उत्तरम्य समुद्रस्य, हिमाद्रे शैव लक्षणम्
वर्षम् भारतम् नाम् ,भारतीय यत्र संततिः
म्हणजे समुद्रापासून उत्तरेला आणि हिमालयापासून
दक्षिणेला अशी जी भूमी आहे , जो भूखंड आहे तो म्हणजे भारत अन् त्या भारतभूमीची संतती
म्हणजेच भारतीय , जे भारतात जन्मले , मग ते कोणत्या हि धर्माचे , पंथाचे , जातीचे
, भाषेचे असो ते अगोदर भारतीय आहेत नंतर अमुक तमुक धर्माचे. जगातल्या प्राचीन संस्कृती
पैकी एक असणारी हि देवभूमी जिथे दैवी अंश जन्माला आले जिथे इतिहासाची पाने सुवर्ण अक्षरांनी
लिहिले गेले. क्षेत्रफळात सातव्या क्रमांकावर आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसंख्याच्या
बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असणारा आपला भारत देश. अनेक भाषा , प्रांत, रीतिरिवाज
, तसेच अनेक सण आणि अनेक धर्माना आश्रय आणि श्रद्धा पूर्वक मानसन्मान देणारा एकमेव
देश म्हणजे आपला भारत . जिथे मंदिराची आरती होते ,मस्जिद ची आजण होते , बुद्धांचे स्मरण
होते , चर्चमधून प्रार्थना होते तर जिथे बदल अन परिवर्तन हे निश्चित आहे, जिथे अन्यायाला
न्याय मिळते, जिथे भारताचे संविधान तितकेच महत्वाचे मानले जाते जितके धर्मग्रंथ आहेत.
अनेकतेतून एकता हीच ओळख आपल्या भारताची. हीच एकता कायम टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक
भारतीय हा प्रतन्यशील असतो फक्त काही राजकीय समाजकंठक अन धृत माणसं सोडली तर. काही
तरुण त्यांना बळी पडतात आणि देशाच्या संपत्तीची नुकसानी करतात , भिडतात , राजकीय दंगलीत
सामील होतात, समाजांतर्गत वाद निर्माण करतात. भारतासारखा सुरक्षित देश
जगात कुठेच नाही आणि जगात भारतीयांसारखा भोळा माणूस कुठेच नाही.
जागतिक पातळीवर जर पाहिलं तर भारत हा असा
एकमेव राष्ट्र असेल जिथे त्याच्याच भूमिपुत्रांना हक्कासाठी लढावं लागत , मरावं लागत,
मार खावं लागत. देशासाठी त्याच्या धर्मासाठी
त्याला बलिदान द्यावं लागत. भाषेवरून अन धर्मावरून वेळोवेळो त्याचे खच्चीकरण केले जात.
जर प्राचीन भारतावर नजर फिरवली तर सहज लक्ष्यात येईल कि, सिंधू नदी काठावरचा हिंदू
आणि बौद्ध ह्या दोन विश्व सुंदर धर्माची , वटवृक्षाची मुळे हे भारतातच रुजली अन फुलली
. इतर धर्म कसे आले आणि लादले गेले हे इतिहासाच्या रक्तरंजित पानांनी आजही ग्रंथालय
सजले आहेत. त्याचे अवशेष सहज दिसून येतात. भारताने सर्वधर्म समभाव ह्या त्याच्या गुणाने
इतर धर्माना हि मान दिला. अन्न वस्त्र निवारा माणसाच्या ह्या मूलभूत गरजा त्याशिवाय
माणूस जगू शकत नाही. ह्या गरजा जितक्या महत्वाच्या तितकंच महत्व आहे धर्म भाषा आणि
देश. मूलभूत गरजा जगण्यासाठी तर घडण्यासाठी आणि घडवण्यासाठी मानव हा धर्म जात अन भाषाचे
वापर करतो. ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाचे आपण देणे लागतो ह्याच धर्मावर
माणूस हा समूह करून राहू लागला. आपली परंपरा संस्कृती जपणे आणि पुढच्या पिढीला ती समजून
सांगणे हे आद्य कर्तव्य. धर्माची रक्षा करणे धर्म वाढवणे म्हणजे आपल्या धर्मात असलेले
चांगले विचार हे लोकांपर्यंत पोहचवणे , त्यांना
मार्ग दाखवणे . धर्मांतर हे स्वखुशीने असावे.
ज्याला त्याला मार्ग मोकळा आहे. ज्याचे त्याचे विचार हे स्वतंत्र आहे . परंतु धर्माच्या
ह्या कडव्या प्रचारात धर्मांतराची ठिणगी अशी पेटली कि माणूस हा अत्याचाराने , जबरदस्तीने
, अन्यायाने धर्मांतर करू लागला ... लादू लागला
हिंदू म्हणून जन्मलो
का हाच माझा अपराध आहे
माझ्याच देशात हिंदू
म्हणून का माझा विरोध आहे
वर्चस्व गाजवायच असेल तर एकता हि तोडायलाच
हवी. एकमेकांबद्दल मतभेद निर्माण करणे, वैर निर्माण करणे, फूट पाडून कार्य सिद्धीकरणे.
"तोडा फोड राज्य करा" कदाचित ह्याच वाक्यावर धर्मांतर आणि राष्ट्रांतरच बीज
पेरलं गेलं असावं. राष्ट्रांतर घडलं ते धर्मांतराच्या जोरावर हे जगजाहीर आहे. इतिहासाची
पाने चाळली तर धर्मांतरच्या वाहत्या प्रवाहात किती राष्ट्रांचा जन्म झाला हे सहज कळेल.
जगाच्या पाठीवरती जितके युद्ध झाले ते सगळे युद्ध स्वतःचे साम्राज्य वाढवण्यास कमी
तर धर्माच्या प्रचारास अधिक झाले हे कटू सत्य आहे आणि ह्याच आगीच्या धुराळात असंख्य
निष्पाप जीवांची होळी पेटवण्यात आली. पुढच्या पिढीला इतिहास कळू नये म्हणून असंख्य
ऐतिहासिक स्थळे भुईसपाट करण्यात आले उध्वस्त केले गेले. आठ वर्षांपूर्वी अफगाणिस्थान
मधील हिंदुकुश पर्वतरांगात जगातील मोठ्या मुर्त्यांपैकी असणारी बमियानचे बुद्ध नष्ट करण्यात आले. इतकेच नाही तर रस्त्यात येईल ते सर्व
बोद्ध आणि हिंदूंचे धार्मिक स्थळांची तोडफोड अन विटंबना करून नष्ट करण्याचे प्रयत्न
करण्यात आले.
" देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो " सावरकरांच्या अश्या क्रांतिकारी
विचारांना आपण सहज विसरतो आणि उलट त्यांच्या नावाने राजकारण करत समाजात जाळ लावून त्यावर
भाकरी शेकतो. जशी आपली संस्कृती तसा आपला देश. जर हि संस्कृतीचं बदली गेली तर देश हा
बदलणारच. धर्माच्या नावावर देशाची फाळणी झाली. पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन राष्ट्र
मुस्लिम राष्ट्र म्हणून जन्माला आली. तिथे हिंदू , शीख , इसाई , बौद्ध हे अल्पसंख्याक
आहेत. संयुक्त राष्ट्राच्या अहवाल नुसार ह्या दोन राष्ट्रात धर्मांतर आणि अल्पसंख्याक
लोकांवर सर्वात जास्त अत्याचार करण्यात आले आणि केले जात आहे. त्याच पार्शवभूमीवर भारतात
सरकारने नागरिकत्व कायदा लागू केला. त्या लोकसांसाठी जे फाळणीच्या काळात देशापासून
दुरावले गेले जे अत्याचार सहन करत आहेत. इथल्या मुस्लिम वर्गाला फाळणीच्या वेळी धर्माच्या
आधारवर देश हवा होता तो दिला गेला. आता भारतात जे मुस्लिम आहेत ते भारतीय मुस्लिम आहेत
त्यांना ह्या कायद्यापासून कोणतीच भीती नाही. भीती त्या लोकांना आहे ज्यांच्या कडे
पुरावे नाही. आणि तेच वाद पेटवू लागलेत. जे काही राजकीय पुढाऱ्यांची व्होट बँक आहे.
येणाऱ्या काळात त्यांच्यावर कार्यवाही करून त्यांना देशाबाहेर फेकण्याचे काम हे सरकार
च आहे तेच चालू आहे. देशातंर्गत सुरक्षतेसाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी लागू झाली पाहिजे.
शत्रू राष्ट्रातल्या काही आतंकी मुसलमानामुळे जे इथे घर करून बसलेत त्यांच्यामुळे इथल्या
मुस्लिम बांधवाना सामोरे जावे लागतंय, त्यांना अपमानित व्हावं लागत, त्यांना शक च्या
नजरेने पाहिलं जात. हे थांबवण्यासाठी हे पाऊल उचललने खूप महत्वाचे आहे. बांगलादेशातून
होणारी छुपी घुसकोरी हे पोलिसांच्या नोंदी मध्ये सहज दिसून येईल.
देशात फक्त मतासाठी मुस्लिम बांधवांना भीती दाखवून फूट पाडण्यात येत आहेत. ह्या कायद्याने मुस्लिमांना देशाबाहेर हाकलून लावणार अशी चुकीची अफवा पसरवली जात आहे आणि त्यात अभ्यास न करता विचार न करता काही मुस्लिम सहभागी होतायत. याना असं दाखवलं जातंय कि हे सर्व काही तुमच्या विरोधात चालू आहे. जे अल्पसंख्यांक पाकिस्तान बांगलादेशात आहे आणि जे भारतात आश्रय मागतायत त्या हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, पारशी बांधवाना नागरिकत्व देण्यात येण्यासाठी हा बिल आहे, मग इथे मुस्लिम बांधवाना त्रास होण्याचं कारण काय ? फक्त एकच लक्षात
ठेवा नवीन कायदा हा भारतात वैध भारतीय नागरिकांसाठी नाहीय तो अवैध पद्धतीने राहण्याऱ्या
लोकसांठी आहे आणि त्या लोकांसाठी पुळका आलाच नाही पाहिजे जे भारतीय नाहीत. त्यामुळे
हीच ती वेळ आहे भारता ...!!
धन्य ती लोकशाही, धन्य ती मतांची गर्दी
गुंडा पेक्षा नेत्यांची, वाटे भीती भीती भीती
सचिन कृष्णा तळे
पुणे कात्रज
७७०९०९९६४६
No comments:
Post a Comment