Monday, 23 April 2018

ते कवी कुठे आहेत ?

ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी देव देश धर्म
अन समाज घडवला

ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी महाभारत, गीता 
रामायण सारखे काव्य रचले

ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी ह्या हिंदवी स्वराज्याचे
एक एक क्षण टिपले

ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी कीर्तनातून अभांगातून
देवाला ही विठेवर उभे केले

ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी सत्यासाठी कर्तव्यासाठी
त्यागातून बलिदान दिले

ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी प्रेमाची इतिहासाची
आणि माणुसकीची ज्योत पेटवली

ते कवी कुठे आहेत ?
ज्यांच्या शब्द शब्दाला
अमृताची उपमा लाभली

ते कवी कुठे आहेत ?
ह्या कलीयुगात ...
ह्या विश्वात ...
ज्यांच्या पहाडी आवाजाने
आज ही
तो एक काळ गाजला होता

ते कवी कुठे आहेत?

त्यांची आज गरज आहे ...

-सचिन कृष्णा तळे 




No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale