Thursday, 20 July 2023

भारताच्या “सीमा” आज सुरक्षित आहेत का?

 

भारताच्या “सीमा” आज सुरक्षित आहेत का?

 

भारतीय गणराज्यात २८ राज्यांपैकी १७ राज्य हे दुसऱ्या देशांच्या सीमांना लागून आहेत. भूसीमा आणि जलसीमा अश्या दोन प्रकारा पैकी भारताला १५२०० किमी चा भूसीमा लाभला आहे. बांग्लादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भुटान आणि अफगाणिस्तान हे प्रामुख्याने आपल्या देशाच्या सीमेवरील देश. ह्या शेजारील देशांपैकी काही देशांची मानसिकता आणि आपल्या बद्दल असणारे त्यांचे मनसुबे हे जगजाहीर आहेत. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज आपल्या देशात आहेत परंतु या विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य अन ह्या भारताची जागतिक स्तरावर होणारी प्रगती शेजारील देशांना न आवडणारी आहे. त्यामुळे भारताच्या देशांतर्गत वातावरण कसं ढवळून काढता येईल ह्याचा ते सदैव प्रयत्न करत असतात. 'भा' म्हणजे तेज व 'रत' म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत होय. मग जो तेजात रममाण झालाय त्याला विचलित कसं करता येईल हाच त्यांचा मुख्य हेतू आहे.

 

सर्वगुण संपन्न असा असलेल्या भारताच्या सीमा आज सुरक्षित आहेत का? हा गंभीर प्रश्नचिन्ह आज पुन्हा उपस्तिथ होत आहे. साहजिकच हा प्रश्न आज सर्व भारतीयांना पडला पाहिजे. कारण भारतात कोणीही सहज येऊ शकत. ह्याच जिवंत आणि ताज उदाहरण म्हणजे "सीमा हैदर" ची पाकिस्तानातून नेपाळ मार्गे भारतात प्रवेश. एक २२ वर्षाची पाकिस्तानी महिला सोबत चार लहान मुलांना घेऊन भारतात नोएडा येथे येते, काही दिवस काही महिने ती सहज राहते. ना तिची चौकशी होते ना विचारपूस. पण जेव्हा तिच्यावर बातम्या रंगू लागतात चर्चा होते, तिच्या प्रेम कहाणीला चित्रपटातील कथेशी जोडून रंगून सांगितलं जात, तेव्हा तिची खरी ओळख जगासमोर येते. तिची विचारपूस होते. तिला अटक होते. तिचा नवरा, तिच्या साठी धमकी देणारे शस्त्र धारी आतंकवादी, पाकिस्तानी मीडिया आणि लोकांचे जनमत हे सर्व काही असं दाखवलं गेलं जस काही सीमा हैदर च्या बाबतीत पाकड्यांचे कोणतेच षडयंत्र नाही. सीमा हैदर शी निगडित जे जे कागदपत्रे आणि पुरावे मिळत चालले ते सर्व संशयात्मक आहेत. तिचे नातेवाईक हे पाकिस्तान सैन्यात देखील आहेत अशी माहिती समोर येतीय. जर तिचे आतंकवादी संघटनेशी काही संबंध असतील तर तिची सखोल चौकशी झालीच पाहिजे पण त्याआधी तिला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पहिजे. विना कागदपत्र अनधिकृती पणे लपून देशाची सीमा ओलांडणे हा गुन्हा आहे. सीमा हैदर प्रकरणातून हे सिद्ध होतंय कि नेपाळ आणि पाकिस्तान च्या सीमा मजबूत नाही. तिथे हवी तशी चौकशी केली जात नाही. आज न जाणे सीमा हैदर सारखे कित्येक पाकिस्तानी भारतात राहत असतील, येत असतील.

 

नेपाळ, भूटान आणि म्यानमारच्या सीमांवर लोक सहज ये-जा करू शकतात. त्यात बांग्लादेशच्या सीमेतून घुसकोरी च्या घटना जास्त दिसून आलेत. पुराव्या सहित काहींनी हे सिद्ध केलंय कि भारताच्या सीमा ओलांडून भारतात सहज येता येत. त्यात बांग्लादेश मधील नागरिकांची संख्या जास्त आहे. आपल्या पुण्यात देखील काही बांग्लादेशी नागरिकांना पकडून त्यांच्यावर कारवाई झाली आहे. घुसखोरांना भारतात शिरण्यापूर्वी ‘उडिया, ‘बंगाली, ‘असमिया आणि ‘हिंदी भाषा शिकवण्याचे  केंद्रेही उभारण्यात आले आहेत. घुसून आलेले प्रथम पडीक सरकारी जमिनींवर तळ ठोकतात व स्वस्त मजूर म्हणून शहरात लोकप्रिय बनतात. या घुसखोरांमुळे होणारा आर्थिक लाभ पाहता, शासकीय यंत्रणेला लाच देऊन त्यांना तेथे स्थायिक होण्यास कंत्राटदार व व्यापारी साह्यभूत ठरतात. कालांतराने त्यांच्याकडे भारतातील सर्व सरकारी कागदपत्रे तयार होतात.

 

महिलांना लव्ह जिहाद च्या नावाखाली त्यांना पळवून नेणे व अवैध व्यापार करणे इत्यादी घटना अनेक बांगलादेशी आणि रोहिंग्या बहुसंख्य गावात करत आहेत. तिरंगा जाळणे, राष्ट्रीय सणात दहशतीचे वातावरण पसरवणे, घरफोड्या, चोर्‍या अश्या घटनेत हि घुसकोरी केलेले आढळून आलेत.  कायदा व सुव्यवस्था धोक्यात येते, हा पहिला परिणाम आहे. तर देशातील कामगारांच्या पोटावर पडणारा पाय हा दुसरा परिणाम. स्वस्त दरात काम करणार्‍या बांगलादेशींना जेव्हा येथील व्यापारी व कंत्राटदार जवळ करतात, तेव्हा भारतीय मजूर मात्र बेरोजगारीच्या आणि उपासमारीच्या संकटात सापडतो. संपूर्ण भारतात घुसून बसलेल्या बांगलादेशींचा, आपल्या देशावर पडणारा आर्थिक बोजा हा आणखी एक स्वतंत्र परिणाम आहे. त्याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.

 

भारत आणि बांग्लादेशच्या सीमेवरची घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर २०१९ मध्ये एक अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. सीमेवर स्मार्ट फेन्सिंगला सेन्सर बसवलेले आहेत. यामध्ये डाटा नेटवर्क, ओएफसी केबल, डीएमआर कम्युनिकेशन, दिवसरात्र हालचाली टिपणारा कॅमेरा ही सगळी यंत्रणा आहे. ही अत्याधुनिक यंत्रणा सीमा सुरक्षा दलाच्या कंट्रोल रूममध्ये सगळी माहिती पोहोचवते. एखादा अतिरेकी भारतात काही घातपात करतो तेव्हा त्याला भारतातले पत्ते, महत्त्वाची ठिकाणे, वाहतुकीच्या सोयी, पासपोर्ट, मोबाईल कार्ड, फोन, राहण्याची जागा इत्यादी गोष्टी आपोआप मिळत नाहीत. कोणी तरी स्थानिक व्यक्ती त्यांना मदत करत असतेच, माहिती देत असते. म्हणूनच या घातपाती कारवाया यशस्वी होतात. घुसखोरी करून भारतात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांना त्यांची ओळख पटवून त्यांच्या देशात परत पाठवले पाहिजे आणि या लोकांना भारतात राजकीय आणि अन्य सर्व प्रकारचा आश्रय देणार्‍यांविरुद्ध, मग ते राजकीय नेते असले तरी, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. खरंतर भारताचे शासन अशा घसुखोरांना मदत करते. त्यांना रेशनकार्ड व निवडणुकीचे ओळखपत्र मिळवून देण्याचे काम आपलेच अधिकारी करतात. पाच हजारांचे ‘पॅकेजदिले की, त्याला बांगलादेशातून उचलून भारतीय शहरापर्यंत सुखरुप आणण्याचे सारेच काम उघड पणे केले जाते. आज भारतात राहत असलेली मुस्लिम लोकसंख्या हि पाकिस्तान पेक्ष्या जास्त आहे. भारतीय मुस्लिमांना भडकावून त्यांना दंगलीस प्रोत्साहन देण्याचे कार्य हीच मंडळी करतात. भारतात अशांतता निर्माण करून भारताचे लक्ष्य विचलित करण्याचे कार्य असो किंवा भारताची प्रतिमा खराब करण्याचे कार्य असो हि मंडळी ह्यात माहीर आहेत. म्हणून आपण आपल्या शेजारी, आपल्या गावात कोण नवीन व्यक्ती राहत असेल तर त्याची माहिती ठेवणे गरजेचे आहे. सीमेवर आपले सैनिक आहेतच पण नागरिकांनी सतर्कता दाखवली पाहिजे नाहीतर सीमा हैदर अन कसाब सहज भारतात भारतीय नागरिक म्हणून देशांतर्गत धार्मिक द्वेष पसरू शकतात. म्हणून सावधान हिंदुस्थान. 

 

सचिन तळे 

Monday, 17 July 2023

परिचय - सचिन तळे

 नाव - सचिन कृष्णा तळे

पत्ता - तिरुपती निवास,लेन नंबर , सुखसागर भाग १, कात्रज , पुणे

शिक्षण - बी कॉम

दूरध्वनी – ७७०९०९९६४६

ब्लॉग  - https://sachinktale.blogspot.com/

राजकीय सत्तेशिवाय तुम्ही लढू शकत नाही म्हणून मार्च २००९ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सांगली जिल्हा सह संपर्क प्रमुख म्हणून पदभार स्वीकारत एका राजकीय प्रवासाला सुरवात झाली. २००९ मध्ये सचिन तळे यांच्या नेतृत्वखाली सांगली समाज कल्याण अधिकारी कार्यालयातील आंदोलन यशस्वी झाले आणि जिह्ल्यातील ४२ हजार ५०५ विद्यार्थींना २८ कोटी ४९ लाखाचा धनादेश वाटप झाला. शाळेची फी वाढ असो किंवा शाळेवरील अनधिकृत टॉवर तर कधी शाळेत घडलेल्या विनयभंगाच्या घटना सचिन तळे यांनी आवाज उचलून धरला. मुंबईतील ग्रंथालय वाचवण्यासाठी "ग्रंथालय वाचवा, वाचन संस्कृती जपा" हि मोहीम राबवली. विद्यार्थी वर्गांसाठी अनेक उपक्रम राबवून मुंबई उपनगर अन सांगली जिल्ह्यात

 राज्यातील ३८ हजार ४८ शाळांमध्ये स्वयंपाकगृह बांधण्यासाठी २००८ -०९ या वर्षी केंद्रातून २२८ कोटी २८ लाख मंजूर झाले परंतु काही कारणास्तव हि योजना तशीच पडून होती. सचिन तळे यांनी त्या योजनांचा पाठपुरावा केला आणि २०१६ मध्ये हि योजना पूर्ण झाली.

  माहितीच्या अधिकाराखाली अनेक माहिती गोळा करून सरकार दरबारी बसलेल्या अधिकारी वर्गाला प्रश्न विचारायचं काम सचिन तळे यांनी केले. महापालिकेचे १० मंडई खाजगी बिल्डरच्या घश्यात पालिकेने टाकली यावर असो किंवा मिठी नदीवरील अतिक्रमणांचा विषय असो किंवा पालिकेतील १० हजारी गुणवंतेचे कौतुक असो किंवा पुण्यातील ऐतिहासिक घोरपडे घाट सुशोभीकरण असो. अश्या अनेक महत्वपूर्ण विषय सचिन तळे यांनी त्यांच्या कार्यकाळात हाताळले. पुण्यातील बसमध्ये गरोदर महिलांसाठी राखीव सीट असावी यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले.

 पुण्यातील शुक्रवार पेठेतील साहित्य चपराक च्या साप्ताहिक आणि मासिकातून त्यांचे लेख अन कविता प्रकाशित होऊ लागल्या. हळू हळू हा साहित्य प्रवास चित्रपट श्रुष्टि कडे वळला अन " कन्फयुज " या मराठी चित्रपटात गाणी त्यांनी लिहिली तर " डॉ. तात्याराव लहाने " या चित्रपटात अलका कुबल यांच्या स्वरात चित्रपटाचा शेवट लिहिला. "कस्तुरी" ह्या प्रकशित झालेल्या मालिकेची १५ एपिसोड लिहून पूर्ण केले.

 अनेक वृत्तपत्रातून साप्ताहिकातून मासिकातून त्यांच्या कविता , लेख , पुस्तक परीचय, मुलाखत प्रकाशित झाले. दैनिक पुण्य नगरीतून संस्था परिचय हा सदर गेली दोन वर्ष त्यांनी चालवला. सावरकरांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकावर गद्य पद्य लिखाण तसेच "रंगा" या नावाची एक कादंबरी लिहून पूर्ण झाली आहेनोकरी संभाळून समाजसेवा आणि स्वतःच छंद आवड जोपासत सचिनजी यांचे कार्य चालूच आहे.

 चित्रकार , लेखक , कवी , गीतकार तर कधी सामाजिक अन राजकीय कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख समाजात निर्माण होत गेली. अश्या ह्या चळवळ्या धडपड्या कार्यकर्त्याचे पहिले पुस्तक १५ ऑगस्ट २०२३ रोजी मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे प्रकाशित झाले. "दरवळ मराठी साहित्य संस्थांचा " या त्यांच्या पहिल्या मराठी पुस्तकाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ,अन वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे शुभेच्या संदेश देखील मिळाला.


Wednesday, 12 July 2023

भारताच्या हृदयस्थानी विसावलेले पारशी

 भारताच्या हृदयस्थानी विसावलेले पारशी





दुधात साखर जशी मिसळावी तसा हा शरणार्थी असलेला पारशी समाज भारताच्या संस्कृतीत असा काही मिसळला कि आज हि भारतीयांना या समाजाचा त्यांचा कार्याचा अभिमान वाटतो. ह्या भारत खंडावर अनेक धर्माचे अनेक देशाचे शरणार्थी देश सोडून स्थायिक झाले. पण त्या सर्वांमध्ये पारशी हा एकमेव धर्म समाज आहे ज्याने भारतीय संस्कृतीला जराही ठेच पोहचवता सदैव भारताच्या विकासासाठी योगदान  दिले आहे. आजही परकीय धर्मापासून देशांतर्गत सदैव दंगे दिसून येतात. पण पारशी धर्मातील लोकांमुळे दंगे झाले हे फार कमी प्रमाणात आहे. इतिहासाच्या पानांवर इराणच्या मातीत जन्मलेला अन एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक असलेल्या पारशी धर्म इस्लामी कट्टरतेच्या अन धर्मप्रवाहाच्या प्रवाहात स्वतःच अस्तित्व गमावून बसला.पारशी - इराण मध्ये अरब मुस्लिमांनी आक्रमण केल्यावर एक मोठा गट तिथून . ८०० च्या दरम्यान निसटला आणि गुजरात वाटे भारतात स्थलांतरित झाला. इराण चा मूळ पारशी धर्म हा इस्लामीकरणाच्या जबड्यात असा काही अडकला कि त्यांना धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारणे भाग पडला. आजच्या घडीला इराण हा मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित आहे. सुमारे १८५० नंतर यातील अजून काही लोक भारतात आले. त्यांना इराणी म्हणतात. आपल्याला आसपास अनेक इराणी उपहारगृहे सहज दिसतील ते हीच मंडळी चालवीतात. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरात राज्यातील दुर्गम अशा ठिकाणी एक गाव आहे उदवाडा. या परिसरातील संजन समुद्रकिनाऱ्यावर पारशी समुदायातील लोकांनी १२०० वर्षांपूर्वी आपलं पहिलं पाऊल ठेवलं. भारतात खऱ्या अर्थाने अल्पसंख्यांक असलेला हा समुदाय या समुदयातील व्यक्तींनी भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या कर्तृत्वाची चुणूक वेळोवेळी दाखवून दिली आहे. भारताचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य बदलणाऱ्या पैकी काही लोक हे पारशी समाजातून आहेत.  पारशी समुदायाने आपल्या कर्तृत्वाने भारतीय समाजाच्या प्रगतीत उल्लेखनीय असं योगदान दिलं आहे. भारतात मिळालेल्या प्रेमाची, सद्भावनाची अन आपुलकीची जाणीव पारशी लोकांनी ठेवली आणि त्याची परतफेड म्हणून त्यांनी सदैव भारताच्या प्रगतीचाच विचार केला. स्वातंत्रपूर्व काळात अफूचा व्यवसाय करून त्यांनी भारतभर उद्योग प्रणाली उभी केली.

 

अर्दशिर गोदरेज-

मुलीच्या लग्नासाठी कपाट खरेदी करायचे असो की दुकानासाठी तिजोरी, सगळ्यात आधी मनात विचार येतो तो एकाच भारतीय ब्रँडचा. तो म्हणजे गोदरेज कंपनीचा. आजही गोदरेज हा भारतातील लोकांचा आवडता ब्रँड आहे. ही देशातील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक आहे. मे १८९७ रोजी अर्देशीर गोदरेज यांनी वकिलीची पहिली आवड सोडून एका शेडमध्ये गोदरेज ग्रुप सुरू केला. त्यांनी लक्षात घेतले की परदेशात बनवलेल्या कुलूपांमध्ये इंटिग्रेटेड स्प्रिंग होते, जे बऱ्याचदा तोडले जाते. यामुळे त्यांचे कुलूप इंग्लंडमधून आयात केलेल्या लोकांपेक्षा अधिक किफायतशीर झाले. यानंतर त्यांच्या या कुलूपाची विक्री खूप वाढू लागली. अर्देशिर गोदरेज हे अत्यंत खटपट्या स्वभावाचे उद्योजक होते. कुलुपाच्या यशानंतर कधी आंघोळीचा साबण, फर्निचर, फ्रिज अशा अनेक उद्योगांमध्ये गोदरेज कंपनीने हात आजमावला. सध्या प्रॉपर्टी व्यवसायातही गोदरेज कंपनीचं नाव आघाडीवर आहे. १९५१ साली स्वतंत्र भारतात पहिल्या लोकसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांसाठी गोदरेज कंपनीने सुमारे १७ लाख मतपेट्या (बॅलेट बॉक्स) बनवल्या होत्या.

 

दादाभाई नौरोजी -

 

दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक. जहाल मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते. इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे तेथील हाउस ऑफ कॉमन्सचे सभासद बनणारे ते पहिले भारतीय होय. ८८३ साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा क़िताब देण्यात आला. मुंबईच्या गिरगांव भागात जेथे दादाभाई रहात होते त्या रस्त्याला नौरोजी स्ट्रीट म्हणतात. लहान वयातच प्रागैतिक विचारांनी त्यांना आकर्षित केलं. १८४० मध्ये दादाभाईंनी मुलींसाठी शाळा उघडली. महिलांना या जगात खुलेपणाने जगण्याचा, आपल्या विचारानुसार कृती करण्याचा, अधिकार आणि कर्तव्यं निभावण्याचा समान अधिकार आहे, असं दादाभाईंनी त्यावेळी म्हटलं लैंगिक समानतेचा मुद्दा मांडला. भारतात तात्काळ सुधारणांची गरज आहे, हे ब्रिटनमधल्या मोठ्या वर्गाला पटवून देण्यात दादाभाई यशस्वी झाले. महिलांना मतदानाचा अधिकार, कामगारांना आठ तास काम करण्याचा नियम, अशा सुधारणांची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. महात्मा गांधी यांच्याआधीचे ते देशातील प्रमुख नेते होते. जगभरात त्यांना जातीयवाद आणि साम्राज्यवादाविरोधात लढणारे नेते, म्हणूनही मान होता.

 

होमी जहाँगीर भाभा -

 

अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. भारताच्या अणु ऊर्जा कार्यक्रमाचे जनक म्हणून डॉ. होमी जहाँगीर भाभा यांना ओळखलं जातं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर .. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. डॉ. होमी भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला. भाभा यांचा जन्म मुंबईतील एका सधन पारसी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. भाभा यांना पाचवेळा भौतिकशास्त्र विषयात नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. 19४५ मध्ये आण्विक कार्यक्रमाला चालना देण्यासाठी टाटा इंन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) संस्थेची त्यांनी स्थापना केली होती. त्यांनी अन्वीकक्षास्त्र निर्माण केले.

 

जमशेदजी टाटा आणि रतन टाटा -

 

टाटांना "भारतीय उद्योगाचे जनक" म्हणून ओळखले जाते. जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला. १८५८ मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला. आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा स्थापन करण्यासाठी टाटा यांनी इंग्लंड, अमेरिका, युरोप, चीन आणि जपान सारख्या परदेशांत अनेकदा प्रवास केला. त्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये. उद्योगजगतात त्यांचा इतका प्रभाव होता की जवाहरलाल नेहरूंनी टाटा यांना वन-मॅन प्लॅनिंग कमिशन म्हणून संबोधले होते. टाटा स्टील ही आशियातील पहिली आणि भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. ८००० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या स्थापित क्षमतेची भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज कंपनी टाटा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी आहे.

 

१९३७ मध्ये जन्मलेले रतन हे टाटा कुटुंबातील वंशज आणि नवल टाटा यांचे पुत्र आहेत. देश जेव्हा जेव्हा संकटात असतो तेव्हा तेव्हा भारतीयांसाठी धावून येणारा पहिला उद्योजक हे रतनजी टाटा आहेत. त्यांनी टाटा टी मिळवून टेटली विकत घेतली, टाटा मोटर्स घेऊन जग्वार लँड रोव्हर विकत घेतली आणि टाटा स्टील घेऊन कोरस कंपनीचे अधिग्रहण केले. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच .. १९७१ मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली होती . ` मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं ` हा रतन टाटांचा स्वभाव. याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनोची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी सिद्ध केलं. त्यांनी त्यांचे औद्योगिक संबंध इंग्लंड, अमेरिका, चीन तसंच जपान या देशांमध्ये प्रस्थापित केले.त्यांनी पुढे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्रीज, टाटा-टी आणि व्होल्टास या कंपन्यांचं जाळं उभं केलं. तसंच भारताची पहिली विमान कंपनी टाटा एअरलाईन्सची स्थापनाही त्यांनीच केली होती.

 

फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ-

 

आपल्या तब्बल ४० वर्षांच्या लांबलचक लष्करी कारकिर्दीतील वर्षे ते भारताचे लष्करप्रमुख राहिले. इतकंच नव्हे तर सुरुवातीच्या काळात ब्रिटिश सैन्याकडून त्यांनी दुसऱ्या महायुद्धातही सहभाग नोंदवला होता. भारत-पाकिस्तानदरम्यानच्या १९७१ च्या युद्धादरम्यान माणेकशॉ हे भारताचे लष्करप्रमुख होते. ते पंजाबमधील एका लष्करी अधिकाऱ्याच्याच घरी जन्माला आले. त्यांच्या वडिलांनी लष्करी अधिकारी म्हणून पहिल्या महायुद्धात ब्रिटिश लष्करात सेवा दिली होती.बर्मा येथे एका मोहिमेवर असलेल्या सॅम माणेकशॉ यांच्यावर जपानी सैन्यातील एका सैनिकाने गोळीबार केला होता. मशीननमधून झाडलेल्या सात गोळ्या सॅम यांच्या पोटात, आतड्यात घुसल्या.पण या हल्ल्यातून सॅम हे चमत्कारिकरित्या बचावले. त्यानंतर १९४६ साली त्यांना दिल्ली येथे लष्कराच्या मुख्यालयात नेमणूक देण्यात आली.

 

-सायरस आणि आदर पुनावाला

 

पुनावालांचं कुटुंब ब्रिटिशांच्या काळात 19 व्या शतकात पुण्यामध्ये आलं असं म्हटलं जातं. अनेक पारसी कुटुंबं ब्रिटिशांच्या वसाहतींमध्ये त्यांच्यासोबतच प्रशासनात, व्यापारात जवळकीचे संबंध प्रस्थापित करत स्थिर झाली. ज्या भागात ते स्थिर झाले तिथली नावं या कुटुंबांनी घेतली असंही आपल्याला दिसतं. स्वातंत्र्यपूर्वकाळात बांधकाम व्यवसायात या उद्यमी कुटुंबानं जम बसवला होता. राजे, ब्रिटिश अधिकारी, उद्योगपती असा सगळा 'एलिट' वर्ग घोड्यांच्या शर्यतीशी जोडला गेला होता. त्यामध्ये जम बसवून पुनावालांच्या साम्राज्याची पायाभरणी झाली. भारतातील श्रीमंत लोकांसाठी एखादी गोष्ट तयार करण्यापेक्षा भारतातील सर्वसामान्य जनतेच्या उपयोगाची वस्तू आपण तयार करायला हवी आणि त्यातूनच पुढे सिरम इंन्स्टिट्यूटची स्थापना सायरस पूनावाला यांनी केली. सिरम सध्या जगातील सर्वाधिक लशींचे डोस निर्माण करणारी कंपनी आहे.

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale