Wednesday, 9 March 2022

महाराष्ट्र साहित्य परिषद


 

आपण भाग्यवंत आहोत कारण आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला जशी संतांची परंपरा लाभली तशीच साहित्याची हि लाभली आहे. थोडक्यात काय तर जसे वाचक तसे त्यांचे लेखक अन जसे लेखक तसे त्या लेखकांची संस्था. पुणे म्हणजे विद्येचं माहेर घर अन माझ्या मते हि विद्या लेखकांच्या लेखणीतून विचारवंतांच्या विचारातून तर अखंड साहित्यातून निर्माण झालेली देवता आहे. मग ह्याच पुण्याला साहित्याचा जुना वारसा असताना पुण्यात लेखकांची, विचारवंतांची अन क्रांतिकारकांची साहित्य संस्था नाही असं होणार नाही. एकोणविसाव्या शतकाच्या उत्तराधार्थ (१८७८) न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरु केले पण काही कारणास्तव संमेलन खंडित होत होती. या खंडित संमेलनाना स्थायी संस्थेचं स्वरूप देण्याचा विचार झाला. ह्या विचारातून लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने २७ मे १९०६ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेची ज्योत पुण्यात पेटवली गेली.

 

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यालय सुरुवातीला मळेकर वाडा म्हणून ओळखल्या जाणार्या वास्तूत होते. त्यानंतर ते टिळक रोडवर स्थलांतरित करण्यात आले. इथे ‘माधवराव पटवर्धन सभागृह, एक ग्रंथालय आणि त्यातच ‘कै.वा.गो. आपटे संदर्भ ग्रंथालयआहे तसेच इमारतीच्या तळघरात खासगी संस्था पुस्तक प्रदर्शने भरवली जातात. मुंबई, विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्र हे 'मसाप'चे कार्यक्षेत्र आहे. महाराष्ट्र, गोवा, छ्त्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यात ६५ शाखा आहेत. खर सांगायचं तर अनेक मान्यवर लेखक कवी साहित्यिक ह्यांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे.

 

महाराष्ट्र साहित्य परिषद ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असून ती महामंडळाला दरवर्षी भरणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन करते व सहभागी होते. महाराष्ट्रात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशी बारा साहित्य संमेलने होतात. परिषदे मार्फत अनेक उपक्रम राबवले जातात जसे कि साहित्यिकांचे स्मृतिदिन पाळणे , सावित्रीबाई फुले अभ्यासिका चालवणे , साहित्यिकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला देणे , साहित्यिक गप्पा वर आधारित कॉफी क्लब भरवणे इ. साहित्याची योग्य दखल घेत , लेखकांचा योग्य तो सन्मान करत परिषद दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपात पुरस्कार प्रधान करत आली आहे.  शंभर हुन अधिक वर्षाचा अनुभव असलेली हि संस्था आणि त्याचा परिवार व त्याच अस्तित्व पाहता परिषदेच्या संमेलन अध्यक्षाच्या निवडीसाठी दरवर्षी वाद निर्माण होताना आपण पाहत आलो आहे. तरीही महाराष्ट्र साहित्य परिषदेची साहित्य सेवा हि अखंड नित्यनेमाने स्वकर्तृत्वावर खंबीरपणे अविरत चालू आहे.

 

सचिन कृष्णा तळे

७७०९०९९६४६

 

 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale