Monday, 8 May 2023

ऑफिस च राजकारण, त्याला नाही मरण

ऑफिस राजकारण, त्याला नाही मरण


 


भारतातली बहुतांश जनता हि नोकरदार आहेत. नोकरी करून स्वतःच उदरनिर्वाह चालवतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला ऑफिस मध्ये घडणाऱ्या राजकारण ला सामोरे जावं लागत. ऑफिस पॉलिटिक्स ने फक्त विशेष एका व्यक्तीला किंवा समूहाला फायदा होतो पण या राजकारणामुळे काही चांगले कर्मचारी गमावण्याची पाळीही कंपनीवर येऊ शकते. अश्या वेळी खास करून वरिष्ठानी असल्या चालेल्या राजकारणावर जातीने लक्ष देऊन त्यावर तोडगा काढणे गरजेचे असते. अनेकवेळा आपण सत्तेवरील राजकारणावर चर्चा करतो पण ते इतकं मनावर घेत नाही जितकं ऑफिस राजकारण घेतो. तोडणं फार सोपं असतं जोडणं फार अवघड हे निसर्गाचा नियम आहे. राजकारण हे नक्कीच फायद्याचं असत पण ते राजकारण जर कंपनी हिताचं असेल तरच अन्यथा कंपनीला आर्थिक नुकसान सहन करावं लागत. सत्ता मिळवण्यासाठी सत्तेत राहण्यासाठी राजकारण खेळलं जातं. कार्यालयात तुमचे स्थान कोणतेही असो, कॉर्पोरेट राजकारण कोणीही टाळू शकत नाही. ते जीवनाचे सत्य आहे.

 

काही माणसं जाणूनबुजून ऑफिसमध्ये नकारात्मक वातावरण तयार करण्याचं कार्य करत असतात. एकतर ती स्वतःला खूप स्मार्ट समजतात किंवा त्यांनी त्या कंपनीत स्वतःच महत्व वाढवून घेतलेलं असत. अशी मानस फक्त पगार आणि पद वाढवू शकतात पण रिस्पेक्ट किंवा आदर कमावू शकत नाही. स्वतःकडे जे ज्ञान आहे ते स्वतःपाशी जपून ठेवायचं. ते इतरांना किंवा आपल्या सहकारी मित्राला सांगायचं नाही. स्वतःच वर्चस्व निर्माण करून गरज निर्माण करायची आणि कंपनीला पेचात टाकायचं. एकदा का तुम्ही अवलंबित्व निर्माण केलं कि कंपनी कडे दुसरा पर्याय नसतो. मग तुम्ही मागाल ते पगार आणि मागाल ते पद द्यावं लागत. आणि असल्या वृत्तीची लोकचं ऑफिस राजकारणाचे पिल्लर म्हणा किंवा खांब असतात जे संपूर्ण वातावरण नकारात्मक करून वादविवाद घडून आणतात. जी व्यक्ती नकारात्मक मार्गाने यश प्राप्त करते ती व्यक्ती सदैव त्याच विचारात असते. असल्या राजकारणात सगळ्यात जास्त बळी पडतात ते नवोदित तरुण. जे नव्याने कामाला रुजू झाले आहेत ते. भर तारुण्यात जिथे मेहनत, जबाबदारी, नियमितता, कामाचे नियोजन शिकायचं असत तिथे हि मुलं झटपट पगार कसे वाढवू ह्याचा विचार करू लागतात आणि नकळत बालिश राजकारण चे बळी पडून चुका करून बसतात. आळशी होतात.  लॉबीस्ट ही अशी व्यक्ती आहे जी सत्तेच्या उच्च पदांवर असलेल्या लोकांचे मन वळवण्यासाठी संघटित प्रयत्न करते. लॉबिस्टचा नेहमीच एक अजेंडा असतो. ते त्यांच्या प्रभावाचा वापर करून इतरांना त्याच्या बाजूने आकर्षित करतात.

 

कोणत्याही कंपनीत कमी-अधिक प्रमाणात राजकारण हे होतच असतं. अश्या राजकारण ला आळा घालणं अनेकदा कंपनीलाही अशक्य असतं. वेगवेगळ्या स्तरावरील कर्मचाऱ्यांकडून वेगवेगळ्या उद्देशाने काही कटकारस्थान खेळली जातात. याचा परिणाम अर्थातच कंपनीच्या उत्पादन क्षमतेवर होतो आणि उत्पादन क्षमतेवर त्याचा परिणाम झाला तर कुठेतरी त्याचे साईड इफेक्ट तुमच्यावर देखील होतात. कधीकधी कामापेक्षा जास्त मानसिक त्रास हा ऑफिस च्या राजकारणातून दिसून येतो. त्याचे पडसाद तुमच्या स्वतःच्या पर्सनल लाईफ वर होतात आणि तुम्ही थोडे अस्वस्थ होऊन नकारात्मक विचार करू लागतात.

 

कामाच्या ठिकाणी हे नक्की करा -

 

·       ·         कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठ यांच्याबरोबर सुसंवाद साधून वरिष्ठ आणि सहकाऱ्यांबद्दल आदर बाळगून त्यांचा विश्वास जपा.

·         ·       एखाद्या ग्रुपबद्दल विशेष आस्था किंवा अनास्था दाखवू नका. तुम्ही जसे वागाल, तसेच लोक वागतील, हे लक्षात ठेवा.

·       ·         एखाद्या सहकाऱ्याशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध असतील, तर काम आणि मैत्रीची गल्लत करू नका; तसंच एखाद्या सहकाऱ्याशी तुमचं अगदीच पटत नसेल, तर कामापुरता संवाद साधण्याचा प्रयत्न करा.

·        ·       कामाच्या ठिकाणी स्वतःचा तोल ढासळू देता चतुराईने वागा.

·        ·       नाकारात्कमक विचारातून सकारात्मक विचार कसा मांडता येऊ शकतो ह्याचा विचार करा.

·         ·       टीम वर्क करताना सर्वांना सामावून घेऊन एकजुटीने टीम वर्क कसं करता येईल ह्याचा विचार करा.

·         ·       एखाद्या व्यक्तीला जाणूनबुजून टार्गेट करण्यापेक्षा एक मताने टीम वर्क कसं करता येईल ते पहा.

·         ·       तुम्ही केलेल्या कामाची पूर्ण कल्पना आपल्या सहकारी मित्राला द्या.

·         ·       चार माणसं एकत्र आली, की गॉसिप हे होणारच. अशा गॉसिपपासून दूर राहा.

·         ·       संवाद थांबवू नका त्यातून गैरसमज निर्माण होतात.

·        ·       आपला सहकारी चुकत असेल तर त्याला मदत करा, उलट त्याची बदनामी करू नका.

·         ·       श्रेय लाटण्याच्या नादात सहकारी ला विसरू नका.

·         ·       तुमच्या कामाचं प्रत्येक तपशील आपल्या वरिष्ठाना द्या.

·         ·       तुम्हाला मानसिक त्रास व्हावा आणि त्यातून तुम्ही चुका कराव्या ह्यासाठी काही मानस धडपड नक्की करतात त्यांना ओळखा.


अश्या व्यक्ती पासून दूर राहा

·         सहकाऱ्याला ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्ती पासून 

·        ·       इतर सहकाऱ्यांविरुद्ध दुर्भावनापूर्ण युती तयार करणाऱ्या व्यक्ती पासून

·         ·       इतरांबद्दल गप्पा मारणे किंवा अफवा पसरविणाऱ्या व्यक्ती पासून

·         ·       महत्त्वाची माहिती जाणूनबुजून रोखून ठेवणाऱ्या व्यक्ती पासून

·        ·       क्रेडिट चोर, असे लोक आहेत जे दुसर्या व्यक्तीच्या कामाची ओळख किंवा प्रशंसा चोरतात अश्या माणसांपासून.

·         ·       डेटा किंवा संबंधित माहिती टीममध्ये लपवून ठेवणाऱ्या व्यक्ती पासून

·        ·       स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करून घेणाऱ्या लोकांपासुन.

·        ·       कॉर्पोरेट दादागिरी करून तुम्हाला धमकावणाऱ्या व्यक्ती पासून

·         ·       एक गटातून माहिती चोरून दुसऱ्या गटाला सांगणाऱ्या व्यक्तीपासून

तुमच्या वरिष्ठांना आणि सहकाऱ्यांना समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांची विचारसरणी, त्यांची संगत; तसंच कंपनीव्यतिरिक्त त्यांचे इतर व्यवहार जाणून घ्या. याचा उपयोग तुम्हाला त्यांचं व्यक्तिमत्त्व समजून घ्यायला होईल. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या नव्या सुधारणांना खुलेपणाने सामोरे जात आले पाहिजे. कारण जो नव्या सुधारणांची कास धरणार नाही, तो नव्या संकटांना आमंत्रण देतो. जेव्हा तुमचे तुमच्या सभोवतालच्या लोकांशी मजबूत, सकारात्मक संबंध असतात तेव्हा कॉर्पोरेट राजकारणाचा सामना करणे खूप सोपे असते .

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 

 

 


No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale