राज्यात वाईन हा विषय विरोधकांनी चांगलाच उचलून धरला आहे. सोशल मीडियावरून हि विरोध दर्शवला जात आहे. विरोधकांकडून विरोध होणे हे साहजिकच आहे रास्त आहे. पण जनसामान्य लोकांकडून हि ह्या निर्णयाचा विरोध दिसतोय. वाईन जरी द्राक्षे किंवा धान्यापासून बनवत असले तरी हि दारूच्या दर्जात मोडते. इतकेच काय तर मर्यादेत व नियमित वाईनचे सेवन केल्यास हृदयरोगाची शक्यता कमी होते असा दावा केला जातो. वाईन च्या विक्रीने जर शेतकरी वर्गाचा फायदा होणार असेल तर त्याचे सर्व सामान्य शेतकरी वर्गातून स्वागत च केले जाईल. मुळात सरसकट सर्वच शेतकरींना ह्याचा फायदा होणार आहे असेही नाही. जे बागायतदार आहेत जे द्राक्षे किंवा वाईन साठी उपयुक्त पीक घेतात त्यांनाच काय तो त्याचा फायदा.
सुपर मार्केट , मॉल तसेच
किराणा दुकानात आता सहज वाईन उपलब्ध होणार आहे . कारण गेल्या गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या
बैठकीत सुपर मार्केट , मॉल तसेच किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली
आहे. एक हजार चौरस फुटांपेक्षा जास्त आकारमानाच्या सुपरमार्केट मध्ये एक स्टोल टाकून
तुम्ही वाईन विक्री करू शकता. हो ,हि छोट्या मोठ्या उद्योगपती व्यापारी साठी आनंदाची
बातमी असावी पण परंतु हि बातमी निराशाजनक ठरू शकते. आजपासून आपण आता आपल्या शॉप मध्ये
वाईन विक्री करू शकतो ह्या विचारात जर व्यापारी असतील तर तस अजिबात नाहीय. व्यापारी
वर्गाला हे माहित असावं कि एखाद वाईन शॉप, बियर शॉप किंवा दारूचे अधिकृत दुकान चालू
करायचं असेल तर त्यासाठी लायसन्स घेणे बंधनाकार आहे. आणि ह्या लायसन्स ची रक्कम किती
लाखांच्या घरात आहे हे सांगायची गरज नाही. तुमच्या दुकानात तुम्हाला हि वाईन विक्रीसाठी
ठेवायची असेल तर तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात जाऊन आधी वाईन वक्रीसाठीचा
रीतसर लाख रूपये खर्च करून परवाना घेणे आणि त्याला दरवर्षी नुतीनीकरण करावे लागणार
आहे. आणि हीच सरकारची खरी कमाई आहे.
जर वाईन विक्रीने व्यापारी
वर्गाचा फायदा होईल असं वाटत असेल तर तस हि नाही. कारण हि वाईन तुम्हाला च खरेदी करून तुम्हालाच ती विकावी लागणार आहे. व्यापारी दृष्टीने
नफ्याची बाजू पाहिलं तर ह्यात जीएसटी अन उत्पादन कर ने सगळ्यात जास्त फायदा नफा हा
सरकारचा असणार आहे. दारू मद्य पिणारा व्यक्ती जो पर्यंत त्याला किक बसत नाही , जो पर्यंत
त्याला गुंगी येत नाही तोपर्यंत तो पितो. वाईनने सहसा लवकर गुंगी येत नाही. त्यासाठी
वाईन खरेदी करायला येणार ग्राहक हा कोणत्या स्तिथी मध्ये असेल हे सांगता येत नाही.
सुपर मार्केट अन किराणा माल च्या दुकानांचा मुख्य ग्राहक हा महिला वर्ग आहे. जर तिथे
तळीराम वाईन खरेदी साठी येऊ लागले तर महिला तुमच्या दुकानात येतील का? ते सुरक्षित
खरेदी करू शकतील का? तिथे काही अनर्थ प्रकार घडणार नाही ना? अश्या अनेक प्रश्नाच विचार
हि होणे गरजेचे आहे.
वाईन विक्रीने शेतकरी, व्यापारी
अन सरकारी नफा तोट्याचा विचार आपण करत राहू. पण मुख्य मुद्दा हा आपल्या तरुण पिढीचा
सुद्धा आहे. आजवर आपल्या नजरेत हे आलं असेल कि महाविद्यालय मधील तरुण तरुणी किंवा ऑफिस
मधील काही कर्मचारी जेव्हा मिळून मिसळून पार्टी पिकनिक वैगेरे करण्यासाठी बाहेर परगावी
जातात त्यावेळी हार्ड ड्रिंक वाले काही तरुण मंडळी तिथे असलेल्या निर्व्यसनी तरुणांना
सॉफ्ट ड्रिंक आहे काही होत नाही घे म्हणून ती पेयाला प्रवृत्त करतात. मैत्रीच्या मस्तीत जर हि चव ह्या
निर्व्यसनी तरुणांच्या जिभेवर रेंगाळली तर भविष्यात त्या मुलांना त्याची सवय लागेल.
प्रत्येक वेळी ते वाईनच पितील असं हि नाही . वाईन म्हणत बियर अन बियर म्हणत ब्रँडी
च्या जाळ्यात कधी फसतील हे त्यांनाच कळून येणार नाही. विशेषतः घरापासून आईवडिलांपासून
दूर शिक्षण घेणारे, नोकरी करणारे, हॉस्टेल लाईफ जगणारे या पुढे बिनधास्त तुम्हाला मॉल
किंवा सुपर मार्केट मध्ये वाईन खरेदी करतात दिसतील. ह्याचे परिणाम आता दिसून येणार
नाहीत पण हे असचं चालू राहील तर नक्कीच आपली भावी पिढी हि नशेत दिसेल आणि त्याला जवाबदार
फक्त हे सरकार असेल. सरकारी उत्पन्न वाढव्याच्या
नादात हे सरकार मोठी चूक करत आहे.
सचिन कृष्णा तळे , पुणे
७७०९०९९६४६
No comments:
Post a Comment