Wednesday, 29 June 2022

वारकरी साहित्य परिषद

 



अभंग हे वारकरी संप्रदायाचे मुख्य साहित्य आहे. भजन हे वारकऱ्यांचे मुख्य उपासना साधन. ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेचे फक्त भाषांतर नसून मराठीत केलेले भाष्य आहे. अद्वैतवाद, द्वैतवाद अन्य तत्वज्ञाना हून ज्ञानदेवांनी चिद्विलासवाद स्वतंत्र तत्वज्ञान मांडले यालाच अनुभवामृत अथवा अमृतानुभव असे म्हणतात. एकनाथी भागवत हा उद्धवाला केलेला उपदेश. रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, चांगदेव पासष्टी . हे सर्व वारकरी साहित्याची खरी ओळख आहे.

 

महाराष्ट्र संस्कृतीचे जतन संवर्धन करण्यामध्ये वारकरी संप्रदायाचे फार मोठे योगदान आहे. भक्ती बरोबरच सुधारणावादी दृष्टिकोन समोर ठेवून वाटचाल करणारा हा संप्रदाय बुद्धिनिष्ठ विज्ञाननिष्ठ आहे. वारकरी चळवळीतील संताच्या विचारांचा वसा वारसा जतन करून या संत साहित्याचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य वारकरी मंडळीनी एकत्र येऊन करण्याचे योजिले या विचाराने प्रेरित होऊन सन १९११ साली वारकरी साहित्य परिषद ही संस्था स्थापन झाली.

 

वारकरी साहित्य परिषद तर्फे महाराष्ट्रात आजवर आठ च्या आसपास अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन भरवण्यात आले. या संमेलनामध्ये राज्यातील संप्रदायाचे अभ्यासक, दिंडीकरी, कीर्तनकार प्रवचनकार यांचा मोठा सहभाग असे. तसेच ह्या संमेलनात वारकरी मंडळी साठी अन साहित्य निर्माण करणाऱ्या संस्थेसाठी , लेखकांसाठी खास चर्चासत्रे, भजन, भारूड, कीर्तन . कार्यक्रम होत असतात. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात सांस्कृतिक महोत्सव घेण्यात आले. संत चोखोबा ह्यांचा समाज बांधवानी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे संत चोखोबांच्या अभंगांचे पारायण कोणीही करत नव्हते. अशा परिस्थितीत वारकरी साहित्य परिषदेने संत चोखोबांच्या अभंग गाथा पारायणास मंगळवेढा जि.सोलापूर येथे सन २०१३मध्ये थाटामाटाने सुरुवात केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान आव्हानाला प्रतिसाद देऊन श्रीक्षेत्र पंढरपूर येथेझाडू संताचे मार्गया उपक्रमाद्वारे सन २०१५ पासून वारकरी परिषद स्वच्छता अभियान राबवीत आहे. जानेवारी २०१६मध्ये ग्रंथ ज्ञानेश्वरीला ७२५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मराठवाडयातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातुन वारकरी साहित्य परिषदने मराठवाडयातील जिल्ह्यातील ७६ तालुक्यामध्येज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढण्यात आली. नोव्हेंबर २०१८ मध्ये मुंबईतील विधान भवनात स्वच्छतेचा महाजागर या विषयी सर्व वारकऱ्यासोबत भव्य कार्यक्रम घेण्यात आले. संतसाहित्यातील विचार जनमानसात, शाळा-महाविद्यालयांमध्ये पोहचावा यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून संपूर्ण महाराष्ट्र दौरा करून अनेक उपक्रम राबविले जात आहेत.

 

सचिन कृष्णा तळे

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale