👉 माझ्या मते 🇮🇳
भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना झाला की केवळ खेळ नाही तर राजकारण, धर्मकारण आणि राष्ट्रवाद यावर चर्चेचा भोवरा सुरू होतो. पाकिस्तान हा आपला शेजारी असूनही नेहमी कटकारस्थानात गुंतलेला, दहशतवादाला प्रोत्साहन देणारा आणि आपल्या जवानांच्या रक्ताशी खेळ करणारा देश आहे हे जगजाहीर आहे.
मग प्रश्न असा आहे की अशा देशासोबत आपण खेळावं का? त्यांच्यासोबत व्यापार करावा का? सीमा ओलांडून सांस्कृतिक संबंध ठेवावेत का? माझ्या मते याला सरळ आणि ठाम उत्तर आहे नाही!
क्रिकेटच्या मैदानावर विजयाचा आनंद वेगळा, पण तो आनंद आपले सैनिक गमावून बसत असतील, देशाच्या सीमेवर रक्त सांडत असेल तर अशा सामन्याचा काही अर्थ उरत नाही. पाकिस्तान हा ‘मुस्लिम राष्ट्र’ म्हणून वेगळा नाही, तर तो आपल्या राष्ट्राचा जाहीर शत्रू म्हणून वेगळा आहे.
👉 म्हणूनच माझ्या मते पाकिस्तानसोबत कोणतीच तडजोड नको.
👉 व्यापार, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा सर्व बंद करा.
👉 राष्ट्रहिताला विरोधी असलेला कोणताही संबंध भारताने ठेवू नये.
देश प्रथम – बाकी सर्व नंतर! 🇮🇳
आहे ते आहे
Sachin Jayshree Krishna Tale
सचिन कृष्णा तळे
#indiancricketteam #आहेतेआहे #pakistancricket #indian
No comments:
Post a Comment