Friday, 28 March 2025

माझ्या गावातली शाळा

 



गावातली शाळा ही गावाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असते. ती फक्त शिक्षणाचं ठिकाण नाही, तर गावकऱ्यांच्या आशा, स्वप्नं आणि संस्कृतीचं प्रतिबिंब असते. सहसा ही शाळा गावाच्या मध्यभागी किंवा थोड्या बाजूला, शांत आणि मोकळ्या जागेत उभी असते. तिची इमारत कदाचित फारशी आकर्षक किंवा आधुनिक नसते, पण तिच्यात एक साधेपणा आणि उब असते, जी तिला खास बनवते. बहुतेक वेळा ही शाळा एकमजली किंवा जास्तीत जास्त दोन मजल्यांची असते. तिच्या भिंती जुन्या पद्धतीच्या विटांनी बांधलेल्या असतात, आणि त्यावरचा रंग कदाचित उडालेला असतो. पण या भिंतींवर मुलांनी रंगीत खडूंनी काढलेली चित्रं, शैक्षणिक नकाशे, कविता किंवा प्रेरणादायी वाक्यं लिहिलेली दिसतात, ज्यामुळे त्या भिंतींना एक वेगळंच सौंदर्य प्राप्त होतं.


शाळेच्या आवारात एक मोठं झाड असतं - कदाचित वडाचं, पिंपळाचं किंवा आंब्याचं. हे झाड शाळेचं एक खास वैशिष्ट्य असतं. त्याच्या सावलीत मुलं खेळतात, दुपारच्या सुट्टीत गप्पा मारतात किंवा कधी कधी अभ्यासही करतात. झाडाखालील मातीवर मुलांच्या पायांचे ठसे आणि खेळण्याचे डाग दिसतात, जे या जागेच्या जिवंतपणाची साक्ष देतात. शाळेच्या बाहेर शेतं पसरलेली असतात, हिरवळ आणि गावातली शांतता यामुळे शाळेचं वातावरण आणखीनच प्रसन्न होतं. सकाळी सूर्य उगवताना आणि संध्याकाळी मावळताना या शाळेचं दृश्य पाहण्यासारखं असतं - जणू निसर्ग आणि शिक्षण यांचं एक सुंदर मीलन.


शाळेच्या दारात एक लोखंडी घंटा लटकलेली असते. ही घंटा सकाळी ठरलेल्या वेळी वाजते आणि शाळेच्या दिवसाची सुरुवात होते. तिचा आवाज गावात दूरवर ऐकू येतो, आणि तो ऐकून मुलं आपापल्या घरातून बाहेर पडतात. काही मुलं सायकलवर येतात, त्यांच्या सायकलींच्या घंट्या वाजतात, तर काहीजणं पायी चालत येतात, हातात पाट्या आणि पुस्तकांनी भरलेल्या पिशव्या घेऊन. त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि कुतूहल असतं, कारण शाळा त्यांच्यासाठी फक्त शिक्षणाचं ठिकाण नाही, तर मित्रांना भेटण्याची, खेळण्याची आणि नवं काही शिकण्याची जागा आहे.


शाळेच्या आत गेल्यावर साध्या पण कार्यक्षम खोल्या दिसतात. या खोल्यांमध्ये लाकडी बाकं असतात, जे कदाचित जुने आणि थोडे तुटलेले असतात. प्रत्येक खोलीत एक काळा फळा असतो, आणि त्यासमोर शिक्षकांसाठी एक टेबल आणि खुर्ची ठेवलेली असते. खिडक्या मोठ्या असतात, जिथून बाहेरचं निसर्गदृश्य दिसतं - शेतं, झाडं आणि आकाश. या खिडक्यांमधून येणारा वारा आणि सूर्यप्रकाश वर्गात ताजगी आणतो. काही शाळांमध्ये विजेची सोय नसते, तर काही ठिकाणी पंखे आणि दिवे असतात, पण ते फारच कमी वापरले जातात. भिंतींवर गणिताचे तक्ते, मराठी वर्णमाला, विज्ञानाचे चार्ट्स किंवा ऐतिहासिक व्यक्तींची चित्रं लटकलेली असतात. काही खोल्यांमध्ये मुलांनी बनवलेल्या हस्तकला वस्तू किंवा चित्रांचं प्रदर्शनही असतं, जे त्यांच्या सर्जनशीलतेची झलक दाखवतं.

शाळेतलं शिक्षण हा तिथल्या जीवनाचा आत्मा आहे. शिक्षकांची संख्या मर्यादित असते - कधी कधी एकच शिक्षक चार-पाच वर्गांना शिकवतो. पण हे शिक्षक आपल्या पूर्ण मेहनतीने आणि निष्ठेने मुलांना शिकवतात. त्यांचं शिकवणं फक्त पुस्तकापुरतं मर्यादित नसतं, तर ते गावातल्या जीवनाशी जोडलेलं असतं. उदाहरणात, गणित शिकवताना ते शेतातल्या मोजमापांचा किंवा बाजारातल्या खरेदी-विक्रीचा दाखला देतात. विज्ञान शिकवताना ते निसर्गातल्या गोष्टी - जसं झाडं, पाणी किंवा हवामान - यांचा आधार घेतात. मुलंही उत्साहाने शिकतात, कारण त्यांना माहिती असतं की हे शिक्षण त्यांच्या आयुष्यात बदल घडवू शकतं. वर्गात प्रश्नांची देवाणघेवाण होते, कधी कधी मुलं अशी प्रश्न विचारतात की शिक्षकांनाही आश्चर्य वाटतं.


शाळेतली मुलं ही तिथलं खरं वैभव आहे. त्यांचे कपडे साधे असतात - काहींचे गणवेश पूर्ण असतात, तर काहींच्या गणवेशाला फाटके किंवा बटणं नसतात. पण त्यांच्या डोळ्यात एक चमक असते, जी त्यांच्या भविष्याबद्दलच्या आशा दाखवते. ही मुलं सकाळी लवकर उठून घरातली कामं करतात - काहीजणं पाणी भरतात, काही गुरं चारतात, काही भावंडांना सांभाळतात - आणि मग शाळेत येतात. त्यांच्यात एक वेगळीच ऊर्जा असते. वर्गात ते एकमेकांशी चर्चा करतात, खेळतात आणि कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतातही. पण त्यांची मैत्री खास असते - सुट्टीत ते एकत्र खेळतात, जेवण वाटून खातात आणि एकमेकांना मदत करतात.

सुट्ट्या हा मुलांसाठी आनंदाचा काळ असतो. मधल्या सुट्टीत मुलं बाहेर पडतात आणि खेळ सुरू होतात. काहीजणं लंगडी, खो-खो, कबड्डी किंवा विटीदांडू खेळतात, तर काहीजणं झाडाखाली बसून गप्पा मारतात. काही मुलं आपल्या डब्यातलं जेवण आणतात - त्यात भाकरी, भाजी, ठेचा, कांदा किंवा कधी कधी फक्त चटणी असते. हे जेवण ते एकमेकांशी वाटून खातात, आणि त्यातून त्यांच्यातली बंधुभावना दिसते. काही मुलं शाळेतच राहून अभ्यास करतात, तर काही घरी जाऊन संध्याकाळी पुन्हा खेळायला परत येतात. खेळताना त्यांचा आवाज शाळेच्या आवारात घुमतो, आणि तो ऐकून गावकऱ्यांनाही आनंद होतो.


शाळेतली शिस्तही खास असते. सकाळी प्रार्थनेने दिवस सुरू होतो, त्यानंतर राष्ट्रगीत आणि मग वर्ग सुरू होतात. शिक्षक मुलांना प्रेमाने शिकवतात, पण गरज पडली तर कडकही होतात. काही शाळांमध्ये आठवड्यातून एकदा सांस्कृतिक कार्यक्रम किंवा खेळांचं आयोजन होतं. या कार्यक्रमात मुलं नृत्य, नाटक, भाषणं किंवा गाणी सादर करतात. गावकरीही या कार्यक्रमांना हजेरी लावतात आणि मुलांचं कौतुक करतात. या छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना आपल्या कलेला वाव मिळतो.


गावातल्या शाळेचं सामाजिक महत्त्वही खूप आहे. ही शाळा फक्त मुलांसाठीच नाही, तर गावकऱ्यांसाठीही एकत्र येण्याचं ठिकाण आहे. कधी गावातल्या बैठका इथे होतात, कधी निवडणुकीसाठी मतदान केंद्र बनतं, तर कधी गावातल्या सणांचं आयोजन इथूनच होतं. शाळा गावाच्या विकासातही हातभार लावते - इथून शिकलेली मुलं पुढे जाऊन गावासाठी काहीतरी चांगलं करू शकतात, असा विश्वास गावकऱ्यांना असतो. काही माजी विद्यार्थ्यांनी गावात परत येऊन शाळेसाठी मदत केल्याच्या कथाही ऐकायला मिळतात.


पण या शाळेला आव्हानंही कमी नाहीत. शिक्षकांची कमतरता, मूलभूत सुविधांचा अभाव - जसं स्वच्छ पाणी, शौचालय किंवा वीज - आणि शैक्षणिक साहित्याची टंचाई ही काही प्रमुख प्रश्न आहेत. काही मुलांना शिकण्यासाठी पुस्तकं, वह्या किंवा पेनही पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. पावसाळ्यात शाळेच्या छताला गळती लागते, तर उन्हाळ्यात पाण्याची समस्या भेडसावते. तरीही या सगळ्या अडचणींवर मात करत ही शाळा आपलं काम चालू ठेवते. सरकारकडून किंवा स्वयंसेवी संस्थांकडून कधी कधी मदत मिळते, पण तीही मर्यादित असते.


शेवटी, गावातली शाळा ही फक्त एक इमारत नाही, तर ती गावाच्या संस्कृतीचं, आशांचं आणि भविष्याचं प्रतीक आहे. तिथली मुलं, शिक्षक आणि गावकरी मिळून तिला जिवंत ठेवतात. तिच्या भिंतींमध्ये अनेक स्वप्नं दडलेली असतात, आणि तिथून बाहेर पडणारी प्रत्येक पिढी गावाला नवं काहीतरी देऊन जाते. ही शाळा म्हणजे गावाचं हृदय आहे, जिथे शिक्षणाच्या माध्यमातून जीवनाला नवं रूप मिळतं.


सचिन कृष्णा तळे 


Tuesday, 25 March 2025

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणात एकत्र पाहिजे का ? I


उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज श्रीकांत ठाकरे हे दोन नाव महाराष्ट्राच्या राजकारणात वजनदारच नाही तर प्रतिष्टेच देखील आहे. हि दोन चुलत भाव राज्याच्या राजकारणात एकत्र यावं आणि एकत्र निवडणूक लढवावी अशी अनेकांची इच्छा आहे. अनेकांना वाटत कि राज उद्धव जोडी हि एकत्र आली तर राज्याचं राजकारण हे बदलेल. काही दिवसापूर्वी हि दोन मंडळी एकत्र एका कार्यक्रमात दिसलीत आणि त्यावर चांगलीच चर्चा झाली. एक शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत तर दुसरे बाळासाहेबांचे पुत्र. पण बाळासाहेब असतानाच राजसाहेब दुरावले. काही अंतर्गत वादातून राजसाहेब सारखे अनेक नेते हळू हळू शिवसेनेला अखेरचा "जय महाराष्ट्र" करून निघून गेले आणि हे चित्र काही थांबेना. आज दुर्दव्य कि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे दोन गटात रूपांतर झालं. त्याला कोण जवाबदार हा आजचा विषय नाही. असो , आजचा विषय हाच आहे कि राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन चुलत भाऊ एकत्र आले पाहिजे कि नाहीत ? जर एकत्र आले तर त्याचा फायदा होणार कि तोटा? आजची परिस्तिथी पाहता ठाकरे या नावाचा खरा वारसदार नक्कीच उद्धव ठाकरे आहेत कि राज ठाकरे ?  

 

नमस्कार मंडळी , मी सचिन कृष्णा तळे ... तुमचं स्वागत करतो आपल्या युट्युब चॅनल वरती ..  जे आहे ते आहे.

 

उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यापेक्षा आठ वर्षाने मोठे आहेत पण शिवसेना या संघटनेच्या नेतृत्वात राजसाहेब हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठे ठरतात. कारण राजकारणात वारसा हा फक्त एका कालावधी साठी असतो पण अनुभवातून जो नेतृत्व करतो तो चिरकाल टिकतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन स्वतंत्र वाहते प्रवाह आहे. चला हा प्रवाह नक्की कसा आहे ते पाहू.

 

एक उदाहरण इथे देतो, वयक्तिक रित्या मला जर कोणी विचारलं तर मला हिंदुहृस्यसम्राट बाळासाहेब ठाकरे हे एका हिमालय पर्वतासारखे वाटतात आणि या बाळासाहेब रुपी हिमालयाच्या शिखरावरून ज्या नदीचा प्रवाह वाहतोय ती नदी म्हणजे राज साहेब ठाकरे आणि याच हिमालयाच्या पायथ्याशी हिमालयाच्या गाभाऱ्यातून एक नदी प्रकट झालीय ती म्हणजे उद्धव ठाकरे. राज्यात या दोन प्रमुख नद्यांचं प्रवाह विरुद्ध दिशेने वाहतोय हे लक्षात असून द्या. या दोन नद्या एकत्र आणायचं असेल तर असंभव असे काहीच नाही. आणि राजकारणात सत्तेसाठी कोण कधी एकत्र येईल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही.

 

 

लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळासाहेब ठाकरे यांना आपले दैवताचे स्थान देतात. आपली राजकीय कारकीर्द त्यांनी शिवसेनेतच सुरू केली. शिवसेनेला तरुणांचा बळकट पाठिंबा मिळवण्यात राज ठाकरे यांचा फार वाटा महत्त्वाचा समजला जातो. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सूत्रे कोण वाहणार यावर एकेकाळी राज ठाकरे याच्याकडेच बोट दाखवले जायचे. उत्तम वक्तृत्व आणि प्रभावी नेतृत्व असलेले राज ठाकरे हे तरुणांचे नेते मानले जातात. राज ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर बाळासाहेब यांनी त्यांच्यावर विद्यार्थी सेनेचे नेतृत्व सोपवलं होत. याच काळात लाखोंच्या संख्येने विद्यार्थी तरुण मंडळी राज साहेब यांच्या नेतृत्वात काम करू लागली . विद्यार्थी सेनेसोबत शिव उदयॊग सेने चे काम देखील जोरात चालू झाले होते. कधी बाळासाहेब यांच्यासाठी कार्यकर्ता म्हणून तर कधी बाळासाहेबांच्या शिलेदारातील प्रमुख शिलेदार म्हणून राजसाहेब भूमिका पार पाडत होते.

पण महाबळेश्वर येथील २००३ च्या शिवसेनेच्या अधिवेशनात जे घडलं त्यानंतर या बाहुबली ला एक पाऊल मागेच टाकावे लागले. हा राजकीय अनुभव राजसाहेब ठाकरे यांच्याकडे होताच. शेवटी २००६ मध्ये ९ मार्च ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि या नव्या पक्षाने अनेक तरुणांना राजकारणात येण्याची संधी दिली.

त्याउलट उद्धव बाळासाहेब ठाकरे हे निपुण छायाचित्रकार. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची यशस्वी छायाचित्र प्रदर्शने आहेत. सुरवातीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. २००२ नंतर उद्धव साहेब ठाकरे यांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवला. पुढील वर्षी  २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. मात्र या काळात तत्कालीन शिवसेनेतील प्रमुख नेते नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मतभेद वाढत राहिले आणि अखेरीस नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली. उद्धव ठाकरे व त्यांचे चुलतभाऊ राज ठाकरे यांच्यातील दरीही रुंदावत गेली; परिणामी इ.स. २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जाणाऱ्यांची संख्या वाढत गेली. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात बाळासाहेब लढले त्याच दोन विरोधी पक्षांसोबत उद्धव साहेब यांनी मैत्री करून सत्ता स्थापन केली. सत्ता वाटप करण्यात वाद निर्माण झाल्यामुळे युती तुटली व उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले व राज्याच्या १९ व्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. २१ जून २०२२ रोजी शिवसेनेतील एकनाथ शिंदे सह 40 आमदारांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला.

 

 


 

 

हा झाला या दोघांचा एक छोटासा परिचय.

एकाच मेहनतीने स्वबळावर पक्ष स्थापन करून राजकारणात स्थिर राहण्याचा प्रयत्न सुरु आहे तर दुसर्याने जे वारसा हक्काने मिळवलं ते टिकवण्यात समर्थ आहेत २००३ पासून ते आज पर्यंत बाळासाहेबांनी उभे केलेले अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेली मूळ शिवसेनेला सोडून बाळासाहेबांची शिवसेना स्थापन केली. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेबांचे शिलेदार होते त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचा विचार केला नाही. उलट मनसे कशी सत्तेपासून लांब राहील याचेच कटकारस्थान रचले गेले. अर्थात हा एक राजकारणाचा भाग आहे. जर हे दोन नेते एकत्र येत असतील तर त्यात पहिला अडथळा हा संजय राऊत यांचा असेल. राज साहेब यांच्या मनात संजय राऊत बद्दल काय मत असेल हे तुम्ही राज साहेबाना विचारलं तर ते माझ्यापेक्षा चागलं उत्तर देतील. बाकी संजय राऊत यांचं मत कोणाबद्दल काय आहे हे सुद्धा मला सांगायची गरज नाही.

 

असे आरोप हि होतात कि उद्धव साहेब यांच्यापर्यंत पोहचायचं असेल तर तुम्हाला संजय राऊत यांच्या मार्फत च जावं लागत. आणि स्पष्ट सांगायचं तर संजय राऊत याना मनसे अन भाजप ची जवळीक अजिबात नकोय. त्यांना काँग्रेस आणि शरद पवार गट जितका जवळ वाटतो तितका हे दोन पक्ष नाही. त्यामुळे या दोन नेत्याने एकत्र न येण्याचं संजय राऊत हे एक कारण असू शकत.

हि दोन भावंडं अलग झाल्यापासून तुम्ही उद्धव साहेबांना कधी राज साहेब यांच्या घरी पाहिलं का ? किंवा राजसाहेब यांना नातू झाला तेव्हा त्यावर उद्धवसाहेबांचं राजसाहेबाना शुभेच्छा दिल्यात पाहिलं का ? पण उद्धव साहेब जेव्हा आजारी होते तेव्हा राजसाहेब स्वतः त्यांची विचारपूस करून त्यांना मातोश्री पर्यंत पोहचवले. असे बारीसारीक अनेक घटना घडलेत हे विसरून चालणार नाही. भावकी सत्तेसाठी एकत्र जरी आली तरी त्यांच्या मनात जे एकमेकांबद्दल आहे ते जगजाहीर आहे.  

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्धव साहेब यांच्यामुळे राजसाहेब याना शिवसेना पक्षाचं अध्यक्ष होता आलं नाही, हि जी खंत आहे ती राजसाहेब यांच्या मनात आजही असणार आणि पुढे हि राहणार.

राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे धोरण त्यांनी महाराष्ट्र व मराठीभाषा व हिंदुत्व यांभोवतीच प्रामुख्याने केंद्रित ठेवले आहे. कधीकाळी याच मुद्द्यावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना होती पण उद्धव ठाकरे यांचे मित्र पक्षाची विचारसरणी हि वेगळी असल्याने ते महाराष्ट्र व मराठीभाषा व हिंदुत्व var कधी कधी ठाम भूमिका मांडू शकत नाहीय.

त्यामुळे हे दोन नेते एकत्र येतील असं मला तरी वाटत नाही आणि आलेच तर याचा फायदा सत्ता मिळवण्यासाठी अजिबात होणार नाही. शेवटी या क्लिप पहा आणि तुम्हीच ठरावा.

 

 

सचिन कृष्णा तळे


राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन चुलत भाऊ एकत्र आले पाहिजे कि नाहीत ?

उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज श्रीकांत ठाकरे हे दोन नाव महाराष्ट्राच्या राजकारणात वजनदारच नाही तर प्रतिष्टेच देखील आहे. हि दोन चुलत भाव राज्याच्या राजकारणात एकत्र यावं आणि एकत्र निवडणूक लढवावी अशी अनेकांची इच्छा आहे. अनेकांना वाटत कि राज उद्धव जोडी हि एकत्र आली तर राज्याचं राजकारण हे बदलेल. काही दिवसापूर्वी हि दोन मंडळी एकत्र एका कार्यक्रमात दिसलीत आणि त्यावर चांगलीच चर्चा झाली. एक शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत तर दुसरे बाळासाहेबांचे पुत्र. पण बाळासाहेब असतानाच राजसाहेब दुरावले. काही अंतर्गत वादातून राजसाहेब सारखे अनेक नेते हळू हळू शिवसेनेला अखेरचा "जय महाराष्ट्र" करून निघून गेले आणि हे चित्र काही थांबेना. आज दुर्दव्य कि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे दोन गटात रूपांतर झालं. त्याला कोण जवाबदार हा आजचा विषय नाही. असो , आजचा विषय हाच आहे कि राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन चुलत भाऊ एकत्र आले पाहिजे कि नाहीत ? जर एकत्र आले तर त्याचा फायदा होणार कि तोटा? आजची परिस्तिथी पाहता ठाकरे या नावाचा खरा वारसदार नक्कीच उद्धव ठाकरे आहेत कि राज ठाकरे ?  

https://youtu.be/bbrP_15GYN0?si=rcCN4-b-qgW_W4yx 



उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यापेक्षा आठ वर्षाने मोठे आहेत पण शिवसेना या संघटनेच्या नेतृत्वात राजसाहेब हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठे ठरतात. कारण राजकारणात वारसा हा फक्त एका कालावधी साठी असतो पण अनुभवातून जो नेतृत्व करतो तो चिरकाल टिकतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन स्वतंत्र वाहते प्रवाह आहे. चला हा प्रवाह नक्की कसा आहे ते पाहू.

 एक उदाहरण इथे देतो, वयक्तिक रित्या मला जर कोणी विचारलं तर मला हिंदुहृस्यसम्राट बाळासाहेब ठाकरे हे एका हिमालय पर्वतासारखे वाटतात आणि या बाळासाहेब रुपी हिमालयाच्या शिखरावरून ज्या नदीचा प्रवाह वाहतोय ती नदी म्हणजे राज साहेब ठाकरे आणि याच हिमालयाच्या पायथ्याशी हिमालयाच्या गाभाऱ्यातून एक नदी प्रकट झालीय ती म्हणजे उद्धव ठाकरे. राज्यात या दोन प्रमुख नद्यांचं प्रवाह विरुद्ध दिशेने वाहतोय हे लक्षात असून द्या. या दोन नद्या एकत्र आणायचं असेल तर असंभव असे काहीच नाही. आणि राजकारणात सत्तेसाठी कोण कधी एकत्र येईल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. 

लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळासाहेब ठाकरे यांना आपले दैवताचे स्थान देतात. आपली राजकीय कारकीर्द त्यांनी शिवसेनेतच सुरू केली. शिवसेनेला तरुणांचा बळकट पाठिंबा मिळवण्यात राज ठाकरे यांचा फार वाटा महत्त्वाचा समजला जातो. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सूत्रे कोण वाहणार यावर एकेकाळी राज ठाकरे याच्याकडेच बोट दाखवले जायचे. उत्तम वक्तृत्व आणि प्रभावी नेतृत्व असलेले राज ठाकरे हे तरुणांचे नेते मानले जातात. राज ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर बाळासाहेब यांनी त्यांच्यावर विद्यार्थी सेनेचे नेतृत्व सोपवलं होत. याच काळात लाखोंच्या संख्येने विद्यार्थी तरुण मंडळी राज साहेब यांच्या नेतृत्वात काम करू लागली . विद्यार्थी सेनेसोबत शिव उदयॊग सेने चे काम देखील जोरात चालू झाले होते. कधी बाळासाहेब यांच्यासाठी कार्यकर्ता म्हणून तर कधी बाळासाहेबांच्या शिलेदारातील प्रमुख शिलेदार म्हणून राजसाहेब भूमिका पार पाडत होते.

पण महाबळेश्वर येथील २००३ च्या शिवसेनेच्या अधिवेशनात जे घडलं त्यानंतर या बाहुबली ला एक पाऊल मागेच टाकावे लागले. हा राजकीय अनुभव राजसाहेब ठाकरे यांच्याकडे होताच. शेवटी २००६ मध्ये ९ मार्च ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि या नव्या पक्षाने अनेक तरुणांना राजकारणात येण्याची संधी दिली.

त्याउलट उद्धव बाळासाहेब ठाकरे हे निपुण छायाचित्रकार. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची यशस्वी छायाचित्र प्रदर्शने आहेत. सुरवातीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. २००२ नंतर उद्धव साहेब ठाकरे यांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवला. पुढील वर्षी  २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. मात्र या काळात तत्कालीन शिवसेनेतील प्रमुख नेते नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मतभेद वाढत राहिले आणि अखेरीस नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली. उद्धव ठाकरे व त्यांचे चुलतभाऊ राज ठाकरे यांच्यातील दरीही रुंदावत गेली; परिणामी इ.स. २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जाणाऱ्यांची संख्या वाढत गेली. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात बाळासाहेब लढले त्याच दोन विरोधी पक्षांसोबत उद्धव साहेब यांनी मैत्री करून सत्ता स्थापन केली. सत्ता वाटप करण्यात वाद निर्माण झाल्यामुळे युती तुटली व उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले व राज्याच्या १९ व्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. २१ जून २०२२ रोजी शिवसेनेतील एकनाथ शिंदे सह 40 आमदारांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. 

https://youtu.be/bbrP_15GYN0?si=rcCN4-b-qgW_W4yx

हा झाला या दोघांचा एक छोटासा परिचय.

एकाच मेहनतीने स्वबळावर पक्ष स्थापन करून राजकारणात स्थिर राहण्याचा प्रयत्न सुरु आहे तर दुसर्याने जे वारसा हक्काने मिळवलं ते टिकवण्यात समर्थ आहेत २००३ पासून ते आज पर्यंत बाळासाहेबांनी उभे केलेले अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेली मूळ शिवसेनेला सोडून बाळासाहेबांची शिवसेना स्थापन केली. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेबांचे शिलेदार होते त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचा विचार केला नाही. उलट मनसे कशी सत्तेपासून लांब राहील याचेच कटकारस्थान रचले गेले. अर्थात हा एक राजकारणाचा भाग आहे. जर हे दोन नेते एकत्र येत असतील तर त्यात पहिला अडथळा हा संजय राऊत यांचा असेल. राज साहेब यांच्या मनात संजय राऊत बद्दल काय मत असेल हे तुम्ही राज साहेबाना विचारलं तर ते माझ्यापेक्षा चागलं उत्तर देतील. बाकी संजय राऊत यांचं मत कोणाबद्दल काय आहे हे सुद्धा मला सांगायची गरज नाही.

 

असे आरोप हि होतात कि उद्धव साहेब यांच्यापर्यंत पोहचायचं असेल तर तुम्हाला संजय राऊत यांच्या मार्फत च जावं लागत. आणि स्पष्ट सांगायचं तर संजय राऊत याना मनसे अन भाजप ची जवळीक अजिबात नकोय. त्यांना काँग्रेस आणि शरद पवार गट जितका जवळ वाटतो तितका हे दोन पक्ष नाही. त्यामुळे या दोन नेत्याने एकत्र न येण्याचं संजय राऊत हे एक कारण असू शकत.

हि दोन भावंडं अलग झाल्यापासून तुम्ही उद्धव साहेबांना कधी राज साहेब यांच्या घरी पाहिलं का ? किंवा राजसाहेब यांना नातू झाला तेव्हा त्यावर उद्धवसाहेबांचं राजसाहेबाना शुभेच्छा दिल्यात पाहिलं का ? पण उद्धव साहेब जेव्हा आजारी होते तेव्हा राजसाहेब स्वतः त्यांची विचारपूस करून त्यांना मातोश्री पर्यंत पोहचवले. असे बारीसारीक अनेक घटना घडलेत हे विसरून चालणार नाही. भावकी सत्तेसाठी एकत्र जरी आली तरी त्यांच्या मनात जे एकमेकांबद्दल आहे ते जगजाहीर आहे.  

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्धव साहेब यांच्यामुळे राजसाहेब याना शिवसेना पक्षाचं अध्यक्ष होता आलं नाही, हि जी खंत आहे ती राजसाहेब यांच्या मनात आजही असणार आणि पुढे हि राहणार.

राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे धोरण त्यांनी महाराष्ट्र व मराठीभाषा व हिंदुत्व यांभोवतीच प्रामुख्याने केंद्रित ठेवले आहे. कधीकाळी याच मुद्द्यावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना होती पण उद्धव ठाकरे यांचे मित्र पक्षाची विचारसरणी हि वेगळी असल्याने ते महाराष्ट्र व मराठीभाषा व हिंदुत्व var कधी कधी ठाम भूमिका मांडू शकत नाहीय.

त्यामुळे हे दोन नेते एकत्र येतील असं मला तरी वाटत नाही आणि आलेच तर याचा फायदा सत्ता मिळवण्यासाठी अजिबात होणार नाही. शेवटी या क्लिप पहा आणि तुम्हीच ठरावा.

 https://youtu.be/bbrP_15GYN0?si=rcCN4-b-qgW_W4yx

सचिन कृष्णा तळे

 

Thursday, 6 March 2025

जगतगुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांचं पुण्यनगरीत आगमन.

 

सद्गुरुचे नाममात्र ।तेचि आम्हां वेदशास्त्र । सकळ मंत्रा वरिष्ठ मंत्र । नाम सर्वत्र गुरुचे ।

 



या भागवतातील नाथ उक्तीप्रमाणे आपल्या गुरुचेच नाव सर्वश्रेष्ठ मानणारे एक अलौकिक महात्मा म्हणजेच जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज येत्या १५  मार्च २०२५ रोजी सायंकाळी भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात उपस्तिथ राहणार आहेत. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना प्रयागराज येथील महाकुंभात जगदगुरु ही विशेष उपाधी मिळाल्यामुळे त्यांचे भव्य स्वागत व पूजन सोहळा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी पुणेच नाही तर राज्यातल्या अनेक गावातून बाबाजींचे भक्त परिवार पुण्यात दाखल होतील आणि या कार्यक्रमाचा लाभ घेतली अश्या प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन जय बाबाजी भक्त परिवार,
जिल्हा पुणे च्या वतीने करण्यात येणार आहे.

 

१९८९ साली जनार्धन स्वामी यांचे निर्वाण झाले आणि त्यानंतर २५ डिसेंबर १९८९ साली शांतीगिरी महाराजांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. शांतीगिरी महाराज हे संन्यस्त स्वीकारलेले योगी आहेत. आजन्म ब्राह्मचारी राहण्याचं त्यांनी व्रत घेतलं आहे. शांतीगिरी महाराज हे मूळचे नाशिक जिल्ह्यातल्या लाखलगाव इथले आहेत. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती. त्यामुळे ते वेरूळ येथील जनार्धन स्वामींच्या मठात आले. मठात त्यांची दृष्टी ठीक झाली त्यामुळे ते परत आपल्या गावी गेले, गावी गेल्यानंतर त्यांची पुन्हा दृष्टी गेली त्यामुळे महाराज पुन्हा मठात आले. मठात आल्यानंतर जनार्धन स्वामींनी शांतीगिरी महाराजांना मठातच राहायला सांगितलं, मठात राहून शांतीगिरी महाराजांनी संन्यस्त वृत्त स्वीकारलं, मठातच राहून महाराजांनी विज्ञान शाखेतून पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं. शांतीगिरी महाराजांचे छत्रपती संभाजी नगर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि जालना या पाच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भक्त आहेत. कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात भगवे कपडे परिधान करणाऱ्या स्वामी शांतिगिरी महाराजांची अपक्ष उमेदवारी विविध कारणांनी चर्चेत राहिले.

 

साधारणतः १९७५-७६ मध्ये शांतिगिरीजी बाबांनी जे घर सोडले ते आजतागायत आहे. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.' या उक्तीप्रमाणे शांतिगिरीजी बाबांनी आपले कार्य सुरू केले. पहिल्यापासूनच शांतिगिरीजी बाबा जनार्दन बाबांचे आवडते शिष्य होते. बाबाजी पहिल्या प्रसादाची पुडी सुद्धा शांतिगिरीजी बाबांनाच देत असायचे. स्नान घालायचं म्हटलं तरी शांतिगिरीजी बाबा पळत पळत जाऊन पुढे उभे असायचे. इतका अधिकार शांतिगिरीजी बाबांचा जनार्दन बाबांवर होता. सन १९८९ मध्ये जनार्दन बाबांचे महानिर्वाण झाले. आणि सोडशी सोहळ्यात जनार्दन बाबांच्या उत्तराधिकारी पदाची शाल अनेक मान्यवरांच्या साक्षीने आणि शंभू पंचनाम जुना आखाड्याच्या साधूंच्या उपस्थितीत शांतिगिरीजी बाबांच्या अंगावर चढवली. सर्वांतून शांतिगिरीजी बाबांनी संयमाने आणि धैर्याने मार्ग काढत बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ती आजतागायत सुरू आहे. अखंड नऊ वर्षे मौन व्रताची साधना सुरू झाली. एक शब्दही न बोलता जनार्दन बाबांचे पुण्यस्मरण सोहळे सुरू झाले. बाबाजींचे ११ वे पुण्यस्मरण विश्वशांती सोहळा, १३ वे पुण्यस्मरण श्री राम सिता धर्म सोहळा असेल . किंवा १६ वे पुण्यस्मरण जय हनुमान धर्म सोहळा असेल असे अनेक 'न भूतो न भविष्यती' सोहळे करून धर्मसंस्कार शिरोमणीचा पुरस्कार प्राप्त करून घेतला. बाबाजींनी सुरू केलेल्या अनुष्ठान, गुरुकुल, श्रमदान, कृषी व ऋषी सेवा आणि गो सेवा या दिव्य पाच परंपरांचे नित्य पालन शांतिगिरीजी बाबा नेटाने करत आहेत आणि लाखो भक्तांकडून करवून घेत आहेत. सन २०१७ मध्ये महाराष्ट्र. राज्य मराठी पत्रकार संघाकडून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल “समाजरत्न” पुरस्कारप्रदान करण्यात आला आहे.

 

शांतिगिरी महाराज आजवर फक्त फलाहार घेतले असून. साधी भगवी वस्त्र, पायात लाकडी खडावा, बसायला पोत्याचे आसन अन मनात सतत जनार्दन बाबांच्या नावाचे चिंतन असे त्यागी, वैरागी जीवन आहे. पुण्यात ते मुकामी असल्याने जय बाबाजी परिवार तर्फे राहण्यासाठी त्यांना एका शेतात कुटी उभारण्यात येणार आहे. हि कुटी गवत, पाचट याने बनवली जाणार आहे. कुटी हि शेणाने सारून त्यात विहिरीचे बोरच्या पाण्याची सोय असणार आहे. बाबाजींच स्वागत करून त्यांची पूजा आणि नंतर आलेल्या भक्तांना त्यांचे आशीर्वाद सोबत येणाऱ्या भक्तांसाठी भोजन ची सोय देखील असणार आहे. जनार्दन स्वामींचे संकल्प पुरे करून खरी गुरुनिष्ठा काय आहे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शांतिगिरीजी महाराज आहेत. अश्या संतांचे चरण या पुण्यनगरीत पडणार असल्याने त्यांच्या स्वागताची तयारी हि जोरदार चालू आहे. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर मंडळी देखील हजेरी लावणार आहेत. "जय जय जनार्दन देवा । निरंतर घडो तुमची सेवा" । या उक्तीप्रमाणे सतत जनार्दन बाबांची सेवा घडावी म्हणून कार्यरत असणाऱ्या स्वामी शांतिगिरीजी बाबांच्या चरणी विनम्र अभिवादन.

 

सचिन कृष्णा तळे

 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale