अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करत. आत्मसंयमनाचे विचार ग्रामगीता या काव्यातून मांडून तुकडोजी महाराजांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली. तुकडोजी महाराजांनी इ.स. १९३५मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.
तुकडोजी महाराज यांच्या नावाने तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात. ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.
देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. त्यांच्या ह्या अश्याच क्रांतिकारी विचारणा घराघरात पोहचवण्यासाठी तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन भरवण्यात येते. वर्धा , मध्यप्रदेशातील सौंसर , छिंदवाडा , राळेगाव भंडारा, अकोला, बुलढाणा ,यवतमाळ सारख्या अनेक ठिकाणी हि संमेलने झालीत. भंडारा येथील संमेलनाध्यक्ष म्हणून कविवर्य प्रा. फ. मु. शिंदे होते. २४ एप्रिल २०११ रोजी छिंदवाडा येथील संमेलनाध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे होते.२४-२५ नोव्हेंबर २०१७ या काळात ध्यक्षस्थानी ज्येष्ठ राष्ट्रीय ग्रामगीता प्रचारक सत्यपाल महाराज चिंचोळकर होते. तर वर्धा येथील संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जुल्फी शेख होत्या.
सचिन कृष्णा तळे

No comments:
Post a Comment