गावाकडच्या प्रत्येक माणसाला शहरी जीवनाचं आकर्षण असत कारण तिथे सहज मिळणाऱ्या सोयी सुविधा . आणि शहरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला गावाकडची ओढ असते कारण तिथे मिळणारी शांतात , निसर्गाची माया . पण माझा प्रवास हा शहराकडून एका शहराकडे झाला. म्हणजेच मुंबई ते पुणे . खूप वेळा मुंबईच्या किनारी नशीब अजमावून पाहण्याचा प्रयत्न केला पण शक्य झालं नाही. भारताच्या कोण्या कोपऱ्यातून माणसं नशीब अजमावायला अन रोजगार अन स्वतःला सिद्ध करण्यासाठी मुंबईची वाट धरतात आणि माझ्या सारखे भूमी पुत्र मुंबईत जन्म शिक्षण पूर्ण करून मुंबईची वाट सोडून परदेशी नाहीतर पुणे गाठतात . मुंबईने मला जन्म दिल लहानच मोठं केलं आणि पुण्याने माझ्या स्वप्नांना साकार केलं.
शिक्षण
पूर्ण झाल्यानंतर मुंबईत नोकरीचा शोध सुरु केला . कॉमर्स साईट मग नोकरी फक्त
मार्केटिंग आणि सेल्स ची . धरसोड चालूच होती . महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत आयुर्विमा महामंडळ चा एजंट झालो
आणि पॉलिसी काढत फिरू लागलो. त्यामुळे नोकरी शोधताना अनुभव पाहून फिल्ड वर्क शिवाय कोणतंच काम मिळत नव्हतं. पॉलिसी काढत एका गोडाऊन मध्ये मटेरियल स्टोरेज च काम शिकलो.
पुण्यात भावाच्या ओळखीने मग ह्याच फिल्ड
मध्ये मला नोकरी मिळाली . पिरंगुट इथे मी स्टोर किपर
म्हणून काम करू लागलो. घरापासून दूर मुंबई सोडून माझी पहिली नोकरी २००८ पासून चालू झाली ते हि महिना
३५०० रुपये पगारावर . आमची परिस्थिती तशी चांगली नव्हती आई वडील दोघे
हि शिलाईचं काम करत होते मग कधी कधी
आम्ही म्हणजे मी आणि माझी
बहीण आम्ही दोघे त्यांना हातभार लावत असो . हातपाय हलवल्याशिवाय पैसा नाही . कधी कधी वरण भात वर नाहीतर पिठलं
भाकर नाही तर मिरची आणि
तेल आणि चपाती . पण आमच्या आई
वडिलांची एक इच्छा होती
मुलांनी शिकावं मोठं व्हावं.
नोकरी
करून महिना पगार मिळत होता. पण काही तरी
करण्याची आणि नाव कमवण्याची जी धडपड होती
ती मिळत नव्हती. मुंबईत असताना एका राजकीय पक्षातर्फे
अनके सामाजिक कार्य केले आणि माहितीच्या आधाराखाली अनेक विषय जनतेसमोर आणले आणि त्याची दाखल अनेक वृत्तपत्राने घेतली . अधून मधून लेख प्रकाशित होत होते . महाविद्यालयं शिक्षण पूर्ण करत मी पत्रकारिता पूर्ण
केली . त्यामुळे सामाजिक अन राजकीय गोष्टींना
जवळून पाहता आलं. पण पुण्यात नोकरी
आणि फक्त नोकरीच
होती . त्यात वाचन चालू केलं. पुन्हा लिहायला सुरवात केली . आणि हे करत असताना
अनिमेशन चा कोर्स पूर्ण
केला . पुन्हा पुणे सोडून मुंबईची वाट धरली आणि १५०० रुपये पगारावर मुंबईत पवई मध्ये अनिमेशन च काम करू
लागलो . ती पण फिल्ड
अशी कि प्रोजेक्ट संपला
तर घरी प्रोजेक्ट असला तर काम आणि
पगार दोन तीन महिन्यातून एकदा . वडिलांना हे आवडलं नाही
आणि त्यांनी मला पुन्हा पुण्यात जाण्यास सांगितलं . मी पुन्हा पुण्यात
नोकरी करू लागलो. अनुभवाने माझ्या नावापुढे स्टोर किपर चा स्टॅम्प हा
असा बसला होता कि मी दुसरी
कडे कुठे हि ह्याच पोस्ट
साठी सिलेक्ट होत होतो . अनुभव तो हि फक्त
कारखान्यात भंडारपाल म्हणून त्यामुळे मुंबईत जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले. मुंबईत कारखाने राहिलेच नाही नवी मुंबईत आहे ते हि अखेरचा
श्वास घेत आहेत .
