Sunday, 12 February 2023

समरसता साहित्य परिषद

 


समाजाची प्रकृती ठणठणीत राहण्यासाठी साहित्यिकांनी त्यांच्या लेखणीतून सामान्य माणसाची अपेक्षा मांडणे गरजेचे आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांच्या अध्यक्षतेखाली १९९८ साली झालेल्यासमरसता साहित्य मंचाच्या जळगाव येथील साहित्य संमेलनात डॉ. यादव यांनीसमरसताहे सामाजिक मूल्य आहे, हा मुद्दा मांडला आणिसमरसता साहित्य परिषदेची स्थापना झाली. ‘सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिकहे समरसता साहित्य परिषदेचे ब्रीदवाक्य आहे. समरसता साहित्य परिषद या संस्थेची महाराष्ट्र शाखा ही महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात समरसता साहित्य संमेलन भरवते. मुंबईत या संस्थेचे ’ सामाजिक समरसता प्रकाशनआहे, त्याद्वारे समरसता विषयक पुस्तके प्रकाशित केली जातात.

 

समरसता साहित्य परिषदेने आजवर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तीन दिवसांची समरसता साहित्य संमेलने भरवली आहेत. त्याशिवाय कविसंमेलने, परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा, तसेच विद्यार्थी केंद्रबिंदू धरून त्यांच्या साहित्यिक जाणिवांना हळुवार साद घातली आणि बघता बघता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळू लागला.  विद्यार्थ्यांच्यातील सुप्त साहित्यिक गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्थाकवितेकडून कवितेकडेहा उपक्रम चालवते. कवितेच्या स्पर्धा ठिकठिकाणी होतातच पण २०१४ सालापासून काव्य सादरीकरणाच्या सांघिक स्पर्धा होऊ लागल्या आहेत.

 

समरसतेचा भाव जागविल्याशिवाय समाजात खरीसमतायेऊ शकत नाही. ‘समतायुक्त समाजनिर्मितीसाठीसमरसताही पूर्वअट आहे. अशा समतायुक्त समाजनिर्मितीत साहित्यिकांचे योगदान म्हणूनच अत्यंत महत्त्वाचे ठरते. समाजाचे जीवंत, चैतन्ययुक्त, रसरशीत चित्रण साहित्यात येत असते. ही खरी साहित्यिक समरसता. हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवूनससापपिंपरी-चिंचवडची आजवरची वाटचाल झाली आहे. संस्थे मार्फत समरसता: एक साहित्य मूल्य; संपादक श्याम अत्रे रमेश पतंगे. लोकसंस्कृती समरसता, स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्य समरसता, अनुवादित साहित्य आणि समरसता, स्त्री साहित्य आणि समरसता, युवा साहित्य आणि समरसता अशी पुस्तके प्रकाशित केली गेली आहेत. साहित्यिकांचे साहित्य सर्वदूर पसरावे तसेच त्याला ओळख मिळावी, या प्रेरणेने सुरू केलेलासाहित्यसंवादहा संस्थेचा आणखी एक दर्जेदार उपक्रम आहे. सर्व साहित्याचे सादरीकरण, अभिवाचन, भाष्य, मुलाखत या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा प्रयत्न चालू आहे. ‘ससापपिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष कैलास भैरट, उपाध्यक्ष सुहास घुमरे कार्यवाह मानसी चिटणीस तर पद्मश्री गिरीश प्रभुणे हे शाखेचे मार्गदर्शकआहेत. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी बारावे विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन झाले त्याचे अध्यक्षस्थानी प्रकाशक घनश्याम पाटील होते. या साहित्य संमेलनांना आजवरभारतीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या माजी अध्यक्षा अपर्णा मोहिले, ज्येष्ठ साहित्यिका प्र. डॉ. श्यामाताई घोणसे, डॉ. संजीवनीताई तोफखाने, ज्येष्ठ लेखिका विनीताताई ऐनापुरे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कोकिळ, मनोहर सोनावणे, रमेश पतंगे सर, ज्येष्ठ व्याख्याते नायडू सर, राजेंद्रजी घावटे, बाळकृष्ण कवठेकर असे दिग्गज अध्यक्ष म्हणून मिळाले आहेत..

 सचिन कृष्णा तळे 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale