मराठी माणसाचा स्वभाव जसा
कठोर , पराक्रमी , धाडसी आहे तसाच तो भोळा आणि समोरच्या व्यक्तीचा जास्त विचार करणारा
आहे. तो इतरांचाच जास्त विचार करतो म्हणून तर इतर भाषिक बांधवांबरोबर बोलताना त्यांना
त्रास होऊ नये म्हणून तोच मराठी ऐवजी हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलायला सुरवात करतो.
मराठी माणूस हा एकमेकांचे पाय खेचतो , एकमेकांना सहकार्य करत नाही, एकजूट नाही अशी
बोंब कायम ऐकायला मिळते. मराठी माणूस हा आज जगाच्या कानोकोपऱ्यात पोहचला आहे. मोठ्या
उद्योगात, मोठ्या पदावर तो आहे अश्या वेळी हा नुन्यगंड बाजूला सारून प्रत्येक मराठी
भाषिकांनी एकत्र यावे. भारताबाहेर जगभरामध्ये सुमारे ६० हून अधिक देशांत सुमारे एक
कोटी मराठी बांधव राहत आहेत. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतामधील इतर राज्यांमध्ये
जे मराठी बांधव आहेत; त्यांनाही मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि मराठी माणसांच्या विकासाविषयी रुची आहे. अश्यावेळी जगभरतल्या प्रत्येक मराठी माणसांनी
मिळून एक वैश्विक मराठी समाज निर्माण केला पाहिजे. ह्याच संकल्पनेवर आधारित विश्व् मराठी परिषद ची मशाल हि
पुण्यात पेटवली गेली.
विश्व् मराठी परिषदेचा मुख्य
उद्धेश एकमेकांच्या मदतीने असा जागतिक मराठी समाज घडवायचा की मराठी माणसाला सर्वत्र
सन्मान मिळेल, मान्यता मिळेल, त्याची प्रगती होईल. सक्षम , संपन्न , समृद्ध असे वैश्विक
मराठी ब्रँड तयार करणे ह्याच मुख्य उद्दिष्टेवर परिषदेचं कामकाज चालू आहे. विशेषत:
मराठी माणूस हा आर्थिक दृष्ट्या संपन्न आणि समृद्ध होईल. साहित्य, संस्कृती आणि उद्योजकता
या तीन आयमांना केंद्रस्थानी ठेवून सध्या विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या
साहाय्याने तयार होणारे मुक्त व्यासपीठ , प्रत्येकाचा सहभाग आणि आपल्या निर्मितीचा
सर्वदूर प्रसार हेच विश्व मराठी परिषदेचं खास वैशिष्ट्य आहे. विविध प्रकारची उपयुक्त
माहिती सर्वाना उपलब्द करून देणे, विविध प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या संस्थांचा परिचय
करून देणे , देश विदेशातील नोकरीची संधी पोर्टलद्वारे उपलब्द करून देणे , महाराष्ट्रातील
संस्थांना विदेशातून साहाय्य मिळून देणे , १२ कोटी मराठी बांधवाना साहित्याच्या मुख्य
प्रवाहात आणून त्यांना साहित्याची गोडी निर्माण करून देणे , जास्तीत जास्त लेखक कसे
तयार होतील ह्या दिशेने कार्यक्रम घेणे , मराठी ब्लॉग लिहिणाऱ्या लेखकांना सन्मानित
करणे , जास्तीत जास्त इ बुक्स ऑडिओ बुक साठी प्रयत्न करणे , देशविदेशात संमेलन घेणे
, लेखक कवी ह्यांची ओळख त्यांचे साहित्य महाराष्ट्रा बाहेरील मराठी वाचकांपर्यंत पोहचवणे,
बाल साहित्य महोत्सव आयोजित करणे असे महत्वपूर्ण कौतुकास्पद भव्य कार्य विश्व मराठी
परिषदेतून केले जाते.
7709099646
No comments:
Post a Comment