पिरंगुट
, कर्वे रोड ते
शिक्रापूर ते शिवणे ते
कात्रज हा पुण्यातला प्रवास
. मी खऱ्या अर्थाने जगासोमर आलो ते पुण्यातुन . माझे
प्रकशित साहित्य वाचून
अभिमानाने त्यांच्या मित्रांना दाखवणारे माझ्या वडिलांचे छत्र एकदिवस हरवरलं . एका महिन्यात बहीण च लग्न, आई
एकटी आणि पुण्यात नोकरी . नोकरी सोडावी लागली बहिणीचं लग्न पार पाडलं आईला पुण्यात घेऊन आलो. सहा महिने नोकरी नाही पगार नाही पैसा नाही . माझी आई आणि मी
दोघे हि असेच दिवस
काढत होतो आणि मी नोकरी साठी
वणवण फिरत होतो . एक दिवशी नवी
मुंबईत आणि पुण्यात दोन्ही ठिकाणी नोकरी मिळाली आता परत मुंबईत जाण्याची इच्छा नव्हती मग पुण्यातच स्थायिक
झालो .
पुण्यात
माझी ओळख लेखक , गीतकार , कवी तर एक सामाजिक
कार्यकर्ता म्हणून झाली . लहानपणी विमान पाहताना प्रश्न पडायचा कि आपण कधी
बसणार विमानात . पण ज्या कंपनीत
मी आता कार्यरत आहे तिथे हि संधी भेटली.
माझं पहिला विमान प्रवास हा पुण्यातून झाला
. माझं पाहिलं गीत आदर्श शिंदेच्या आवाजात गायलं गेलं ते हि पुण्यातच
. माझं पहिल्या चित्रपटात नाव झळकलं ते हि पुण्यातून
. माझे सर्वात जास्त लेख आणि कविता प्रकाशित झाले ते पुण्यातून. मी
पहिली कविता सादर केली ते पुण्याच्या बालगंधर्व
सभागृहातून. सायकल कधी घेतली नाही पन पहिली टू
व्हीलर घेतली ती पुण्यात आणि
मुलगी हि पुण्यातलीच भेटली
. चित्रपट महामंडळ आणि फ्लिम रायटर्स असोसिएशन च सदस्य पुण्यातूनच
मिळालं. माझ्या आगामी नवीन चित्रपटाचं लेखन हे पुण्यातूनच करतोय.
प्रत्येक
माणसाला गरज असते ती पैशाची , पैसा साठी चांगली नोकरी ची, नोकरी सोबत छोकरी आणि स्वतःला
सिद्ध करण्याची . मला ह्या सगळ्या गोष्टी परगावी मिळाल्या . मुंबई पुणे च्या ह्या प्रवासात मी असा घडलो
आणि मला घडवलं गेलं. चांगल्या वाईट गोष्टी हि फार घडल्या
खरे कोण आणि खोटे कोण ह्याची समज पुण्यातून मिळाली . आज मला पाहून
माझे बरेच मित्र पुण्यात स्थायिक झाले आहेत स्वतःला घडवत आहे एका शहरातून दुसऱ्या शहरात .
सचिन
कृष्णा तळे

No comments:
Post a Comment