Monday, 24 January 2022

मुंबई मराठी साहित्य संघ

 


 


महाराष्ट्राच्या मातीला इथल्या शब्दांना साहित्याचा खूप मोठा वारसा आहे. आजही हा वारसा राज्यातल्या प्रमुख शहरात जोपासला जातो त्याला घराघरात पोहोचवलं जात हि आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. खास करून अश्या शहरात जिथे भारतातल्या तसेच जगातल्या सगळ्या भाषा बोल्या जातात. महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे मुंबई.  इथे परप्रांतीय लोकांच्या वाढत्या लोकसंख्येत स्वतःच अस्तित्व टिकवून मराठी साठी आग्रही असणारे महाराष्ट्रीन आणि ह्याच मराठी माणसाला मराठी भाषेविषयी जागृत करणारी मराठी भाषेची मराठी साहित्याची ओढ निर्माण करणारी साहित्य संस्था म्हणजेच मुंबई मराठी साहित्य संघ.

 

२१ जुलै १९३५ रोजी स्थापन झालेल्या साहित्य संघाला यंदा ८७ वर्ष होतील. संस्थेचे पहिले संस्थापक डॉ. अ ना. भालेकर यांच्या गिरगावातील नारायण सदन या निवासस्थानी ह्या संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासून हि संस्था गिरगावातल्या त्याच ठिकाणी आहे. बहुभाषा बोली जाणाऱ्या मुंबईत ह्या संस्थे तर्फे मराठी भाषा संवर्धन हेतू किती मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे हे तुम्हीच पहा. ह्या संस्थे मार्फत मुंबई अन मुंबई उपनर ह्या भागात कवींचे कविसंमेलने भरवणे त्यांना प्रोत्साहन देणे, नवोदित लेखकांचे ग्रंथनिर्मिती करणे, नाकटांचे नाट्यमहोस्तव तसेच नाट्य संमेलन भरवून नाट्य क्षेत्राची गोडी निर्माण करणे, नियतकालिके प्रकाशित करणे , साहित्य क्षेत्रात महत्वपूर्ण काम करणाऱ्या साहित्यिकांना पारोतोषिक देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करणे , भाषाध्यापन , मान्यवरांचे व्याख्याने ,साहित्यविषयक प्रासंगिक चर्चा घडवून आणणे , महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वर्ग चालविणे इ असे या साहित्य संघाच्या कार्याचे स्वरूप आहे. १९४४ मध्ये साहित्य संघाने मुंबई येथे खुल्या नाट्यगृहात मोठ्या प्रमाणावर नाट्योत्सव साजरा केला, इतकेच नव्हे तर त्यानंतर दरसाल कमीअधिक प्रमाणात मुंबईत नाट्योत्सव साजरा करण्याची प्रथा पाडलीं . आणि ही प्रथा आजपर्यंत संघाने अव्याहत पाळली आहे.

 

स्वातंत्रवीर सावरकर, आचार्य अत्रे. राजकवी यशवंत अश्या दिग्गजांच्या अध्यक्षतेखाली संघाने साहित्य संमेलन भरवले. मुंबई मराठी साहित्य संघाचं मुख्य आकर्षण म्हणजे त्यांनी साहित्य जपणूक म्हणून अनेक नाटकांची ध्वनिफीत आजही जपून ठेवली आहेत. साहित्य संघात सुमारे १९४० पासून सादर झालेली विविध नाटकांचा आणि विविध साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचा या खजिन्यात समावेश आहे. 'अमर भूपाळी या चित्रपटाची ध्वनिफीत असो किंवा कुमार गंधर्व यांचे ‘मला उमजलेले बालगंधर्व’ या विषयावर केलेले भाषण असो किंवा मुंबई मराठी साहित्य संघाची ‘वाजे पाऊल आपुले, ‘नटसम्राट, ‘अश्रूंची झाली फुले, ‘पती गेले गं काठेवाडी, ‘पळा पळा कोण पुढे पळे तो ह्या रसिकप्रिय नाटकांची ध्वनिफीत आजही संघाच्या कर्यलायात उपलब्ध आहेत आणि ती तुम्हाला पाहायला ऐकायला मिळतील.

१९५१ साली नाटकांवरील करमणूक कर हा माफ व्हावा , नाट्यगृहे व नाट्यप्रयोग याबाबत इतर सरकारी निर्बंध दूर व्हावेत म्हणून संघाने त्यावेळचे गृहमंत्री मोरारजी  देसाई ह्यांची भेट घेऊन त्यांना मुंबई मराठी साहित्य संघ तर्फे निवेदन दिले.

 

-      सचिन कृष्णा तळे

 7709099646

 

 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale