महाराष्ट्र साहित्य
सभा,
इंदूर
पुण्य
श्लोक पहिले बाजीराव यांनी उत्तरदिग्विजय केल्यानंतर मल्हारराव होळकर माळव्याचे सुभेदार झाले. त्यांनी इंदूरला राजधानी केली. त्यांच्या बरोबर मराठी भाषा व संस्कृतीचे या
इंदूर नगरी पदार्पण झाले. या प्रदेशाला मराठी
साहित्य निर्मीतीची परंपरा १८६१ पासून आहे. बाळकृष्ण मल्हार हंस, एकनाथ शास्त्री करकंबकर प्रभुतींनी दर्जेदार लिखाण करून मराठी साहित्य निर्मतीचे बीज इंदूर या शहरात पेरले.
हीच साहित्य परंपरा चालू ठेवण्यासाठी इथल्या मराठी वाचकांना स्वतंत्र व्यासपीठ असावे या हेतूने १८
सप्टेंबर १९१५ रोजी महाराष्ट्र साहित्य सभेची स्थापना झाली.
इंदूरच्या
गजबजल्या महात्मा गांधी मार्ग या क्षेत्रात या
संस्थे जवळ स्वतःच्या मालकीची चार मजली प्रशस्त भवन आहे. साहित्यिक कार्यक्रमासाठी भा. रा. तांबे सभागृह आहे. वाचनालय साठी एक मोठा हॉल
आहे. ५ फेब्रुवारी १९१९
ला संस्थे मार्फत ग्रंथालयांची स्थापना झाली. ३५ हजाराहून अधिक
ग्रंथ या ग्रंथालयात आहे.
विशेष म्हणजे ग्रंथालयात असलेल्या सर्व पुस्तकांचे संगणीकरण करण्यात आलेले असून शंभर सवाशे वर्षांपूर्वी ची दुर्मिळ ग्रंथ
देखील जतन करून ठेवलेले आहेत. या संस्थेची आवर्जून
उल्लेख करावासा वाटतो, ती म्हणजे मराठी
साहित्य सभेने मध्यप्रदेशातील मराठी साहित्याचा इतिहास लिहिण्याचे कार्य हाती घेतले आहे. संस्थेतर्फे शारदोत्सवच्या वेळेस दर वर्षी "मालविका"
हि समरणिका देखील प्रकाशित केली जाते. साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या साहित्यिकांना दरवर्षी होळकर राज्याचे पंतप्रधान श्री. वि. सी. सरवटे ( तात्यासाहेब सरवटे पुरस्कार ) देण्यात येतो.
शारदोत्सव
साहित्य संमेलनात आजवर अनेक नामवंत साहित्यिकांनी अध्यक्ष पद भूषवले आहे
त्यात आचार्य केशव अत्रे, ग. द. माडगूळकर,
कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, श्रीमती शांता शेळके, मधू मंगेश कर्णिक, प्रवीण दवणे, अरुण साधू इ. आहेत. लहान
मुलांना मराठी वाचनाची गोडी लागावी म्हणून बालवाचनाची स्थापना करण्यात आली. ह्या बालवाचनात २५०० हुन अधिक बालसाहित्य आहे आणि ह्या बालवाचनालय ला कोणतेही शुल्क
आकारले जात नाही. इंदूर मधील आकाशवाणीवर मराठी चा एकही कार्यक्रम
नव्हता यासाठी या संस्थे अंतर्गत
दिल्ली येथील आकाशवाणीवर इंदूरमधील मराठी माणसांचा प्रचंड मोर्चा ११ मी १९७९
रोजी गेला अखेर या आंदोलनाला २९
जून १९८० रोजी यश आले आणि
दर रविवारी काही तास मराठी कलावंतांसाठी राखून ठेवण्यात आला.
या
सभेचे अध्यक्ष श्री अश्विन खरे अन त्यांचे नव
निर्वाचित कार्यकारणी इंदूर या शहरात मराठी
अकादमी स्थापनेसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. अखिल भारतीय साहित्य महामंडळाने या सभेची दखल
घ्यावी अशी या सभेची इच्छा
आहे. १९१७ , १९३५ अन २००१ साली
जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले तेव्हा महत्वपूर्ण सहभाग हा महाराष्ट्र साहित्य
सभेचा होता. "इंदूर या प्रदेशात बहुसंख्य
प्रजाजनांची भाषा हि हिंदी असल्याने
तिचा स्वीकार करत मातृभाषेच्या म्हणजे मराठीच्या सेवेत तप्तर असणे हे आमचे कर्तव्य
आहे" ह्या एकवेम कर्तृत्वावर महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्य चालू आहे.
