Friday, 13 October 2017

राज ठाकरे आणि त्यांची सेना ...


राज ठाकरे आणि त्यांची सेना ...

सत्तेच पारडं हे वर खालीच असतं . हार जीत हे सगळं राजकारणाच्या भूमीवर अन पैश्याच्या खेळावर अवलंबुन आहे . पैसा आणि राजकारण हे एकमेकांना पूरक आहेतं . पैशयाशिवाय राजकारण करता येत नाही तर राजकारणात राहून पैसा कमावलं नाही असा एकही नाही . राजकारणात सत्ता मिळवणारा व्यक्ती त्याची आधीची परिस्तिथी आणि त्याची काहीच वर्षात निर्मण केलेलं विश्व् हे आश्चर्यकारक असत. लोक फारस ह्याचा विचार फक्त नाक्यावर किंवा कट्ट्यावर गप्पा मारताना करतात. आपल्या सोबत असणारा व्यक्ती आज कोट्याधीश होतो आणि आपल्याला मामा बनवतोहार फुले भाजी विकणारे भुजबळ असो किंवा रिक्षा चालवणारे कोणी फुटीर नगरसेवक असो.

राज साहेब ठाकरे ह्यांनी सेनेतुन बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली आणि ह्या महाराष्ट्राला खास करून मुंबईतल्या प्रत्येक व्यक्तीस राजसाहेब ठाकरे ह्यांच्या कडून एक आशा निर्माण झाली. राज साहेब ठाकरे ह्यांनी मराठी मुद्द्याला हात घालत मराठी लोकांच्या मनातून मराठी हृदय सम्राट म्हणून जग जाहीर झालं. त्यांच्या नावाने संपूर्ण भारतभर मराठी मुद्दा गर्जु लागला. जशी ललकारी शिव सेनेत बाळासाहेबांनी दिली तशीच ललकारी राजसाहेब ह्यांची होती . राज ठाकरे ह्यांची बोली , चाल , भाष्य , वक्तव्य हे सगळं पाहता मुंबईकरांना तरुण बाळासाहेब दिसू लागले. मुंबईत मराठी तरुणांना नोकरी मिळू लागली , मुंबईत रिक्षावाले भाडं मिळेल तिथे जाऊ लागले . मुंबईत परप्रांतीय लोकांनी मराठी शिकायला  बोलायला सुरवात केली. मराठी फलक दिसू लागले. तरुणांनी राजसाहेब ह्यांच्या पक्षाकडे धाव घेतली . त्यात कित्येक तरुणांना नवी संधी मिळाली नव राजकीय व्यासपीठ मिळालं.जिथे राजसाहेब ठाकरे ह्यांची सभा भरणार तिथे अलोट गर्दी असणारच . राजसाहेब काय बोलतील ह्यावर राज्यातले प्रत्येक राजकीय लोकांपासून ते सामान्य लोकांची नजर असायची . त्याचे सगळे आंदोलन हे यशाच्या पायरीला स्पर्शून महाराष्ट्राचे उद्धार करणारे आहेत , आताचे रेल्वे आंदोलन हे सुद्धा त्यातलेच. पण राज ठाकरे आणि त्यांची सेना मागे पडणार नाही आणि हार पत्करणार नाही हेच कडू सत्य.
आज बाळासाहेबांची आठवण होणे साहजिकच आहे. कारण नेते घडवणारे  तीनच व्यक्ती ह्या महाराष्ट्रात होते आणि आहेत. बाळासाहेब ठाकरे , शरद पवार आणि राज साहेब ठाकरे. एका सभेत बाळासाहेब म्हणाले होते " सेनेच्या नावावर निवडून आल्यावर , पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणारा , शिवसैनिकांचे विश्वासघात करणाऱ्याला दिसेल तिथे भर चौकात झोडून काढा". बाळासाहेबांनी आणि राज साहेब ठाकरे ह्यांनी कधीच लोक फोडली नाहीत तर लोकांच्या मनात स्वतःच्या पक्षाबद्दल आदर निर्माण करून लोकांना आपलंस केलं . जे फुटले मग त्यात राम कदम असो किंवा आताचे सहा नगरसेवक असो . डोक्यावर मनसेचं फेटा घालून गर्जना करणारे आपले स्व. रमेश भाऊ वांजळे कुठे आणि सत्तेची भीक घेऊन  गट निर्मण करणारे हे सहा नगरसेवक कुठे. आजून तरी आदेश नाही मिळाला नाहीतर सहा विभाग पुन्हा चर्चेत येतील.

जर कोणी पक्ष सोडून जात असतील तर त्या पाठी फक्त पैसा सत्तेची लालच एवढच कारण असू शकत. जर मराठीचा मुद्दा होता मराठी भाषिकांचा मुद्दा होता तर हा विषय मनसेत राहून हि करू शकले असते. म्हणे मराठी माणसाचा पराभव आमच्या जिव्हारी लागला. मुंबईतून मराठी महापौर हटवण्याची भाषा भाजपने केल्याचं आपल्याला रुचलं नाही. त्यामुळे मराठी माणसाच्या हितासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया सेनेत प्रवेश केलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी व्यक्त केली . असे जरी असले तरी मराठीचा मुद्दा आणि मराठी माणसासाठी दिलीप लांडे उर्फ मामा किती लढले हे दाखून द्यावं. जर मनसेच्या सत्तेच्या वाटेत जे मराठी मुद्दे राजसाहेब ठाकरे ह्यांनी उचलले होते तेव्हा तुम्हच मराठी बद्दल प्रेम का फुटलं नव्हतं. आजून लोकांची किती फसवुनूक करणार तुम्ही . खरचं मराठी मुद्दा आणि मुंबईत मराठी टिकावी ह्यासाठीच शिवसेनेच्या पदरी गेलात कि भाजप च्या किरीट सोमय्या ह्यांनी केलेले आरोप खरे तर नाही ना ? जमल तर लोकांची प्रश्नांची उत्तरे हि द्या ? महाराष्ट्र नवनिर्माण सेना हि फक्त मराठी आणि महाराष्ट्रा साठी राज साहबे ठाकरे ह्यांनी निर्माण केली आणि स्वतःला भर सभेत महाराष्ट्राच्या उद्धार करण्यास वाहून घेतलं.

शेवट इतकच राज ठाकरे आणि त्यांची सेना हि मराठी भाषेसाठी , महाराष्ट्रासाठीच लढणार आणि त्यासाठीच राजकारण समाजकारण करणार !

सचिन कृष्णा तळे
7709099646
  
पुणे


No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale