ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी देव देश धर्म
अन समाज घडवला
ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी महाभारत, गीता
रामायण सारखे काव्य रचले
ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी ह्या हिंदवी स्वराज्याचे
एक एक क्षण टिपले
ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी कीर्तनातून अभांगातून
देवाला ही विठेवर उभे केले
ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी सत्यासाठी कर्तव्यासाठी
त्यागातून बलिदान दिले
ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी प्रेमाची इतिहासाची
आणि माणुसकीची ज्योत पेटवली
ते कवी कुठे आहेत ?
ज्यांच्या शब्द शब्दाला
अमृताची उपमा लाभली
ते कवी कुठे आहेत ?
ह्या कलीयुगात ...
ह्या विश्वात ...
ज्यांच्या पहाडी आवाजाने
आज ही
तो एक काळ गाजला होता
ते कवी कुठे आहेत?
त्यांची आज गरज आहे ...
-सचिन कृष्णा तळे
ज्यांनी देव देश धर्म
अन समाज घडवला
ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी महाभारत, गीता
रामायण सारखे काव्य रचले
ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी ह्या हिंदवी स्वराज्याचे
एक एक क्षण टिपले
ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी कीर्तनातून अभांगातून
देवाला ही विठेवर उभे केले
ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी सत्यासाठी कर्तव्यासाठी
त्यागातून बलिदान दिले
ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी प्रेमाची इतिहासाची
आणि माणुसकीची ज्योत पेटवली
ते कवी कुठे आहेत ?
ज्यांच्या शब्द शब्दाला
अमृताची उपमा लाभली
ते कवी कुठे आहेत ?
ह्या कलीयुगात ...
ह्या विश्वात ...
ज्यांच्या पहाडी आवाजाने
आज ही
तो एक काळ गाजला होता
ते कवी कुठे आहेत?
त्यांची आज गरज आहे ...
-सचिन कृष्णा तळे

No comments:
Post a Comment