Wednesday, 26 October 2022

महाराष्ट्र फाउंडेशन

 

महाराष्ट्र फाउंडेशन




 

महाराष्ट्र फाऊंडेशन हि अमेरिकेतील मराठी माणसांची संस्था आहे. भारतीय वैचारिक नेतृत्वात मराठी विचारवंतांचा साहित्यिकांचा सिंहाचा वाटा आहे. तेराव्या शतकापासून सुरु झालेली हि संतसाहित्य परंपरा आधुनिक काळात लोकहितवादी महात्मा फुले, महर्षी शिंदे, न्यामूर्ती रानडे, टिळक, आगरकर , राजवाडे, कर्वे, आंबेडकर यासारख्या अनेक विचारवंतांनी टिकवली आहे. हीच सामाजिक प्रगतशील वैचारिक परंपरा साहित्याच्या माध्यमातून  राहावी या हेतूने १९७८ साली अमेरिकास्थित सुनील देशमुखांनी पुढाकार घेत महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेची स्थापना झाली. सर्वांसाठी सामाजिक आणि आर्थिक न्याय. म्हणजे त्यात जाती, धर्म, देश या सर्व प्रकारच्या भेदभावांच्या पलीकडे जाऊन सर्वांचं भलं होणं, सर्वांना न्याय मिळणं हे महाराष्ट्र फाउंडेशनचं ब्रीदवाक्य आणि तत्त्व आहे

 

जाती-पातींचं निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री शिक्षण आणि स्त्री सुधारणा, स्त्री-अत्याचार निर्मूलन, स्त्रियांचा सन्मान, लिंगभेद निर्मूलन, हुंडा-विरोध यांसारख्या मानवतावादी आणि उदारमतवादी चळवळींत प्रत्यक्ष काम करणारे आणि त्या त्या क्षेत्रांमध्ये लेखणी चालवणारे साहित्यिकांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्या हेतू 1993 मध्ये सुनील देशमुखांनी दोन कोटी रुपये महाराष्ट्र फाऊंडेशनला देऊन ही पुरस्कार योजना सुरू केली. मुंबईच्याकेशव गोरे स्मारक ट्रस्टने पहिली पंधरा वर्ष ही योजना राबवण्यासाठी पुढाकार घेतला अन गेली नऊ वर्षे पुण्यातील साधना ट्रस्ट या पुरस्कारांचे आयोजन करीत आहे. सुरुवातीला साधनेचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आता साधनेचे संपादक विनोद शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन केले जात आहे.

 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीनिमित्तही एक नवा पुरस्कार महाराष्ट्र फाऊंडेशनने सुरू केलेला आहे. मराठी ललित किंवा वैचारिक साहित्याच्या क्षेत्रात आपल्या आयुष्यभर कार्याने मोलाची भर घालणाऱ्या साहित्यकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याचा गौरव करण्यासाठी दोन लक्ष रुपये आणि मानचिन्ह असा महाराष्ट फाऊंडेशन गौरव पुरस्कार दिला जातो. काही साहित्यिकांचे वैशिष्ट्यपूर्ण मोलाचे असे योगदान असूनही वेगवेगळ्या कारणामुळे त्यांना पुरस्काराने गौरवण्याचे राहून जाते म्हणून २००५ पासून ३० हजार सन्मानचिन्ह अशा स्वरूपाच्या एक विशेष पुरस्काराने अनेक नवोदित साहित्यिकांना गौरवण्यात आले आहे. समकालीन मराठी साहित्याला प्रोत्साहन म्हणून सात मराठी ग्रंथाना प्रत्येकी २५ हजार अन सन्मानचिन्ह असे महाराष्ट्र फाऊंडेशन ग्रंथ पुरस्कार देण्यात येतो. एखाद्या महत्वाच्या सामाजिक समस्येवर आशयसंपन्न नाट्यकृतीस रा. . दातार नाट्य पुरस्कार देण्यात येतो. आजवरच्या प्रमुख पाहुण्यांत भीष्म साहनी, सुरेश दलाल, अमोल पालेकर, पर्यावरणवादी स्टीव्ह मिल्स, रामचंद्र गुहा ह्यांनी ह्या मंचावर हजेरी लावलेली आहे.

सचिन कृष्णा तळे

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale