारताने आपल्या संस्कृतीसोबतच इतर धर्मांचाही आदर केला.

कारण भारताचा आत्मा सहिष्णुतेत आहे.

पण प्रश्न हा आहे की .. ही सहिष्णुता एकतर्फीच का दिसते?

फाळणीनंतर भारतात राहिलेल्या मुस्लिम समाजाला संविधानाने अधिकार दिले, सुरक्षा दिली, स्वातंत्र्य दिलं. पण पाकिस्तानात राहिलेल्या हिंदूंना काय मिळालं?

तुटलेली मंदिरं?

भीती?

आणि संपत चाललेली ओळख?

हा लेख द्वेषासाठी नाही… तर स्मरणासाठी आहे.

आपण आपल्या इतिहासाबद्दल बोललं पाहिजे. आपल्या भग्न देवस्थानांबद्दल बोललं पाहिजे. कारण जी संस्कृती स्वतःचा इतिहास विसरते, ती हळूहळू स्वतःचं अस्तित्व हरवते.

आज गरज आहे ती जागृतीची. आपल्या मंदिरांचं, परंपरांचं, इतिहासाचं आणि संस्कृतीचं जतन करण्याची.

कारण मंदिरं ही फक्त पूजा करण्याची जागा नसतात…

ती आपल्या सभ्यतेची ओळख असतात.

मुल्तानचा तो भग्न खांब आजही जणू ओरडून सांगतो आहे .

“संस्कृती जिवंत ठेवायची असेल, तर इतिहास विसरू नका…!”




- सचिन कृष्णा तळे , पुणे 


No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale