छत्रपती
संभाजी महाराज साहित्य संमेलन
अफाट
मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे आपले छत्रपती संभाजी महाराज हे उत्तम साहित्यिक
आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ
लिहिला. तर 'नायिकाभेद', 'नखशीख' आणि 'सातसतक' हे ब्रज भाषेतले
ग्रंथ लिहिले. खास करून लेखक साहित्यिक अन कवी मनाचा
ते आदर अन राजदरबारी सत्कार
करत असे. इतिहासात त्याची नोंद देखील आहे. महाराज अनेक भाषांत विद्याविशारद होते. छत्रपती संभाजी राजांनी शंभूराज, नृपशंभू,शंभूवर्मन या नावानी साहित्य
निर्मिती केली . त्यांना अनेक भाषा बोलता आणि लिहिताही येत होत्या. श्रुंगारपुरच्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी महाराणी छ.येसुबाईसाहेब यांच्या
प्रेरणेने 'नखशिखा' हा ग्रंथ लिहिला.
साहित्यावर
प्रेम करणाऱ्या अश्या महान राजाच्या नावे मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रात व्हावे ह्याच प्रेरणेने अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व जगद्गुरू
संत तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने २००८ सालापासून छत्रपती संभाजी महाराज साहित्य
संमेलन पुरंदर तालुक्यातील कऱ्हा नदीच्या काठावरील सासवड येथे भरवण्यात येते. छत्रपती
संभाजी महाराज नावाने सुरू झालेले हे महाराष्ट्रातील एकुलते एक संमेलन आहे.
१३ मार्च
ते १४मार्च २०१० या तारखांना झालेल्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर ताकवले
होते. छत्रपती संभाजी राजांच्या बुधभूषण या ग्रंथाचा त्यांनी मराठी अनुवाद केले आहे.
चौथे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन १२मार्च २०१३ रोजी सासवडला झाले. प्रा.
गंगाधर बनबरे हे दुसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. इतिहास संशोधक अनंत दारवटकर हे तिसऱ्या तर ७वे राज्यस्तरीय
छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन नारायणपूर (ता. पुरंदर) येथे १२ मार्च २०१६ रोजी
झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार श्रीराम पचिन्द्रे होते.उदघाटक महादेव
जानकर होते. पुरंदर किल्ल्यावर झालेल्या ८ वे राज्य स्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य
संमेलनाचे अध्यक्ष इतिहास संशोधक प्रा. नामदेवराव जाधव होते. व्यंकोजी राजे (तंजावर)
तमिळनाडू यांचे तेरावे वंशज युवराज छ्त्रपती संभाजीराजे भोसले यांनी १२ मार्च रोजी
सासवड येथे संमेलनाच उदघाटन केले.
छत्रपती संभाजी
महाराज समाज पुरस्कार , युवा भूषण पुरस्कार , नृत्यांगना पुरस्कार, सामाजिक युवा गौरव,
शिक्षण रत्न अश्या अनेक पुरस्कारांनी साहित्यिकांचा ह्या मंचावर गौरव अन सन्मानित
करण्यात येते. संमेलनाची संकल्पना पत्रकार व कवी दशरथ यादव यांची असून, मराठा सेवा
संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे या संभाजी साहित्य संमेलनासाठीचे मार्गदर्शक
आहेत.
सचिन कृष्णा
तळे

No comments:
Post a Comment