Friday, 31 December 2021

कार्यकर्त्यांनो ... तुमच्या तारुण्यातून हा देश घडला पाहिजे.

 


हिवाळा (शिशिर ऋतू) सुरू झाला की वातारणातील तापमाण कमी होत आणि वृक्षांची वाढ मंदावते अन पानगळी दिसून येते. पानाफुलांनी बहरलेलं झाड अचानक आपल्याला कमजोर दिसू लागतं. त्या झाडाच्या अस्तित्वावर आपण प्रशचिन्ह उपस्थित करतो. ह्याचा अर्थ असा नसतो कि आता झाड पूर्णपणे सुकलं आहे त्याला पालवी फुटणार नाही ते पुन्हा बहरणार नाही. मुळात आपण इथेच फसतो. जे दिसत तस नसतं. पण ह्याच पानगळीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अन्नद्रव्यांची साठवण आणि वसंत ऋतूमध्ये सुरू होणा-या फुलांचा बहर आणि फळधारणा हा आहे. ते पुन्हा बहरत, पुन्हा फुलतं अन पुन्हा सगळ्यांना आकर्षित करतं. निसर्गाचे नियम माणसाला लागू आहेत. पण हाच क्रम राजकीय पक्षाला हि लागू पडतो. म्हणून पक्षांतर करताना राजकारणात काळजीपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. ज्यावेळी अमुक पक्षातून नेते मंडळी सोडून जात असतात नेमकी त्याच वेळी नवोदित राजकीय मंडीळीना राजकीय करियर घडवण्याची संधी असते. हीच ती वेळ असते जिथे तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करून पक्षश्रेष्टीं च्या नजरेत येऊ शकता. पण इथे आपण डगमगतो आणि नकारात्त्मक विचारांनी चुकीचे पाऊल टाकतो.

अनेक राजकीय नेते कार्यकर्ते ह्यांचे मनसुबे हे फक्त सत्ता मिळवणे सत्तेत राहून चर्चेत राहणे अन बक्कळ पैसा कमावणे आहे. प्रतिष्ठा मानसन्मान अन मोठेपणा मिळवण्यासाठी हि मंडळी वाटेल त्या थराला जातात. भाजी फुले विकणाऱ्यापासून ते रिक्षा चालवणारा आज राजकारणात कोट्यधीश होतो त्यांच्यावर ईडी ची चौकशी बसावी इतके ते श्रीमंत होतात फक्त राजकीय करियर मुळे. आणि हीच मंडळी नव्या राजकीय कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करतात. राजकारण हे समाजासाठी , देशहितासाठी असेल तर त्याचे कौतुक होते आणि जर स्वार्था साठी असेल तर त्याची माती होते. राजकीय शक्तीने सत्ता मिळवून भोग घेण्यापेक्षा त्या सत्तेचा उपयोग जनसेवेसाठी करणारा कार्यकर्ता समाजात आदरणीय ठरतो. राजकारणात तुमचा बेस हा मजबूत तेव्हाच राहतो जेव्हा तुमची नाळ हि सामान्य लोकांमध्ये मिसळलेली  असते. चांगल्या राजकीय तरुणांनी निवडणूक लढावी आणि देश हाती घ्यावं हे स्वामी विवेकानंदाचे स्वप्न आहे. अपयशाला खचून जाता कार्य करत राहणे हेच कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे.

समाजाप्रती शुद्ध समाजसेवेची भावना मनात ठेवून कार्य करणारे मंडळी बोटावर मोजण्या इतपत असतील. ज्यांचा जन्म समाजसेवेसाठी झाला त्यांना सत्तेशी अन पक्षाशी काही घेणं देणं नसतं. अशी माणसं उशिरा का होईना पण एक ना एक दिवस चर्चेत येतात उजेडात येतात आणि त्यांच्या कामाचा गौरव हि समाजातून केला जातो हे लक्ष्यात ठेवा. राजकारणात संधी प्रत्येकाला मिळते पण त्याच सोन करायचं कि माती हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे. शून्यातून विश्व् निर्माण करणाऱ्या नेत्यांचा प्रवास हा खूप खडतर कष्टातून अन चिकाटीतून मिळालेला असतो. त्यामागे त्यांची मेहनत असतीच पण त्यांच्या कार्यावर प्रेम करणारी त्यांच्या विचारांवर चालणारा एक मोठा लोक समूह त्यांच्या मागे ठाम उभा असतो. असा वर्ग जो त्या नेत्याचा एकही शब्द खाली पडू देत नाही. अशी कार्यकर्ते कमवण्यासाठी आधी स्वतः स्वतःशी प्रामाणिक राहावं स्वतःच्या विचाराशी प्रामाणिक असावं लागतं. तेव्हाच आपण लोकप्रतिनिधी म्हणवून घेऊ.

वरील पानगळीच उदाहरण त्याच गल्लीबोळातल्या नेत्यांसाठी त्या कार्यकर्त्यांसाठी आहे जे आज सत्तेसाठी किंवा स्वार्थासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारतात. झटपट प्रसिद्धीच्या नादात चुकीचे पाऊल उचलून स्वतःच राजकीय आयुष्य संपवून बसतात. एकीकडे मंत्र्यांचा मुलगाच मंत्री होतो, ज्याच्या कडे पैसा तोच राजकारणात टिकतो अशी बोंब मारून आपण किती कुमकुवत विचारांचे आहोत ह्याच प्रदर्शन करणारे तर दुसरीकडे जिथे संधी मिळाली त्या संधीचा पुरेपूर उपयोग करून राजकारणात यश मिळू पाहणारे हाडाचे कार्यकर्ते आहेत. निवडणूक लागली किंवा निवडणुकांची वेळ आली कि नाराज कार्यकर्त्यांची भली मोठी लिस्टच सगळ्या राजकीय पक्षातून निर्माण होते. पक्षांतर करून राजकीय संधी मिळवणे हा गुन्हा नाही जिथे संधी मिळेल तिथे आपल नशीब नक्की अजमाव.

आपल्या देशात तरुणांची संख्या हि खूप जास्त आहे. फक्त त्यांचा अभ्यास कमी दिसून येतोय. इथल्या तरुणांचा राजकारणात मोठा सहभाग आहे पण स्वतःच्या विचारांना त्यांनी कुलूप लावून पक्षाची लक्ष्मण रेखा आखली आहे. म्हणून तर इथला प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाच्या विचारांच्या अवती भवतीच फिरताना दिसतोय. नेता म्हणेल तेव्हाच हालचाल करायची , तेव्हाच पेटून उठायच, तेव्हाच विषयाला हात घालायचा ह्याच्या पलीकडे त्याचे धाडस होत नाही. आता हे बदलायला हवं. तुमच्या चांगल्या विचारातून, तुमच्या शिक्षणातून, तुमच्या नव्या तंत्रातून, तुमच्या उसळत्या रक्तातून , तुमच्या तारुण्यातून हा देश घडला पाहिजे. 

 

सचिन कृष्णा तळे

 Pune- 7709099646

 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale