Wednesday, 27 November 2019

उध्दव ठाकरे ह्यांची शपथ विधी पुर्वी

मुख्यमंत्री हाेणे आणि राज्य सांभाळणे हे साेपे काम नाही. राज्य राज्यातले प्रश्न आणि विराेधकांचा आवाज आणि त्यांना हजरजवाबी उत्तर देणे हे काैशल्य मुख्यमंत्री त हवं. देशामध्ये महाराष्ट्र राज्य हा असा एकमेव राज्य आहे जिथे सत्तापालट हाेण्यासाठी एक शब्द हि कारणीभूत ठरतं. फक्त एक चूक सरकार झाेपवते. टि आर पी साठी हापहापलेली मिडिया गिधाडां सारखी टपून असते. राज्यात रात्री अपरात्री घडलेल्या घटनेवर पाेहचणे. राज्यात नवे याेजना राबवून ती यशस्वी करने. केंद्रातून निधी आणने. रखडलेल्या याेजना मार्गी लावून पक्ष वाढवणे. ह्यात घर परिवार चार चाैकटीत न ठेवता त्याला राज्यांच्या सिमेशी जाेडने. जाे पर्यंत ह्या पदावर आहे ताे पर्यंत पुर्ण वेळ फक्त धावपळ असते. त्यात राज्यावर काेसळणारे आस्माणी संकट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, सट्टा बाजार, राजकारण इ. विषयांवर चाेख माहिती ठेवणे मुख्यमंत्री चे काम आहे.

उद्या उध्दव साहेब  राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपत घेतील आणि हेच आव्हान स्विकारणार आहेत. तुमच्या साेबत जे आहेत त्यांच्यावर विश्वास नव्हता आणि नसणार त्यामुळे उध्दव साहेबांनी सावध राहून कामगीरी उत्तम बजवावी आणि यशस्वी व्हावे हिच भवानी चरणी प्रार्थना. ज्यांचे पाय आधीच भ्रष्टाचाराच्या चिखलात रूजले आहेत ज्यांना जनतेने नाकारले आहे अश्या नापास आणि काटावर पास झालेल्या विद्यार्थी साेबत तुम्ही राज्य चालवणार आहे. एक बाळासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून काळजी, शेवटी आनंद आहेच भगव्याचा, ताे असणारच हिंदुत्वासाठी..फक्त सावध राहून राज्य करावे.

#आहेतेआहे
जय महाराष्ट्र
#सचिन_तळे


No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale