विवेकानंद आणि माँ साहेब जिजाऊ ह्यांची देशभक्ती धर्माप्रती कट्टरता जेव्हा आपण आपल्यात सामावून घेऊ त्याला आचरणात आणू तेव्हा ह्या देशाची सीमा आणि देशातील तरूण सुरक्षित राहतील.. एक हाेतील.
विवेकानंद हे तारूण्याचे प्रतिक आहे युवकांचे आदर्श ज्यांनी सातासमुद्रापार जाउन देश धर्म अन आपल्या संस्कृतीची ध्वजा फडकवली. उच्च शिक्षण घेउन विदेशात जाउन विदेशाचे गाेडवे गाणारे युवक नकाे तर ह्या देशात राहून देशाची गाेष्ट अभिमानाने जगासमोर मांडणारी युवा ह्या देशाला हवेत हिच ईच्छा विवेकानंदांची हाेती.
माँ साहेब जिजाऊ नी जसे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवल . संभाजी महाराजांवर संस्कार केले अगदी तसेच संस्कार आपल्या देशातल्या प्रत्येक मुलांमध्ये असावे. जेणे करून देशात स्वराज्य संस्कार अखंड राहील.
त्यामुळे भले आपण दिवस पाहून त्यांच्या आठवणीला त्यांच्या कार्याला सलामी देउ साजरी करू पण जाेपर्यंत आपण आपल्या घरात आई जिजाऊ आणि प्रत्येक मुलात विवेकानंद घडवत नाही ताे पर्यंत आपल्याला त्यांच्या कार्याची खरी ओळख हाेणार नाही. ताे पर्यंत आपल्याला आपला देश कळणार नाही आपला धर्म कळणार नाही आपली माणस कळणार नाही.
जेव्हा विवेकांनद घडतील तेव्हा युवकांचे धर्मांतर हाेणार नाही.. आणि जेव्हा जिजाऊ घडेल तेव्हा देशाचे देशांतर हाेणार नाही..
जय हिंद
सचिन तळे
No comments:
Post a Comment