Thursday, 2 February 2023

साहित्यकणा फाउंडेशन नाशिक

 साहित्यकणा फाउंडेशन नाशिक 




साहित्यकणा फाउंडेशन ही साहित्यिक व सामाजिक कार्यासाठी वाहिलेली नोदणीकृत संस्था आहे. या संस्थेची स्थापना २०१८ साली झाली. याआधी ही संस्था कुसुमाग्रज साहित्यिक मंच नावाने २०१४ पासून साहित्यिक क्षेत्रात कार्यरत होती. मात्र कुसुमाग्रजांच्या नावाने महाराष्ट्रात अनेक संस्था क्रियाशील आहे पाहून कुसुमाग्रजांची गाजलेली कविता ‘कणा’ शब्द घेऊन ‘साहित्यकणा फाउंडेशन नाशिक’नावाने वाटचाल करू लागली.   


या संस्थेची कार्यकारणी सदस्य सात असून सभासद संख्या साठ आहे. या संस्थेचे अध्यक्ष संजय द. गोराडे व सचिव विलास पंचभाई हे प्रामुख्याने काम पाहतात. गेली नऊ वर्ष या संस्थेने साहित्यिक क्षेत्रात विविध प्रयोग करत साहित्यिकांना प्रेरित केले आहे. दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. विजयकुमार मिठे, लक्ष्मण महाडिक, राज लाखे, ऐश्वर्य पाटेकर, श्रीपाद सबनीस असे अनेक दिग्गज साहित्यिक संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले आहेत. या संस्थेच्या वतीने  साहित्यिकांना विविध पुरस्काराणे सन्मानित केले आहे. सुमनताई पंचभाई स्मृती काव्यसंग्रह पुरस्कार, मीराबाई गोराडे स्मृती कथासंग्रह पुरस्कार, शीलाताई राजपूत कादंबरी पुरस्कार व राहुल पाटील स्मृती बाल वाड्मय पुरस्कार असे चार वाड्मयीन पुरस्कार साहित्य कणा तर्फे दिले जातात. तसेच समाजात उत्तम कामगिरी करणाऱ्या हातांना बळ मिळण्या खातीर त्यांची योग्य ती दखल घेत ज्ञानरत्न, साहित्यरत्न, वृत्तसेवा रत्न, विकलांग रत्न व समाजरत्न असे पाच नाशिकरत्न म्हणून पुरस्कार देखील दिले जातात. नाशिकरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव न मागवता संस्था स्वतःहून कर्तुत्वान व्यक्तींचा शोध घेऊन पुरस्कार देत असते. तसेच संस्थे मार्फत राज्यस्तरीय रजनी अनंत वाणी काव्य स्पर्धाही आयोजित केले जातात. या काव्य स्पर्धेतून अनेक दिग्गज कवी / गझलकार घडले आहेत व महाराष्ट्रात कीर्तिमान बनत प्रसिद्ध देखील झाले आहेत. 


साहित्य सोबत ही संस्था सामाजिक कामातही अग्रेसर आहे. वृक्षरोपण, पूरग्रस्तांना मदत, कोविड काळात वस्तू रूपाने मदत असे अनेक दखलपात्र कामे संस्थेने केली आहेत. नाशिकमध्ये असे विविध विधायक कामे करत संस्था कमी कालावधीत नावारूपाला येत साहित्यकणा फाउंडेशन नावाने परिचित झाली व महाराष्ट्रात स्वतःचे एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहेत. साहित्यकणा फॉउंडेशन वतीने यंदाचे वाड्मय पुरस्कार हे १२ फेब्रुवारी २०२३ रोजी नाशिक येथे  होणार असून मनीषा पाटील हरोलीकर, तन्वी अमित , प्रा. यशवंत माळी, पुष्पा चोपडे, सुनील विभुते, नीरजा याना जाहीर झाला आहे. 


सचिन कृष्णा तळे, पुणे 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale