Friday, 21 June 2024

सिंहगड किल्ला पर्यटन स्थळ नसून शौर्याचे प्रतीक आहे ! त्याचे पावित्र्य राख !

 

सिंहगड किल्ला पर्यटन स्थळ नसून शौर्याचे प्रतीक आहे ! त्याचे पावित्र्य राख !

 

" छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गड किल्ले म्हणजे शिवमंदिरचं ! श्रावणाच्या सरीत या किल्ल्यांचा अभिषेक चालू असतांना आपण तिथे श्रद्धेने जाणे अपेक्षित असताना त्या ठिकाणी आपण काय करतो याच भान आजच्या तरुणांना राहिला नाही हे लाजिरवाणी बाब आहे."

 


पावसाळा लागला कि आपले पाय छान अश्या निसर्गमय वास्तू किंवा ठिकाणांकडे वळतात. पावसाळ्याची खरी जादू म्हणजे सर्वत्र पसरलेली हिरवीगार झालर. मनाला प्रसन्न करणारं वातावरण. अश्यावेळी पुण्यात आलेल्या प्रत्येकाचे पाऊल पश्चिम घाटावर असलेल्या शिवकालीन इतिहासाने नटलेल्या शौर्याने गाजलेल्या सिंहगडाकडे वळतात. राजगड, रायगड, शिवनेरी अन त्यांच्या भोवती असणारे लहान मोठे गड किल्ले राजवाडे आपल्याला आकर्षित करतात. या ठिकाणांना आवर्जून भेट दिली पाहिजे. पण लपून छापून प्रेम करण्यासाठी नाही, पर्यटन म्हणून नाही, पिकनिक म्हणून तर मुळीच नाही तर शौर्याचं प्रतीक म्हणून अन इतिहासातील पानांना वाचण्यासाठी या स्थळांना भेट देणे गरजेचं आहे.

 

जून जुलै महिना उजाडला कि तरुणांना पावसाळ्याची भुरळ पडते. प्लान तयार होतात अन मुलं मुली थेट पोहचतात आपल्या गड किल्ल्यांवर. या किल्ल्यांची सुंदरता खरी पावसाळ्यातच दिसून येते. गडाच्या प्रवेशद्वारा कडे जाणाऱ्या पायऱ्या धुक्यानी तुमचे स्वागत करतात. किल्ल्यांवर मिळणारी कांद्याची भजी अन पिठलं भाकर साठी गर्दी. अन जिथे वरदळ नाही तिथे प्रेम युगलांची जोडी. अश्लील चाळे करणारे काही मंडळी. काही प्रमाणात जिवंत राहिलेले अवशेष अन गर्दीच गर्दी. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून शोधणारे नजरा. प्रत्येकाच्या हातात सेल्फी स्टिक अन कॅमेराचे अँगल. अन प्लास्टिक च्या बॉटेल चा ढिगारा. बस इतकंच हवं बाकी काही नको. असो ...

 

ऐतिहासिक स्थळे अन स्मारके हे येणाऱ्या प्रत्येक पिढीला संदेश देण्याचे काम अविरतपणे करत असतात. हि स्थळे देशासाठी अनमोल ठेवा असतो. आपल्याला मौजमजा मस्ती अन सेल्फी काढण्यासाठी या किल्ल्यांची निर्मीती झाली नाही. तर प्रत्येक गड किल्ल्यांची एक वेगळीच गोष्ट आहे. फक्त पाठ्यपुस्तके अन तानाजी या चित्रपाठातून सिंहगडाचा इतिहास पाहता तो थेट सिंहगडावर जाऊन पाहावा अन तिथे त्या भूमीला त्या मातीला मस्तकी लावून त्याठिकाणी नतमस्तक व्हाव. येणाऱ्या पिढीला त्या जागेचा इतिहास सांगावा. त्यांना इतिहासाची ओढ निर्माण झाली पाहिजे अश्याप्रकारे त्यांना गडाची माहिती करून द्यावी. गर्दी फक्त पावसाळ्यातच नाही तर ३६५ दिवस गर्दी टिकून राहिली पाहिजे.

 

तुम्हाला आकर्षित करणाऱ्या सिंहगडाचा इतिहास -

 

सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते. स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कौडण्यऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा झाले. .. १३६० मध्ये दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलकाने दक्षिण स्वारी नंतर हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता.  शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला.  मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे  विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलीदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले . तेव्हापासून या गडाला सिंहगड असे म्हणू लागले अशी आख्यायिका आहे.

 

गडावरील हि ऐतिहासिक ठिकाणे आवर्जून पहा- 

 

अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध सुभेदार तानाजींचे स्मारक दिसते. राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे. झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढले होते. गडाच्या पश्चिमेस कल्याण दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. दारूचे कोठार अन टिळक बंगला.

 

-          सचिन कृष्णा तळे

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale