Friday, 18 October 2019

महाराष्ट्राच्या इतिहासात आणि वर्तमानकाळात माणसा इतकच काही ऐतिहासिक गादीला आणि काही राजकीय खुर्चीला खूप मानाचा मान आहे. कारण त्यावर विराजमान होणारी व्यक्ती हि असामान्य आहे. ऐतिहासीक गादी बद्दल काय बोलावं त्यासाठी अनेक इतिहासकार हे लिहून बसलेत अनेक इतिहासकार लिहीत आहेत. मतदानाचा हक्क बाजवांताना राज्यात खास करून मुंबई प्रांतात दोन राजकीय खुर्च्यांचं मला जास्त जवळीक वाटते. ते दोन खुर्ची तरुणांच्या रक्तालाच गरम ठेवत नाही तर महाराष्ट्रातल्या  प्रत्येकाना तरुण बनवते आणि लढायला  प्रेरणा देते. आज ह्या दोनी खुर्च्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत . एक मातोश्री आणि दुसरे कृष्णकुंज. आजही अनेक कार्यकर्ते ह्या दोन खुर्च्यांना देवहऱ्यातील देवा इतकच पूजतात. राजकारणात सर्व राजकीय नेत्यांना तसेच राज्यातील सामान्य माणसांना पाहिजे तेव्हा आकर्षित करून घेण्याची ताकद ह्या दोन खुर्च्यात आहेत. आज जरी हे दोन खुर्च्या विरोधात असतील तरी एक मराठी माणूस म्हणून आमच्या अपेक्षा इथेच रेंगाळतायत.

सचिन कृष्णा तळे 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale