वृत्तवाहिनींचा उतावळेपणा
कामावरून घरी आलाे आणि नेहमीप्रमाणे फास्ट सुपर फास्ट बातम्या ( फक्त एका आेळीचे) पाहण्यासाठी टिव्ही चालू केला. ठळक बातम्या एका वरून एक एेकताना मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांची एक बातमी पाहिली. कि राजसाहेब ठाकरे ह्यांना मास्क न वापरला म्हणून १००० रूपयाचा दंड भरावा लागला वैगेरे वैगेरे... म्हंटले छानच काेणी ही असाे चूक झाली तर दंड भरलाच पाहिजे. पण एक जवाबदार नेता विना मास्क असा बाहेर पडणार नाही हे मात्र खात्री हाेती आणि चूकून जरी ते विना मास्क बाहेर पडले तर त्यांनी दंड भरला हे उत्तम.
पण विषय पहा.. राज साहेब ठाकरे बाहेर कुठे हि गेलेच नाही तरीही त्या क्लिप्स ची पडताळणी न करता सहज ठळक बातम्या आपल्या वृत्तवाहिनी ने प्रसारित केली. बातम्या दाखवण्याचा हा उतावळेपणा कितपत योग्य आहे. असे किती बातम्यांवर आम्ही विश्वास ठेवावा कितीवर न ठेवावे? राेज कामावरून थकून जेव्हा आपण घरी येताे तेव्हा वृत्तवाहिनी हि एकमेव पर्याय असताे जिथून आपल्याला आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांचा समाचार मिळत असताे. त्या ठिकाणा पर्यंत आपण पाेहचताे. तिथली परिस्थिती जाणून घेताे. आज हा जिवंत उदाहरण.
वांद्रे स्टेशनवर जमलेली गर्दी हि त्याचाच एक भाग हाेता...
ह्या अश्या बातम्यामुळे चुकिच्या माहितीने वृत्तवाहिनीचा विश्वास कमी हाेउ नये ह्यासाठी त्यांनीच पुढाकार घेयला हवा तरच लाेकशाहीचा चाैथा स्तंभ मजबूत राहिल.
सचिन कृष्णा तळे
#आहेतेआहे

No comments:
Post a Comment