राजकारण मुक्त भारत हवं
सागराच्या
लाटा जेव्हा किनाऱ्यावर येऊन धडकतात तेव्हा त्या सोबत शंख शिंपल्या तसेच मनाला स्पर्श करणारा एक आनंद मिळतो
पण कधी कधी मानवनिर्मित मानवाने विसर्जित केलेली घाण देखील आपल्याला पाहायला मिळते. अगदी तसेच माणसाचं मन आणि विचार
आहेत . रोज हजारो विचाराने आपले मन विचलित तर
कधी आनंदी होत असतं आणि कधी कधी ह्याच विचारातून आपण निर्णय घेतो. खरं सांगायचं तर अगदी त्याच
प्रमाणे माणसाच्या मनावर मानवानेच निर्माण केलेले अनेक चांगले वाईट घटना प्रसंग वातावरणाला सामोरे जावे लागते. घराच्या चार भिंती मध्ये घडणाऱ्या गोष्टी मुळे फक्त घरातल्या वातावरणात फरक पडतो पण देशाच्या सीमे
अंतर्गत घडणाऱ्या गोष्टी मुळे सगळं समाज विचलित होतो. इथला प्रत्येक व्यक्ती आज सोशल मीडियावर
आहे आणि त्याच सोशल मीडियावर तो सहज व्यक्त
होतो . सोशल मीडियावर आज जोरदार एक
शीत युद्ध चालू आहे. इथे वैचारिक लढाई सोडून एकमेकांबद्दल द्वेष आणि त्या द्वेशातून माझा देश बिघडतोय आणि त्यासाठी जिम्मेदार हे आजचे राजकीय
पुढारी नेते. घरातले चढउतार फक्त एका घरा पुरते सीमित असतं जर देशात चढ
उतार झाले तर लाखो घरांचे
दार अश्रूंच्या पुराणे वाहून जातील.
राजकीय
सत्ता आणि त्या सत्तेची लालच तसेच स्वतःच अस्तित्व गाजवण्यासाठी नेते मंडळी वाटेल ती
शाब्दिक चिखलफेक करतायत. एक काळ असा पहिला होता जिथे नेते म्हणजे आदर्श मानले जायचे
आणि आज असा काळ अनुभवतोय पाहतोय जिथे नेते
ह्याच सोशल मीडियावर शिव्या खातायत ,भर रस्त्यात कोणीतरी येऊन कानाखाली वाजवतॊय. इथले
राजकीय समर्थक नेत्याची भूमिका डोक्यावर घेऊन त्यांच्या विरोधी जो बोलेल त्याला मारहाण
करून कोणाच्या प्रश्न सोडू इच्छितात हे त्यांनाच माहित. देशाची नाही तर स्वतःची इमेज
प्रतिमा तयार करण्यात इथला प्रत्येक नेता आणि त्या नेत्याची समर्थक एकमेकांविरोधी भिडले
आहेत. बरेच वेळा ह्याच नेत्यांकडून अशी काय भाषणे होतात कि ती कॉमन म्यान सामान्य माणूस
हा फक्त मनोरंजन म्हणून पाहतो. त्यांच्या भाषणातून माणूस माणसाविरोधी , एक समाज दुसऱ्या
समाजविरोधी , एक धर्म दुसऱ्या धर्माविषयी बोलतो भांडतो तिरस्कार करून दंगलीच रक्तरंजित
राजकारण खेळतो आणि ह्या खेळात सामान्य माणूस चिरडला जातो मारला जातो . पक्षाची भूमिका महत्वाची पक्ष महत्वाचा
पण राष्ट्र नाही , नेता महत्वाचा नेत्याची भाषणे महत्वाची पण देश आणि देशाची नियमावली
महत्वाची नाही.
मनात
अनेक प्रश्न असतात आणि कालांतराने ते सुटतात देखील
पण सगळयात भयानक आणि गंभीर असा एकच प्रश्न देशाचा विकास जनतेचा विकास . शेतकऱ्यांची आत्महत्या , वाढती लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणारी रॊजगारी तसेच शहरीकरणात अपुरी पडणारी जागा , जगातिक स्तरावर देशाचं स्थान , सीमेवर होणारे रोजचे आघात , बलात्कार आणि पैशाचा काळ बाजार. असे बरेच प्रश्न आणि त्या प्रश्नाची उत्तर देशाला कधी मिळनार. कोण देशाला ह्या सगळ्या प्रशांतून बाहेर आणणार . असा कोणता नेता आहे जो निस्वार्थी देशासाठी
जनतेसाठी भाषणे करतोय . असा कोणता नेता आहे जो त्याच्या सभेतून
जनतेचे प्रश्न आणि त्या प्रश्नाची उत्तर शोधून लोकांना पटवून देतोय ? निवडणुकीत घरा बाहेर पडून आव आणणारे नेते
दुष्काळाची तळमळ निवडणुकीच्या तोंडावर दाखवणारे नेते सत्ता असतानां आणि नसताना उपाय योजना का आणू शकत
नाही. माझा देश हा माझा देह
आहे. जर माझा देश
बिघडला तर माझे घर
हे आपोपाप बिघडेल. नेत्यांचे भाषणे आस्वासने आणि भ्रष्टाचार त्यातून अपुरी सुविधा. हे आता कुठंतरी
थांबलं पाहिजे आम्हाला आझादी हवी स्वच्छ सुंदर भारतातुन राजकारण मुक्त भारत हवं.
सचिन
कृष्णा तळे
तिरुपती
निवास
लेन
नंबर ७ , सुखसागर नगर भाग १
कात्रज
, पुणे
७७०९०९९६४६
No comments:
Post a Comment