Wednesday, 5 May 2021

सीमाभाग आणि राजकारण

 आपल्या महाराष्ट्रात १ मे १९६० पासून २१ वेळा कॉंग्रेस चे मुख्यमंत्री हाेते , शिवसेनेचे ३, भाजपचे १ , आणि पुलाेद चे १ असे २६ मुख्यमंत्री लाभले.  १७ फेब्रुवारी, १९८० ते ८ जून, १९८० तसेच २८ सप्टेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१४ हा काळ राष्ट्रपती राजवटीचा. 


राष्ट्रपती राजवटीचा काळ साेडला तर राज्यात सर्वात जास्त सत्तेवर हाेत ते कॉंग्रेस त्यानंतर सेना. आता विषय हा आहे की सीमा भाग हा कधी निर्माण झाला आणि ह्याचा लढा केव्हा पासून सुरू आहे. बेळगावातील ७५ हून आधिक टक्के लाेक हे मराठी भाषिक आहेत आणि त्यात सर्व धर्माचे आहे फक्त हिंदू नाही. प्रत्येकांना महाराष्ट्रात यायच आहे. त्यासाठी अनेक संघटना अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि काही लाेक नेते निस्वार्थी लढा देत आहे. माझ्या परिचयाचे अनेक जण ह्या सीमा भागासाठी तळमळीने प्रयत्न करत आहेत. मला देखील हिच अपेक्षा हाेती की कॉंग्रेस च्या मुख्यमंत्री कडून शिवसेनेच्या मुख्यमंत्री कडून सीमा भाग प्रश्न सुटका नाही ताे भाजपकडून सुटेल. पण तसे झाले नाही. पण आता ह्या घडीला राज्याच्या मुख्य पदावर शिवसेना आहे. तेव्हा हा प्रश्न ते साेडवतील ही अपेक्षा. 


स्व बाळासाहेब ठाकरे हे जसे सीमा भागाच्या प्रश्नावर बाेलायचे, संभाजी नगरच्या नामांतरावर बाेलायचे अगदी तसेच विद्यमान मुख्यमंत्री श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे बाेलतील आणि मार्गी लावतील हे दिसत नाही. बेळगावात जी निवडणूक झाली त्यात तरून मराठी उमेदवार ज्याला हार पत्करावी लागली त्यांचा मुळ हेतू हा बेळगावात भगवा फडकवणे नी मराठी भाषेला प्राधान्य देणे हे हाेते. पण काही जण असे चित्र रंगवतायत की बेळगावात फक्त १०० हिंदू हाेते आणि बंगाल मधे जी हिंदूची हत्या हाेतीय  तसेच आघाेरी प्रकार बेळगावात घडताेय. 


मित्रानाे .. प्रांत वाद, जातीवाद, भाषा वाद , धर्म वाद ह्यावर भाषणे देउन सत्तेत राहणार्या त्या प्रत्येक राजकीय पक्षापासून नेत्यांपासून जाे पर्यंत आपण लांब जात नाही ताेपर्यंत आपण असेच राहू.. एकमेकांशी भांडू.. एकमेकांचे रक्त सांडू.. शिव्या घालू आणि दुरावा निर्माण करू... 


जय महाराष्ट्र..!! 


#आहेतेआहे 

सचिन तळे

Monday, 26 April 2021

तुम्हाला काय मिळाले?

 तुम्हाला काय मिळाले.. ? 


राजकीय पुढार् यांना सत्ता मिळाली 

त्यांच्या मुलांना पद मान सन्मान मिळाले

सत्तेत असणार्याना फुल पगार मिळाला 

माजी आजी सगळ्यांना हप्ते मिळाले

प्रसिद्धी मिळाली 

खुर्ची मिळाली 

काेणाला आर्ची सुध्दा मिळाली 

कमवण्याची भ्रष्टाचाराची एक संधी मिळाली

भाषणे ठाेकण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी मिळाली

काहींना पुरावे

तर काहींना कराेनाची संधी मिळाली


तर 


काहींना स्मशानातही गर्दी मिळाली 

काहींना हॉस्पिटल चे भले मोठे बील मिळाले 

काहींना आत्महत्या 

तर काहींना ऑक्सिजन मुळे मृत्यू मिळाले 

काहींनी रस्त्यावर जीव साोडला 

काहींनी बस स्थानका बाहेर 

काहींचा बेड शाेधता शाेधता 

तर काहींचा औषधाच्या काळाबाजारात जीव गेला 

काहींना रिपोर्ट उशीरा मिळाला 

काहींना मानसिक त्रास मिळाला 

काहींना अर्धा पगार मिळाला 

काहींची नाेकरी गेली 

काहींचे उद्याेग बंद पडले 

काहींचे वाचन लिखान बंद पडले

तर काहींना २४ तास ड्युट्या लागल्या 

काहींना घरात बसावे लागले 

काहींना एकांतात हसावे लागले 

काहींचे सारा परिवार उध्वस्त झाले

काहींना शहर साेडाव लागल

घर दार साेडाव लागल

माणसे दूरावली ना भेटी ना गाठी 

ना सण ना जल्लोष 


ह्या सगळ्यात तुम्हाला काय मिळाले 

तुम्ही काय गमावले 

विचार करा.. 

तुम्हाला काय मिळाले? 


सचिन तळे

#आहेतेआहे

Monday, 1 March 2021

कविता

 काही कवींच्या कविता त्यांचा काव्यसंग्रह हा वाचताना ताे वारंवार वाचावा अस वाटतं. तर काहींच्या कविता वाचता वाचता ताे काव्यसंग्रह बाजूला ठेवून द्यावासा वाटताे. 


कारण एक वाचक म्हणून रसिक म्हणून मला जे हव तेच मिळाले नाही तर ते वाचून त्यावर वारंवार समजून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वेळ वाया घालवणे. 


कविता मग ती काेणत्याही छंदात असाे काेणत्याही वृत्तात असाे  लेखकाला जे सांगायचे आहे ते कमी शब्दात ताे मांडताे आणि नेमके त्यातूनच वाचणाचा आनंद मिळत जाताे


वाचता वाचता एक चित्र उभे राहते. जिभेवर " वाह " शब्द विरघळताे.. आणि हृदयात समाधानाची ..प्रेमाची ..विरहाची.. आपल्या पणाची.. दूखाची .. एखाद्या घटनेची भावना निर्माण हाेते . 


हाेय.. मी त्याच कविता वाचताे ज्या कवितेत कवीची समाधी लागली आहे आणि ती कविता संपली कि दुसर्या कवितेत ताेच कवी पुन्हा जन्म घेताे माझ्यासाठी. 


#आहेतेआहे

सचिन कृष्णा तळे

Thursday, 28 January 2021

सावधान हिंदुस्थान

 पाक बंगाल ते हिंदुकुश पर्वतरांगा पर्यंत आपला भारत हा अखंड भारत व्हावा ह्याची स्वप्ने पाहत देव देश धर्मासाठी कार्य करणारी धडपडणारी तरूण मंडळी. विवेकानंदांचे आदर्श डाेळ्यासमाेर ठेवून भारत हा विश्व विजयी व्हावा विश्व गुरू व्हावा ह्याची स्वप्ने पाहणारा तरूण एकिकडे... 


तर 


काश्मीर, पश्चिम बंगाल, हैद्राबाद, पाकव्याप्त ,चीन व्याप्त प्रदेश भारतापासून अलग करू पाहणारी . भारतीय झेंड्याचा अपमान करत भारताचे तुकडे करू पाहणारे तरूण जे धर्मावरून जातीवरून समाजात क्लेश निर्माण करून स्वतः चे करियर घडवणारे काही तरूण दुसरीकडे... 


तर 


राेजच्या जीवनातून मिळेल त्या पगारावर काम करत कष्ट करत संसार संभाळत समाजात बदल घडवत सामाजिक कार्य करणारे तरूण...


नक्की ह्या देशाचे भविष्य काेणाच्या हातात आहे ह्याचा विचार झालाच पाहिजे तरच हा देश सुजलम सुफलाम् हाेईल अन्यथा सावधान हिदूस्थान..!! 


जय हिंद 

सचिन तळे

Tuesday, 12 January 2021

१२ जानेवारी दिन विशेष

 विवेकानंद आणि माँ साहेब जिजाऊ ह्यांची देशभक्ती धर्माप्रती कट्टरता जेव्हा आपण आपल्यात सामावून घेऊ त्याला आचरणात आणू तेव्हा ह्या देशाची सीमा आणि देशातील तरूण सुरक्षित राहतील.. एक हाेतील. 


 विवेकानंद हे तारूण्याचे प्रतिक आहे युवकांचे आदर्श ज्यांनी सातासमुद्रापार जाउन देश धर्म अन आपल्या संस्कृतीची ध्वजा फडकवली. उच्च शिक्षण घेउन विदेशात जाउन विदेशाचे गाेडवे गाणारे युवक नकाे तर ह्या देशात राहून देशाची गाेष्ट अभिमानाने जगासमोर मांडणारी युवा ह्या देशाला हवेत हिच ईच्छा विवेकानंदांची हाेती. 


माँ साहेब जिजाऊ नी जसे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवल . संभाजी महाराजांवर संस्कार केले अगदी तसेच संस्कार आपल्या देशातल्या प्रत्येक मुलांमध्ये असावे. जेणे करून देशात स्वराज्य संस्कार अखंड राहील. 


त्यामुळे भले आपण दिवस पाहून त्यांच्या आठवणीला त्यांच्या कार्याला सलामी देउ साजरी करू पण जाेपर्यंत आपण आपल्या घरात आई जिजाऊ आणि प्रत्येक मुलात विवेकानंद घडवत नाही ताे पर्यंत आपल्याला त्यांच्या कार्याची खरी ओळख हाेणार नाही. ताे पर्यंत आपल्याला आपला देश कळणार नाही आपला धर्म कळणार नाही आपली माणस कळणार नाही. 


जेव्हा विवेकांनद घडतील तेव्हा युवकांचे धर्मांतर हाेणार नाही.. आणि जेव्हा जिजाऊ घडेल तेव्हा देशाचे देशांतर हाेणार नाही.. 


जय हिंद 


सचिन तळे

Thursday, 10 December 2020

कविते शब्दात ये...

 हातात लेखणी घेऊन

तूला लिहण्याचा 

खुप प्रयत्न करताेय

पण 

ह्या दूषित वातावरणात

तू मला दिसेना ... 

तू  मला कुठेच दिसेनाशी झालीय 

तूझ्या मूळे माझ्यातला कवी 

तुझ्यामुळे माझी लेखणी

एकांती पडलीय

हे कविते 

शब्दात ये ...!! 


- सचिन तळे 🙏🙏




Saturday, 26 September 2020

नशेची दुनिया

 नशेची दुनिया....!! 


दिवसभर ड्रग्ज आणि चित्रपट सृष्टीतल्या चरसी लाेकांच्याच बातम्या. राज्यात ह्यापेक्षा दूसरा विषयच नाही. राज्यात असेलेले सर्व विषय आता संपले. सर्व लाेक सुखी आहेत. सगळीकडे आनंद आहेत... म्हणून तर फक्त एकच पाढा सतत वृत्तवाहिनी वर गिरवला जाताेय. हे असेच चालू राहिल तर कालांतराने देशात राष्ट्रीय ड्रग्ज दिवस साजरा करताना दिसतील तरूण मंडळी. आणि त्यावर बंदी आणली की लाेकशाही लाेकतंत्रांच्या मंत्रा खाली आझादी मागत उर बडवतील. सगळे नशेत आहेत. 


आणि हाे आपल्या लाेकशाहीत आता पत्रकार हि लेखणी साेडून शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरलीत एकमेकांना मारू लागलीत.. अजून काय पाहायच राहिलय. आरे हि सुध्दा एक नशा आहे. 


काही सत्ताधारी वर्गाला सत्तेची नशा .. तर काहीना पैश्याची नशा.. तर काहींना प्रसिद्धी ची नशा.. त्यासाठी वाटेल ते वाटेल तसे घडवून आणल जात. आणि हि नशा देशाला तुम्हाला आपल्याला घातक आहे. 


सचिन कृष्णा तळे

#आहेतेआहे

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale