राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद
मनामनाला साऱ्या जनाला
जोडीत जाते माती
ना धर्माचा ना जातीचा ध्वज
बंधुतेचा हाती
स्वातंत्र, समता, बंधुता
आणि न्याय ह्या चार मूल्यांच्या संवर्धनहेतू माणसाने माणूस म्हणून जगण्याहेतू समाजात
काही ठोस पाऊले उचलणे गरजेचे होते. धर्मापलीकडे जातीपलीकडे आपण माणूस आहोत आणि माणूस
ह्या नात्याने बंधुता हि प्रत्येकाच्या मनात कोरली गेली पाहिजे. माणसाने जातीधर्माचा पिंजरा तोडून मोकळा श्वास घ्यावा
ह्यासाठी आणि हि बंधुता चळवळ घरोघरी पोहचावी ह्यासाठी प्रकाश मुरलीधर रोकडे ह्यांनी
चौदा वर्ष सेवा शिल्लक असतानाहि वयाच्या ४५ व्या वर्षी स्वेच्छने सेवानिवृत्ती घेतली.
ह्या चाळीस वर्षात आज बंधुता चळवळ हि महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात पोहचली आहे.
राष्ट्रीय बंधुता परिषद
ही ६ डिसेंबर १९८९रोजी स्थापन झालेल्या सम्यक सहकार आंदोलन या संस्थेतून निर्माण झालेली
एक साहित्यिक संस्था आहे. ‘गर्वसे कहो हम बंधू हैं’ हे या संस्थेचे
ब्रीदवाक्य असून संस्थेच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत. ह्या संस्थे मार्फत साक्षरता
अभियान, बालविकास तसेच प्रत्येक धर्माच्या व्यक्तीने आपापसात मैत्री कारण्याहेतू
"धर्ममैत्री" अभियान सुरु आहे. "मानवतेच गाव " हि व्याख्यानमाला
भरवण्यात येते." आरोग्य रक्षक घरोघरी ", " केशर माती आभाळ नाती
", " माणसाच्या दारी प्रबोधन वारी" अश्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम
संस्थे द्वारा राबवले जातात. डॉ. संगीता बर्वे ह्यांच्या अभ्यासात्मक विवेचनातून "आम्ही
सावित्र्याच्या लेकी" ह्या काव्यसंमेलनचे आयोजन केले जाते. बंधुता ह्या विषयांवर
ज्यांनी काव्य लिहिले आहे त्यांना "काव्यपंढरी" ह्या व्यासपीठावरून कविता
सादर करण्याची संधी दिली जाते. संस्थे तर्फे पुस्तक प्रकाशन, चर्चासत्र, मेळावे, शिबिरे
आणि विविध विषयांवर परिसंवाद भरवून साहित्यिकांना मार्गदर्शन करून त्यांना पुरस्काराने
सन्मानित करण्याचे कार्य हि चालू आहे.
बंधुता साहित्य परिषद संस्थेने
आजवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहित्य
संमेलन, आम्ही भारतीय साहित्य संमेलन, राजर्षी शाहू महाराज साहित्य संमेलन, कर्मवीर
भाऊराव पाटील साहित्य संमेलन, संत गाडगे महाराज साहित्य संमेलन, साने गुरुजी साहित्य
संमेलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन, तथागत भगवान गौतम बुद्ध साहित्य संमेलन,
संत साहित्य साहित्य संमेलन, स्त्री साहित्य साहित्य संमेलन, विचारवेध साहित्य संमेलन,
विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन, राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, आदी संमेलने
भरवली आहेत. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेने भरविलेली आतापर्यंतची ’बंधुता साहित्य
संमेलने’ ही बहुतेक संमेलने पुणे जिल्ह्यात भरली गेली आहे.
सचिन कृष्णा तळे

No comments:
Post a Comment