Tuesday, 9 July 2024

विशाळगड किल्ले खेळणा चा खरा इतिहास





" स्वराज्यात असलेल्या प्रत्येक गड किल्ल्याला प्रभू शिव छत्रपतींचा सहवास अन इतिहास लाभला आहे. प्रत्येक गडाची एक वेगळी कहाणी आहे. इथले गड किल्ले म्हणजे दगड मातीने उभारलेल्या भिंती नसून या सह्याद्रीच्या कुशीत राहणाऱ्या तमाम मराठी बांधवांचे श्रद्धास्थान आहेत. मुघलांनी बायका नाचवण्यासाठी महाल उभे केले पण आपल्या राजाने बायका वाचवण्यासाठी गड किल्ले उभारले. एकेकाळी आपल्या संरक्षणाची पूर्ण जवाबदारी या गड किल्ल्यांवर होती , आज याच गड किल्ल्यांची संरक्षण ची जवाबदारी आपली आहे हे विसरू नका. ज्याने आपल्या पूर्वजांचे रक्त काढले तो कसा काय तुमच्या ईच्छा पुर्ण करेल हा साधा विचार न करता आपलीच लोक कोंबड्या बकरीचे मटण खाण्यास विशाळगडावर जातात. पुर्वजांनी हा गड राखण्यासाठी रक्ताचे पाणी केले, प्रसंगी बलिदानही केले याची जाणीव महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना कधी होणार.  "

विशाळगड अर्थात किल्ले खेळणा गेल्या काही दिवसापांसून सतत चर्चेत आहेत कारण तिथे विस्तारित चाललेली मुघल सेनापती मलिक रेहान ची कबर जी आज हजरत पीर मलिक रेहान साहेब दर्गा ट्रस्ट नावाने आहे. हिंदूंना प्रिय असणाऱ्या देवस्थानावर उदारहणार्थ काळूबाई च्या डोंगरावर पशुहत्या बंदी असताना या विशाळगडावरील दर्ग्याला पशुहत्या ची परवानगी मिळाली. त्या दिवसापासून या दर्ग्याची चर्चा जास्त होऊ लागली. १४६९ साली बहामनी सुलतानाने त्याचा सेनापती मलिक रेहान याला खेळणा किल्ला घेण्यासाठी पाठविले. सहावेळा प्रयत्न करूनही त्याला हा किल्ला घेता आला नाही. सातव्या प्रयत्नात ९ महिन्याच्या निकराच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला घेता आला. याच  मलिक रेहानच्या नावाचा दर्गा या किल्ल्यावर आहे असे सांगितले जाते. विशाळगडाचा इतिहास पाहण्याआधी मलिक रेहान कोण होते ? आणि ते विशाळगडावर का आले ? हे तिथल्या मुस्लिम बांधवानी समजून घेणे गरजेचे आहे. आक्रमण करण्यासाठी आलेला सरदार हीच आमच्यासाठी त्या दर्ग्याची ओळख. या दर्ग्याच्या आसपास याच समाजातील लोकांची वाढत चाललेली अनधिकृत वस्ती अन दुकाने गडाची सुंदरता संपवण्याच्या मार्गावर आहे. गडावर छोट्या मोठ्या भरपूर अतिक्रमण केलेली खानावळी व हॉटेले असून तिथे पर्यटकांच्या आवडीप्रमाणे मासांहार जेवण उपलब्ध आहे इतकंच नाही तर मद्यपान देखील दिसून आले आहे.  

सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे. कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी हा किल्ला बांधला गेला. इ.स. ११९० च्या सुमारास दुसरा राजा भोज याने आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळ्यावर हलविली. त्यानंतर त्याने घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले. त्यापैकी 'किशागिला' हा एक किल्ला होता. किशीगीला – भोजगड – खिलगिला – खेळणा उर्फ आजचा विशाळगड. शिवरायांनी विशाळगडाच्या मजबूतीकरिता ५००० होन खर्च केल्याचा उल्लेख आहे.  

विशाळगडाची उभारणी इ.स. १०५८मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. हा गड किल्ले खेळणा या नावाने देखील ओळखला जात होता. 

२८ नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव ‘विशाळगड’ ठेवले.   

३ मार्च १६६०ला सिद्दी जौहारने पन्हाळ्याला वेढा घातला. त्याचवेळी जसवंतराव दळवी व शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे विशाळगडाला वेढा घालून बसले होते. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे जाताना महाराजांनी हा वेढा फोडून काढला व महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. त्याआधी पावनखिंडीत ३०० निवडक मावळ्यांसह बाजीप्रभूंनी सिद्दीचे सैन्य रोखून धरले व आपल्या प्राणांची आहुती दिली. 

इ.स. १६८९ मध्ये संभाजी महाराज विशाळगडावरून रायगडाकडे जातांना संगमेश्वर येथे तुळापूरी पकडले गेले व त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर राजाराम महाराजांच्या काळात विशाळगड मराठ्यांच्या हालचालींचे प्रमुख केंद्र होता. 

१७०१ साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या. 

इ.स. १७०७ मध्ये ताराराणीने विशाळगड पुन्हा जिंकून घेतला. पुढे विशाळगड करवीरकरांच्या ताब्यात गेला. पण १८४४ साली इंग्रजांनी आपला विशाळगड जिंकून त्यावरील बांधकामे पाडून टाकली.

विशाळगडावर पाहण्यासारखे ठिकाण - 

एस.टी. किंवा खाजगी वाहनाने विशाळगडासमोरील वाहनतळावर उतरल्यावर, वाहनतळात व विशाळगडामध्ये एक दरी दिसते. पूर्वी या दरीत उतरुनच विशाळगडावर जावे लागत असे. परंतु आता या दरीवर लोखंडी पूल बांधलेला आहे. शिडीच्या वाटेने चढल्यावर दर्ग्याच्या अलीकडे डाव्या हाताला एक पायऱ्यांची वाट खाली उतरते. या वाटेने गेल्यावर दोन रस्ते फुटतात. उजव्या बाजूची नव्या पायऱ्यांची वाट भगवंतेश्वर मंदिर / राजवाडा / टकमक टोक येथे जाते. तर डाव्या हाताची जुनी फरसबंदी दगडांची वाट अमृतेश्वर मंदिर / बाजीप्रभुंची समाधी येथे जाते. अमृतेश्वर मंदिरापाशी कड्यावरून पडणारे पाणी साठी कुंड आहे. मंदिरात पंचाननाची मूर्ती आहे. मंदिरावरून तसेच पुढे जाऊन पाताळदरीत खाली उतरावे. या ठिकाणी एक ओढा आहे. या ओढ्याच्या पलीकडे उघड्यावर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे यांच्या समाध्या आहेत. या समाध्या पाहून उजव्या बाजूच्या टेकडीवर असलेले हनुमान मंदिर पाहावे. या ठिकाणी भगवंतेश्वर मंदिर, विठ्ठलाचे मंदिर व नवीन बांधलेले गणपतीचे मंदिर अशी तीन मंदिरे आहेत. भगवंतेश्वर मंदिरातील कासव पाहाण्यासारखे आहे. या कासवापुढील देव्हाऱ्याकडील पायरीवर मोडीलिपीमध्ये शिलालेख कोरलेला आहे. त्यावरील ‘आबाजी जाधव शके१७०१, विशाळगड’ ही अक्षरे वाचता येतात. मंदिरात ब्रम्हदेवाची मूर्ती आहे. वाटेत एका चौथऱ्यावर दगडात राजाराम महाराजांची कोरलेली दोन पावले दिसतात. तेथे त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई यांची समाधी आहे. या शिवाय गडावर घोड्याच्या टापा, मुचकुंदाच्या गुहा, सती, तास टेकडी इत्यादी ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत.

@सचिन कृष्णा तळे 
Sachin Jayshree Krishna Tale

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale