Saturday, 29 January 2022

गझल : एक नाही, अनेक विषयांवर बोलते !

 


 

मार्ग काहीतरी काढ ह्यातून रे

हार मानू नको तू असा सारखा

 

सोबतीची जरी सर्व झाले पशु

तू तरी वाग ना माणसासारखा

 जेष्ठ गझलकार प्रा. श्रीकृष्ण राऊत ह्यांच्या "तू तरी" ह्या गझलेतील हि ओळ. कविता जितक्या वाचायला आणि ऐकायला सुंदर श्रवणीय वाटतात त्याहून सुंदर गझल. कारण गझल हि एका विषयावर आशेवर ना थांबता ती आधीक विषयावर बोलते. दोन्ही ओळी समांतर मात्रात आणि मतल्याच्या दोन्ही ओळींमधे काफ़िया रदीफ़ असल्याने संगीतकाराना देखील गझल अगदी मोहक वाटते. उत्तम कवीच एक चांगली गझल लिहू शकतो असं म्हणतात कारण गझलेच गणित हि तितकच अवघड. गझल हि स्वतंत्र परंतु कमीतकमी पाच म्हणजे दोन दोन ओळींच्या कवितांची एक गज़लतंत्रातील मालिका तयार होते. थोडीशी किचकट असल्याने अनेक कवी गझलच्या दिशेने भरकटत नाही. म्हणून त्या प्रत्येक कविसांठी वरील ओळ योग्य ठरते "हार मानू नको तू असा सारखा"

 

 विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात माधव ज्युलियन ह्यांच्या विशेष प्रयत्नामुळे तसेच महाराष्ट्रात ह्या मराठी मातीत गझल रुजली ते सुरेश भट साहेब ह्यांच्या मुळे. उर्दू पारशी हिंदी नंतर सर्वात जास्त गझल हि मराठीत लिहिली गेली आहे कारण सुरेश भट साहेब ह्यांनी अनेक कवींना गझलेची बाराखडी लिहून ती शिकवली रुजवली आणि वाढवली. कवींनी गझल लिहावी म्हणून अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली आणि जे चांगली गझल लिहीत आहे त्यांना एकत्र केलं त्यांना त्यांच्या ह्या काव्याला प्रोस्थान देण्यासाठी मराठी गझलांचा एक प्रातिनिधिक संग्रह १९९० मध्ये प्रकाशित केला. तोच हा संग्रह "काफला" आहे. महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेरील विखुरलेल्या निवडक ७३ कवींच्या एक किंवा दोन अश्या गझलां निवडून १२५ गझलांचा हा संग्रह सोबत गझलकारांच छायाचित्र आणि शेवटी कवींचे परिचय पत्ते देण्यात आली आहे.

 

 काफला ह्या अरबी शब्दाचा अर्थ प्रवाश्यांचा तांडा म्हणजे एक समूह. श्रीराम पचिंद्रे, श्रीकृष्ण राउत , प्रदीप निफाडकर, चक्रधर बंडू, इलाही जमादार, वसंत देशपांडे, शरद म्हात्रे , वैष्णव सुभाषचंद्र, राजा मिसर, स्वतः सुरेश भट साहेब , अविनाश कांबळे, भा चव्हाण अश्या नामवंत गझलकारांचा हा काफला आणि त्यांच्या गझला ह्या वाचनीय आहेत. रसिकांना हा संग्रह एक चांगली गझलच नाही तर एक चांगल काव्य वाचून एक मैफिल रंगवलेली भासेल.

 

प्रत्येक गाव ठेवी, माजून रावणाला

उपयोग काय सांगा, जाळून रावणाला

 

 

पुस्तक - काफला

संपादक - सुरेश भट आणि अविनाश कांबळे

प्रकाशक - कॉन्टिनेनटल प्रकाशन

पाने - १५५

किंमत - तीस रुपये

 

सचिन कृष्णा तळे

 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale