Monday, 27 February 2023

अभिव्यक्ती - वैदर्भीय लेखिका संस्था – नागपूर

 

अभिव्यक्ती - वैदर्भीय लेखिका संस्था – नागपूर




पुरुषांच्या व्यासपीठावरून किंवा साहित्य संमेलनातून स्त्री साहित्यिक खूप कमी प्रमाणात सहभाग नोंदवायच्या, थोड्या स्रियांनाच या साहित्य व्यासपीठावर संधी मिळायची. साहित्य क्षेत्रात स्त्रियांनी पुढे यायला हवं असेल तर त्यांचा इतका थोडा सहभाग असून चालणार नाही. १९७६ मध्ये एक "लेखिका साहित्य संमेलन" प्रा. राम शेवाळकर यांनी भरवले होते. विदर्भात इतक्या मोठ्या प्रमाणात लेखिका आहेत, त्यांच्या हक्काची एक संस्था असायला हवी, या उदात्त संकल्पनेतून स्त्रियांची अशी एक संस्था असावी कि ज्यात सारं काही स्त्रियांचं करतील या विचारांवर ही संस्था १९७६ साली स्थापन केली.

अभिव्यक्ती ही विदर्भातील एक अतिशय सजग आणि अग्रगणी लेखिका संस्था आहे. नव्या दमाच्या तरुण उत्साही, नवविचारांच्या व धडाडीने काहीतरी नवे संकल्प करणाऱ्या, अभिव्यक्तींसाठी तळमळीने झपाटून काम करणाऱ्या स्त्रियांची दमदार साथ या संस्थेला लाभली. त्यामुळे अभिव्यक्ती नेहमीच राज्यात उत्तमोत्तम, दर्जेदार, नवनवीन कार्यक्रम, उपक्रम राबवित आहे. सर्वाना सामान संधी, सर्वाना व्यासपीठ मिळून देणे या मूळ उद्देशावर संस्थेची वाटचालू सुरु आहे. अभिव्यक्ती हे नागपूर व विदर्भातील लेखिका व कवयत्री यांच्या हक्काचे स्वतंत्र व्यासपीठ आहे. गेली ४५ वर्ष शेकडो स्त्रियांना रसिकांच्या समोर आणण्याचे चांगले कार्य संस्थे द्वारे चालू आहे. फक्त नागपूरचं नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून या संस्थे द्वारे होणाऱ्या साहित्य संमेलनात अनेक लेखिका सहभागी होतात. साहित्यिक महिलांची, महिलांकरिता असलेली व महिलांनीच चालवलेली संस्था म्हणजेच अभिव्यक्ती - वैदर्भीय लेखिका संस्था होय.

अभिव्यक्ती संस्थेचा वर्धापन दिन दरवर्षी मार्च महिन्यात द्वि दिवसीय मान्यवरांच्या उपस्तिथीत साजरा केला जातो. त्यात काव्य वाचन, कथा-कथन, पुस्तक प्रकाशन, नामवंत व्यक्तींची भाषणे आधी कार्यक्रमाचा समावेश आहे. सन २०१४ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या "ग्रंथोस्तव" हा कार्यक्रमांर्गत परिसंवाद हा विशेष कार्यक्रम संस्थेद्वारा आयोजित करण्यात आला होता. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा जन्मदिनी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. अभिव्यक्ती हि संस्था विविधांगी असे दर्जेदार साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करून रसिक प्रेक्षकांची दाद मिळवीत नवोदित लेखिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या लिखाणास चालना देण्याचं महत्वपूर्ण कार्य करत आहे.

अनेक दर्जेदार, सकस कार्यक्रम अभिव्यक्तीच्या माध्यमातून साजरे होऊ लागले तेव्हा आपल्या लेखिकांचा सन्मान व्हावा त्यांना पुरस्कृत करावे यासाठी कृष्णाताई मोठे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी उत्कृष्ट कादंबरी साठी पुरस्कार दिला जातो. तसेच साहित्यातील योगदानासाठी राधाबाई बोबडे पुरस्कार, कथा, काव्य पुरस्कार आहेत. साहित्य मागवून एक स्पर्धा आयोजित करून मान्यवर व्यक्तींच्या परीक्षणातून हे पुरस्कार वितरित करण्यात येते. अभिव्यक्ती परिवारातील आणि परिवारबाहेरील लेखिकांच्या पुस्तकांची एक समृद्ध ग्रंथालय उभारण्याचा मानस संस्थेचा आहे. विदर्भातील सर्व शहरांमध्ये शाखा उघडण्याची योजना आहे. अभिव्यक्ती हि काही नागपूर शहरापुरती सीमित नाही. रामटेक, कोराडी, वर्धा इथे तर सदस्य आहेतच पण वैदर्भीय पुणे ते हैदराबाद शहरात देखील विखुरलेली आहे.

सचिन कृष्णा तळे

 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale