भाषा आणि
युक्ती …
आपण रोज बोलतो,
आपले म्हणे पठवून देतो, हट्ट करतो आणि हट्ट पूर्ण हि करून घेतो. आपल्याला जर काही हवं
असेल तर आपण आपल्या आई वडील किंवा आजी आजोबा आणि भावाकडे बहिणीकडे अन मित्राकडे त्या विषयी सवांद साधतो. हा सवांद साधताना ज्या शब्दाची
आपण मदत घेतो ते शब्द म्हणजेच आपली भाषा जी आपल्याला आपल्या आई वडिलांकडून आपल्या शिक्षकाकडून
शिकायला मिळाली. लहान असताना आपल्या आजूबाजूचे लोक काय म्हणतात ते आपण काळजीपूर्वक
ऐकत असतो. एकदा का ते शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ काळाला कि आपण त्या नुसार चालतो वागतो.
भाषा हि आपल्या मनातील राग , आनंद , मनोगत , भावना , विचार , कृती इत्यादी प्रगट करण्याचे
साधन आहे. जशी आपली भाषा आहे तशीच आपल्या आजूबाजूला जे प्राणी आहेत त्यांची हि एक वेगळी
भाषा आहे, ती फक्त त्यांनाच कळते. मांजर म्याव म्याव करते , कुत्रा भुंकतो , कोकीळ
गाते , चिमणी चिव चिव करते इत्यादी हे सगळं
काही त्यांची भाषा आहे , जसे आपण बोलतो तसे ते हि बोलतात . जगात ६८०० हुन अधिक बोलीभाषा
आहे . आपल्या भारतात तब्बल १२२२ भाषा रोज वापरात आहे त्यातली २२ भाषा ह्या मुख्य भाषा
आहे .. यांत आसामी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोगरी, तमिळ,
तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मराठी, मल्याळम, मैतेई, मैथिली, संथाली, संस्कृत,
सिंधी, आणि हिंदी, यांचा समावेश होतो. जर आपण आपल्या जवळची कुठली हि दहा रुपयाची नोट
पहिली तर त्यावर प्रमुख १५ भाषांचा समावेश आहे. जे दहा लाख किंवा त्याहून अधिक लोक
आपल्या रोजच्या व्यवहारात वापरतात . आपली मातृ भाषा मराठी हि सुद्धा ह्याच प्रमुख भाषेत
आहे. ज्ञानेश्वरांनी लहानपणी ह्याच भाषेच्या मदतीने रेड्यातोंडी वेद वदवून घेतले होते.
आता हि झाली भाषा बद्दलची थोडक्यात माहिती. भाषेवर बोलायला सांगायला गेलं तर खूप काही
आहे. ह्याच भाषेवरून एक गोष्ट तुम्हाला सांगतो . भाषा कशी तयार झाली , भाषा तयार करण्याची
गरज का पडली, आणि भाषेचं महत्व आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी व आपल्यासाठी का
महत्वाची आहे ती.
हि गोष्ट
फार जुनी आहे मला ती माझ्या आजीने सांगितली होती. एक राजा होता आणि त्याच भल मोठ असं
राज्य होत. त्या राज्यात सर्व प्रजा हि सुखी होती समाधानी होती. त्या राज्यातले लोक
हि फार आनंदी आणि समृद्धता मध्ये नटलेले होते.कोणाची नजर न लागो असं ते राज्य होत.
एके दिवस त्या राज्यावर एका क्रूर राजाची नजर पडली. त्याला तिथलं वैभव पाहावलं नाही.
दोन्ही राजाची राज्य भाषा हि सारखी होती त्यामुळे त्या राज्यात काय चालय हे त्याला
लगीच कळत असे. तो क्रूर राजा आपला गुप्तहेर त्या राज्यात पाठवून त्याच्या मदतीने तिथली
माहित गोळा करायचा आणि त्या राज्यावर व चांगल्या राजावर सारखा आक्रमण करून तिथली संपत्ती
लुटायचा. पण इथली माहिती तिथल्या क्रूर राजाला कशी काय कळतीय हे कळतच नव्हतं. कोणीतरी
आहे जो माहिती गोळा करतो आणि त्यांना देतोय हे लक्ष्यात आल्यावर राजाने दरबार भरवलं.
दरबारात सगळे जमा झाले , राजा , प्रधान , पंडित , कलावंत, कवी, लेखक , भाषिक , तज्ञ्
आणि काही प्रजा . विषय निघाला त्यावर बरीच चर्चा झाली. पण प्रश्नाचे उत्तर काही मिळत
नव्हतं. शेवटी एक व्यक्ती समोर आला आणि म्हणाला " राजे माझ्या कडे एक युक्ती आहे
जर तुमची इच्छा आणि आदेश असेल तर मी सांगतो " राजा म्हणाला " हो सांगा
... त्यासाठीच इथे तुम्हाला सगळ्यांना मी आज बोलावलं आहे " तो व्यक्ती आपले मत
मांडू लागला. त्याचे विचार व युक्ती राजाला आवडली. लगेच राजाने फरमान सोडला आदेश सोडला
एका तज्ञाला बोलावून त्यानुसार ते कार्य चालू
केलं, कवी लेखक कलावंत ह्यांच्या मदतीने राज्यात लोकांपर्यंत ते पोहोचवलं. प्रधान जातीने
दिवसरात्र त्यावर नजर ठेवू लागला. एक दिवस संपूर्ण राज्य त्या युक्ती वर चालू लागली.
आणि त्याचा परिणाम हि त्या राजा व प्रजेसमोर आला. त्या क्रूर राजा ला हार पत्करावी
लागली कारण त्याला आता कोणतीच माहिती मिळू शकली नाही. त्याचा तो गुप्तहेर हि पकडला
गेला.
तर त्या व्यक्तीने
अशी कोणती युक्ती सांगितली होती जी राजाने त्याच्या साह्याने आपले राज्य वाचवले. ती
युक्ती होती भाषा बदलण्याची.एक अशी भाषा निर्माण करायची जी कोणाला कळणार नाही. जी भाषा
आहे त्या भाषेला अनुसरून एक अशी भाषा हवि कि जी फक्त आपल्या राज्यातल्या लोकांनाच कळेल.
दोन्ही राज्यातली भाषा हि सारखी होती म्हणून इथली सर्व माहिती त्या क्रूर राजाला मिळायची.
त्या प्रकारे राज्यातल्या तज्ञाकडून एक भाषा तयार करण्यात आली , ती कवी लेखक शिक्षक
ह्यांच्या द्वारे राज्यात शिकवली गेली . त्यासाठी राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीस एक
ओळख पत्र देऊन त्यांची कार्यशाळा चालू केली. आणि एक दिवस सगळे जण तीच भाषा बोलू लागले.
भाषा बदलली हे त्या क्रूर राजाला माहित नव्हतं. जेव्हा त्याने त्याचा गुप्तहेर त्या
राज्यात पाठवला तेव्हा त्याला काहीच कळेनासं झालं , त्याची चोरी पकडली गेली . त्याला
दरबारी उभ करून शिक्षा केली. काही दिवसाने जेव्हा त्या क्रूर राजानेआपल्या सैन्यासोबत
आक्रमण केले तेव्हा तिथली रचना व त्या राजाने आखलेली रण योजना कळलीच नाही . शेवटी त्याला
हार पदरी घेऊन परतावे लागले.
तर मित्रानो,
एक भाषा बदलली म्हणून त्या चांगल्या राजाने आपले राज्य वाचवले .त्याच प्रकारे आपली
मराठी , कोकणी , अहिराणी तर बाजूच्या राज्यात तामिळ , तेलगू , कन्नड , पंजाबी , उर्दू
असे अनेक भाषा निर्माण झालेत. आज आपल्या देशावर आक्रमणे होतात , आपल्या देशात हिंसा
पसरवली जाते . शेजारच्या देशांना आपली सगळी माहिती मिळते . कारण त्यांना आपली हिंदी
हि भाषा येते, कळते . त्यांना हिंदी ह्या भाषेच
ज्ञान आहे. आपल्या भारतात प्राचीन भाषा म्हणून संस्कृत आणि पाली भाषा हि प्रचलित आहे.
आणि त्याच्याच ह्या पोटजाती. संस्कृत ह्या भाषेला आपण देव भाषा म्हणतो आपल्या पूजा
अर्चना मध्ये त्याचा वापर करतो . आपले ग्रंथ ह्याच भाषेत लिहिली गेली. देवांना हि भाषा
आवडते. जर देव देश वाचवायचा असेल तर भाषा शिकली पाहिजे .आता साधं उदाहरण देतो , जर
तुम्हाला परदेशात जायचं असेल तर तुम्हाला तिथली भाषा आधी शिकावी लागते . नाहीतर तिथली
भाषा कळणारच नाही. कवी कुसुमाग्रज ह्यांच्या जन्मदिवशी २७ फेब. ला आपण मराठी भाषा दिवस
म्हणून साजरा करतो. संत ज्ञानेश्वर महाराज ह्याच आपल्या मराठी भाषेची थोरवी सांगताना
लिहितात
जैसी दीपांमाझि
दिवटी। का तिथी माझि पूर्णिमा गोमटी।
तैसी भाषांमध्ये
मऱ्हाटी। सर्वोत्तम।।
तीर्थांमध्ये
काशी। व्रतांमध्ये एकादशी।
भाषांमध्ये
तैशी। मऱ्हाटी शोभिवंत।।
माझा मराठाचि
बोलु कौतुके। परि अमृतातेंही पैजां जिंके।
ऐसी अक्षरें
रसिकें। मेळवीन।।
मग आपल्या
राज्यासाठी मराठी, परदेशासाठी इंग्रजी आणि देशासाठी संस्कृत शिकूया .
सचिन कृष्णा तळे
पुणे
७७०९०९९६४६
No comments:
Post a Comment