Thursday, 20 October 2022

भारतीय ज्ञानपीठ

 

भारतीय ज्ञानपीठ

 

प्रसिद्ध उद्योगपती स्वर्गीय साहू शांतिप्रसाद जैन यांनी १८ फेब्रुवारी १९४४ रोजी वाराणसी येथे स्थापन केलेली आणि भारतीय साहित्य-संस्कृतीच्या अभिवृद्धयर्थ कार्य करणारी भारतीय ज्ञानपीठ हि प्रख्यात संस्था आहे. दुर्मिळ प्राचीन भारतीय ग्रंथांचे संशोधन, संपादन प्रकाशन करणे तसेच सद्यकालीन भारतीय भाषांतील मौलिक सार्वजनिक वाङ्मयास लोकोदयासाठी उत्तेजन देणे ह्या हेतूने भारतीय ज्ञानपीठाची स्थापना केली गेली. वाराणसी येथे १९४४ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या अधिवेशनानिमित्त अनेक विद्वान एकत्र जमले अन खऱ्या अर्थाने त्याचवेळी भारतीय ज्ञानपीठ चा प्रवास चालू झाला.

 

ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यजगतात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. भारताचा कोणताही नागरिक भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. ज्ञानपीठ पुरस्कारात 'पुरस्कार-पत्र', 'वाग्देवीची प्रतिमा' आणि 'अकरा लाख रुपयांचा धनादेश' यांचा समावेश असतो. ज्ञानपीठ पुरस्कारात दिली जाणारी वाग्देवीची प्रतिमा ही माळवा प्रांतातील धार येथील सरस्वती मंदिरातील एका मूर्तीची प्रतिकृती आहे. या सरस्वती मंदिराची निर्मिती राजा भोज याने .. १३०५ मध्ये केली होती. वाग्देवीची ही मूर्ती सध्या लंडन येथील ब्रिटिश म्युझियममध्ये आहे.

 

भारतीय ज्ञानपीठाने आजवर सुमारे सहाशे ग्रंथ प्रसिद्ध केले असून ते संस्कृत, प्राकृत, पाली, अपभ्रंश, हिंदी, तमिळ, कन्नड, उर्दू, इग्रंजी . भाषांत आहेत. संस्थे तर्फे दहा हजार छायाचित्रे जमविण्यात आलेली असून ती शास्त्रशुद्ध रीतीने संगृहीत केली आहेत. आजवर विविध भारतीय भाषांतील २० प्रतिभासंपन्न लेखकांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे.भारतीय ज्ञानपीठाचे ज्ञानोदय हे प्रसिद्ध हिंदी मासिकपत्र असून त्यातून नवोदित होतकरू भारतीय लेखकांचे लेखन प्रसिद्ध केले जाते. ज्ञानपीठ पत्रिका हे संस्थेचे दुसरे मासिक असून त्यातून विविध भारतीय भाषांतील विद्वान लेखकांचे दर्जेदार लेखन प्रसिद्ध होते

 

पुरस्कार समारंभानिमित्त कवितावाचन, कविसंमेलन, नृत्य, संगीत यांसारखा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही राबवले जातात. मराठी भाषेला आजवर चार ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहे.  १९७४ साली विष्णू सखाराम खांडेकर यांच्या ययाति ह्या पुस्तका बद्दल तर १९८७ साली विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज याना विशाखा ह्या काव्यसंग्रह बद्दल पुरस्कार मिळाला आहे. २००३ मध्ये विंदा करंदीकर याना युरोपीय एक भारतीय तत्वज्ञ त्यांच्या तत्वज्ञानाचे ओवीरूपात वर्णन केलेल्या अष्टदर्शने ह्या पुस्तक बद्दल ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले होते . २०१४ मध्ये भालचंद्र वनाजी नेमाडे याना हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ ह्या पुस्तकाला भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.

 

सचिन कृष्णा तळे

 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale