Monday, 28 February 2022

मराठी वाङ्मय परिषद

 

मराठी वाङ्मय परिषद

 


साहित्य प्रकाराची स्वतःची अशी एक परिवर्तनशील संकेतव्यवस्था आहे. साहित्य हे सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब असून साहित्यात प्रगट होणारा जीवनाशय तसेच त्याची आविष्कार पद्धती ह्या सर्वांना एक संदर्भ असतो. कविता, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, निबंध, ललित लेखन, व्यक्तिचित्र हे वाङ्मय चे प्रकार असून लेखक त्याच्या मनाला भावेल त्या शब्दात लेखन करत असतो. आज विज्ञानाच्या संगणकाच्या युगात इंग्रजी भाषेच्या वाढत्या उपयुक्ततेमुळे प्रभावामुळे महाराष्ट्रात जिथे मराठीची अत्यंत वेगाने पीछेहाट होत आहे ती पाहता मराठी वाङ्मय साहित्य मोठ्या प्रमाणत निर्माण होऊन ती तरुण मराठी वाचकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. जर हि अवस्था महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्रा बाहेर सर्वाधिक मराठी बोली बोलणाऱ्या बडोद्या ह्या शहरात काय असेल ह्याचा विचार वेळोवेळी गायकवाड घराण्यांनी केला.

 

देशी भाषांना उत्तेजन देण्यासाठी बडोद्याचे पु. श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराजांनी अनेक गोष्टी केल्या. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन कै. चिं.वि. जोशी व कै. डॉ. वि.पां. दांडेकर यांनी ८ फेब्रुवारी १९३१ रोजी मराठी वाङ्मय परिषद, बडोदे या संस्थेची स्थापना केली. कोणत्याही देशाचा विकास व समृद्धी या बाबी त्या देशातील माणसांची मानसिक जडणघडण व सुसंस्कृतता यावर अवलंबून असतात अन संस्कृतीचे यथायोग्य प्रभावी दर्शन जर कशातून घडत असेल तर ते तिला अभिव्यक्त करणाऱ्या भाषेतून आहे. इ.स. १९३१ मध्ये या संस्थेची स्थापना झाल्यापासून आजतागायत संस्थेची एकूण चौसष्ट अधिवेशने झाली आहेत. वि. दा. सावरकर, आचार्य अत्रे, पु. ग. सहस्रबुद्धे , कवी अनिल, विजया राजाध्यक्ष, कवि कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, डॉ. भालचंद्र नेमाडे, विश्वास पाटील, विजय कुवळेकर, डॉ. अरुणा ढेरे, कुमार केतकर, सुरेश खरे, प्रतिभा रानडे, अशा नामवंत साहित्यिकांनी या अधिवेशनांचे अध्यक्षपद विभूषित केले आहे.

 

मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे.’ या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवप्रसंगी संस्थेला दिलेल्या निधीच्या व्याजातून प्रतिवर्षी एक किंवा दोन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. व्याख्यानमालेअंतर्गत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षास अथवा अन्य व्यासंगी साहित्यिकास-विचारवंतास निमंत्रित करून त्याच्या ज्ञानाचा व व्यासंगाचा, महाराष्ट्रापासून दूरवर राहून आपली भाषा व संस्कृती यांचे जतन करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या आणि वाङ्‌मयाचा आस्वाद घेण्यास व साहित्यातील नवनव्या प्रवाहांचे ज्ञान करून घेण्यास उत्सुक असलेल्या रसिकांना लाभ घेता यावा, हा यामागील उद्देश आहे. ह्या तीन दिवसांच्या अधिवेशनांखेरीज अनेक छोटे मोठे उपक्रम वर्षभर परिषदेतर्फे राबविण्यात येतात.

 

मराठी भाषिक आणि मराठीबद्दल आस्था बाळगणाऱ्या इतर भाषिक साहित्यप्रेमी रसिकांना एकत्र करून वाङ्मयची विविध दालन त्यांना खुली करून देऊन त्याद्वारे बृहन्महाराष्ट्रात मराठी भाषेची अस्मिता जोपासणे , तिचे सवंर्धन करणे व लेखक वाचक याना संपन्न करणे हे मुख्य उद्दिष्टे ह्या संस्थेची आहे.

 

सचिन कृष्णा तळे

७७०९०९९६४६

 

 

 

Tuesday, 22 February 2022

विदर्भ साहित्य संघ

 



विदर्भ साहित्य संघ ही संस्था आता शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. विदर्भातील सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना म्हणून संस्थेची ओळख आहे. विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा ईशान्य दिशेला असणारा प्रदेश. विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली हे जिल्हे येतात. ह्या जिल्ह्यांच्या सीमेला हिंदी भाषिक ह्यांचा प्रभाव जास्त दिसून येतो त्यामुळे मराठी भाषा संवर्धन होणे इथे गरजेचे होते. विदर्भ हा महाराष्ट्र राज्यात सामिल व्हावा म्हणून दि. २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर येथे एक करार करण्यात आला त्यानुसार विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात सामील करून घेण्यात आले. राजकीय अन सामाजिक भूमिकेतून निर्माण झालेले अनेक चळवळी, तसेच ऐतिहासिक घटनेचा प्रभाव ह्या भागात दिसून येतो आणि ह्या सगळ्या घडामोडीचा एकमेव साक्षीदार म्हणजे विदर्भ साहित्य संघ ही संस्था आहे.

 

मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा सर्वांगीण विकास साधने हे या संस्थेच्या कार्याचे मुख्य स्वरूप असल्याने संस्था त्या योगे साहित्य संमेलनांचे आयोजन, नवीन लेखकांना प्रोत्साहन देणे, नवीन पुस्तके प्रकाशित करणे, विदर्भातील साहित्य जगताला जोडण्यासाठी नियतकालिक चालवणे आदी भरीव स्वरूपाची कामे विदर्भात करीत आली आहे. १३ आणि १४ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे दादासाहेब खापर्डे यांच्या पुढाकाराने साहित्य संमेलन भरविण्यात आले होते. खापर्डे यांनी तेव्हा आताचा विदर्भ, मराठवाडा, हैदराबाद आणि मध्य भारत येथील रसिकांना आमंत्रित केले होते. त्यामुळे ग्वाल्हेर ते छिंदवाडा अशा विविध हिंदी राज्यातील मराठी भाषक या संमेलनासाठी अमरावतीत एकत्र आले होते. या संमेलनाच्या अखेरच्या दिवशी, १४ जानेवारी १९२३ रोजी खापर्डे यांनी विदर्भ साहित्य संघाची स्थापना करण्याची घोषणा केली. त्यानंतर मार्च १९५०मध्ये तिचे मुख्य कार्यालय नागपूरला हलवण्यात आले. संस्थेतर्फे मराठी साहित्याचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले जातात. १९४६सालापासून विदर्भ साहित्य संघ हा 'मराठी साहित्य परीक्षा' घेत आला आहे आणि यांत सर्वाधिक विद्यार्थी सहभागी होतात. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांसाठी उत्कृष्ट सराव म्हणून त्या सिद्ध झाल्या आहेत.

 

विदर्भ साहित्य संघाच्या ५५ हुन अधिक शाखा आहेत. त्यांचा विस्तार  जितका मोठा आहे तितकाच त्यांचा वाचक वर्ग हि. दरवर्षी १४ जानेवारीला विदर्भ साहित्य संघाचा वर्धापनादिन साजरा होतो. या दिवशी काही खास पुरस्कार जाहीर करण्यात येतात. विदर्भ साहित्य संघाचे ’युगवाणी या नावाचे एक साहित्य विषयाला वाहिलेले त्रैमासिक आहे तसेच संघाच्या गोंदिया शाखेमध्ये 'भवभूती रंगमंदिर' नावाचे नाट्यगृह हि आहे. संस्थेचे नाव ‘विदर्भ साहित्य संघ’ असले तरी त्यात मराठवाडा आणि मध्य भारताचा मोठा भूप्रदेश सामावला आहे.


सचिन कृष्णा तळे पुणे 

७७०९०९९६४६



Wednesday, 2 February 2022

विश्व मराठी परिषद

 



 

मराठी माणसाचा स्वभाव जसा कठोर , पराक्रमी , धाडसी आहे तसाच तो भोळा आणि समोरच्या व्यक्तीचा जास्त विचार करणारा आहे. तो इतरांचाच जास्त विचार करतो म्हणून तर इतर भाषिक बांधवांबरोबर बोलताना त्यांना त्रास होऊ नये म्हणून तोच मराठी ऐवजी हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलायला सुरवात करतो. मराठी माणूस हा एकमेकांचे पाय खेचतो , एकमेकांना सहकार्य करत नाही, एकजूट नाही अशी बोंब कायम ऐकायला मिळते. मराठी माणूस हा आज जगाच्या कानोकोपऱ्यात पोहचला आहे. मोठ्या उद्योगात, मोठ्या पदावर तो आहे अश्या वेळी हा नुन्यगंड बाजूला सारून प्रत्येक मराठी भाषिकांनी एकत्र यावे. भारताबाहेर जगभरामध्ये सुमारे ६० हून अधिक देशांत सुमारे एक कोटी मराठी बांधव राहत आहेत. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतामधील इतर राज्यांमध्ये जे मराठी बांधव आहेत; त्यांनाही मराठी भाषा, साहित्य,  संस्कृती आणि मराठी माणसांच्या विकासाविषयी  रुची आहे. अश्यावेळी जगभरतल्या प्रत्येक मराठी माणसांनी मिळून एक वैश्विक मराठी समाज निर्माण केला पाहिजे. ह्याच  संकल्पनेवर आधारित विश्व् मराठी परिषद ची मशाल हि पुण्यात पेटवली गेली.

 

विश्व् मराठी परिषदेचा मुख्य उद्धेश एकमेकांच्या मदतीने असा जागतिक मराठी समाज घडवायचा की मराठी माणसाला सर्वत्र सन्मान मिळेल, मान्यता मिळेल, त्याची प्रगती होईल. सक्षम , संपन्न , समृद्ध असे वैश्विक मराठी ब्रँड तयार करणे ह्याच मुख्य उद्दिष्टेवर परिषदेचं कामकाज चालू आहे. विशेषत: मराठी माणूस हा आर्थिक दृष्ट्या संपन्न आणि समृद्ध होईल. साहित्य, संस्कृती आणि उद्योजकता या तीन आयमांना केंद्रस्थानी ठेवून सध्या विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार होणारे मुक्त व्यासपीठ , प्रत्येकाचा सहभाग आणि आपल्या निर्मितीचा सर्वदूर प्रसार हेच विश्व मराठी परिषदेचं खास वैशिष्ट्य आहे. विविध प्रकारची उपयुक्त माहिती सर्वाना उपलब्द करून देणे, विविध प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या संस्थांचा परिचय करून देणे , देश विदेशातील नोकरीची संधी पोर्टलद्वारे उपलब्द करून देणे , महाराष्ट्रातील संस्थांना विदेशातून साहाय्य मिळून देणे , १२ कोटी मराठी बांधवाना साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना साहित्याची गोडी निर्माण करून देणे , जास्तीत जास्त लेखक कसे तयार होतील ह्या दिशेने कार्यक्रम घेणे , मराठी ब्लॉग लिहिणाऱ्या लेखकांना सन्मानित करणे , जास्तीत जास्त इ बुक्स ऑडिओ बुक साठी प्रयत्न करणे , देशविदेशात संमेलन घेणे , लेखक कवी ह्यांची ओळख त्यांचे साहित्य महाराष्ट्रा बाहेरील मराठी वाचकांपर्यंत पोहचवणे, बाल साहित्य महोत्सव आयोजित करणे असे महत्वपूर्ण कौतुकास्पद भव्य कार्य विश्व मराठी परिषदेतून केले जाते.

 

 सचिन कृष्णा तळे  , Pune 

7709099646

 

 

 

 

 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale