Wednesday, 24 August 2022

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी

 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी   



 

देशाच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी प्रत्येक भारतीय तरुणांमध्ये आहे. देशाचे संरक्षण करण्याबरोबरच एक अत्युच्च प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यदलांत म्हणजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे…!!! संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून आहेत. भारतीय संरक्षण दल हे देखील वेळोवेळी आपल्या देशातील तरुणांना लष्करी अधिकारी होण्याची संधी देत असतात.  अशीच आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त असलेली संस्था म्हणजे  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीम्हणजेच “National Defence Academy (NDA) / एन.डी..”

 

हि सैनिकी प्रशिक्षण देणारी भारतातील एक महत्त्वाची संस्था. कमिशन-पूर्व प्रशिक्षणासाठी संबंधित अकादम्यांमध्ये पाठवण्याअगोदर भूदल, वायुदल नौदल या तिन्ही दलांसाठी या प्रबोधिनीत संयुक्त प्रशिक्षण दिले जाते. १९५४ साली प्रबोधिनीची स्थापना झाली. दुसऱ्या जागतिक महायुद्धात तीनही सेनाविभागाचे परस्परांशी सहकार्य हे अत्यावश्यक आहे, ही गोष्ट लक्षात आली होती. म्हणूनच स्वतंत्र भारतातही अशा प्रकारच्या संयुक्त सैनिकी शिक्षणसंस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. पुण्यातील खडकवासल्यापासून समुद्र फार लांब नाही पुण्यात हवाई दलाचा तळ आहे, म्हणून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी खडकवासल्याची निवड करण्यात आली. ऑक्टोबर १९४९ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासल्याच्या वास्तूची पायाभरणी झाली. १६ जानेवारी १९५५ रोजी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे उद्घाटन केले.

 

या प्रबोधिनीत कमांडंट, लेफ्टनंट जनरल अथवा तत्सम हुद्याचे अधिकारी असतात पाळीपाळीने तीनही सेनाविभागांतून ते निवडले जातात.१६ ते १८ / वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपरीक्षा मे डिसेंबरमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दर दोन वर्षांनी घेण्यात येतात त्यांतून निवडलेले विद्यार्थी निवड मंडळापुढे चाचणीला जातात. वैद्यकीय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची गुणक्रमांनुसार यादी तयार करण्यात येते त्यांतील पहिल्या ३३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. छात्रांचा शिक्षणाचा आणि भोजननिवासाचा खर्च सरकारमार्फत करण्यात येतो. शालेय शिक्षणक्रमाव्यतिरिक शिस्त, नेतृत्व लष्करी शिक्षण यांचा अभ्यासक्रमात समावेश असतो. तीन वर्षांनंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातर्फे बी. . अथवा बी. एस्सी. पदवी देण्यात येते.  सेवा परमो धर्म:’ हे बोधवाक्य घेऊन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी तरुणांना राष्ट्र सेवेची संधी देत आली आहे. ह्या संस्थेचे नाव प्रथम नॅशनल वॉर अकॅडेमी ठेवावे असे ठरले होते.

 

सचिन कृष्णा तळे

Tuesday, 16 August 2022

सावरकर साहित्य संमेलन

 

सावरकर साहित्य संमेलन




 

जयोस्तुते हे स्वातंत्र्य देवतेचं एकमेव स्तोत्र ज्यांना स्फुरलं ते स्वातंत्र्यवीर सावरकर, ने मजसी ने परत मातृभूमीला हे अजरामर महाकाव्य लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, अंदमानात कागद-लेखणी दिली नाही तरी भिंतीचा कागद आणि काट्या-खिळ्यांची लेखणी करून साहित्य सेवा करणारे एकमेव साहित्यिक सावरकर, महाकाव्य म्हणजे काय हे कळायचं वय नसताना महाकाव्य लिहिण्याची आकांक्षा ठेऊन ती पूर्णत्वास नेणारे महाकवी सावरकर, आपली लेखणी तलवारीसारखी चालवून ब्रिटिशांना त्रस्त करणारे वीर सावरकर, ज्यांच्या मॅझिनीच्या पुस्तकाच्या 25-26 पानी प्रस्तावनेलाच गीतेचा मान मिळाला ते सावरकर.

 

अनेक सावरकरप्रेमी एकत्र येतात आणि एक सावरकर साहित्य संमेलन भरवतात. त्यामुळे भारतात आणि भारताच्या बाहेरही अनेक सावरकर साहित्य संमेलने होतात. आपली लेखणी खड्गासारखी चालवणाऱ्या सावरकरांनी जेव्हा राष्ट्राला आवश्यकता होती, तेव्हा साहित्यिकांना लेखण्या मोडून बंदुका हाती घ्यायला सांगितलं. राष्ट्रसंरक्षणार्थ प्रथम रायफल क्लबात घुसा, रडगाण्यांच्या नि रडकथांच्या साहित्य संमेलनात नंतर अशी हाक देणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव असलेली काही साहित्य संमेलने भारावली गेलीत.

 

- सावरकर सेवा संस्था आणि सावरकर मित्र मंडळ यांनी भरवलेले पहिले सावरकर विश्व संमेलन मॉरिशसमध्ये भरले होते तर दुसरे दुबई मध्ये.

- काठमांडू (नेपाळ) मध्ये तिसरे सावरकर मराठी विश् साहित्य संमेलन ११--२०१३ रोजी भरले होते.

- अंदमानच्या इतिहासात शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीने पहिले सावरकर मराठी साहित्य संमेलन भरवले गेले तर दुसरे साहित्य संमेलन १० फेब्रुवारी २०१२ रोजी श्रीलंकेत भरले होते.

- स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यासमंडळ, मुंबईतर्फे दरवर्षी  सावरकरी विचारांचे साहित्य संमेलनं भरवण्यात येते.

- २०१७ साली ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये वीर सावरकर विश्व साहित्य संमेलन झाले होते.

- स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ आणि कल्याण विकास फाऊंडेशनतर्फे कल्याणच्या कॅ. . मा. ओक विद्यालयात २२ डिसेंबर २०१९ रोजी 'अखिल भारतीय' सावरकर साहित्य संमेलन झाले.

-  महाराष्ट राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई आणि धुळे एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथे फेब्रुवारी २०१९ रोजी एक अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन झाले.

-  स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मित्रमंडळ (औरंगाबाद) यांच्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलन भगूर येथे झाले.

- स्वातंत्र्यवीर सावकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई) स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठान (मुंबई) यांच्या सहकार्याने सावरकर साहित्य संमेलन रत्नागिरी येथे २९-३०-३१ जानेवारी २०१६ या काळात झाले.

सचिन कृष्णा तळे

Wednesday, 10 August 2022

कुसुमाग्रज प्रतिष्ठान - ग्रंथ तुमच्या दारी

 



 

जे चांगले ते वाचलेच पाहिजे, पण त्यासाठी चांगले साहित्य, ग्रंथ, वेगवेळ्या विषयावरील पुस्तके हे तुमच्या हातात हवी. अनेकांना वाचनाची आवड असते पण ती सगळी पुस्तक विकत घेणे शक्य नसते. अश्यावेळी आपण ग्रंथालय ची वाट धरतो. वाचनालय च्या शोधात निघतो. वाचनालय आपल्या घरा शेजारी असेल तर ठीक नाही तर कंटाळा करतो. यावरून  कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नाशिक या संस्थेचे विश्वस्त श्री. विनायक रानडे याना एक कल्पना सुचली . वाचक जर पुस्तकांपर्यंत पोहचू शकत नसेल तर पुस्तकांनी वाचकांपर्यंत पोहचायला हवे यातूनच  २००९ रोजी " ग्रंथ तुमच्या दारी " हि योजना अस्तित्वात आली आणि बघता बघता देश विदेशात पोहचली.

वाचकांना त्यांच्या घराजवळ उत्तम वाचनीय पुस्तके उपलब्ध करून देण्याचा हट्ट रानडे ह्यांनी धरला. या उपक्रमांतर्गत वाचनालयापासून लांब राहणार्‍या ३५ वाचकांच्या गटाला १०० मराठी दर्जेदार पुस्तकांची ग्रंथपेटी निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आले. हा ग्रंथपेट्यांचा विस्तार वाढत गेला आणि आज सुमारे १७०० हुन अधिक पेट्या ह्या असंख्य वाचकांपर्यंत पोहचल्या. विदेशातल्या मराठी माणसांसाठी आपल्या आवडत्या साहित्यिकांची ग्रंथ संपदा उपलब्ध व्हावी, अशी विनंती महाराष्ट्र मंडळ नेदरलँड् ह्यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या वाचनालय समिती कडे केली आणि प्रत्येकी २५ पुस्तके असलेल्या १२ पेट्या नेदरलँड्समधील मराठी वाचकांना मिळाली. निवासी भागाबरोबरच छोट्या औद्योगिक कंपन्या, दवाखाने, पोलीस स्थानक, वनवासी पाडे, इतकेच काय कारागृहातसुद्धा ग्रंथपेट्या आजवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्याबाहेरील गुजरात, तामिळनाडू, दिल्ली, सिल्व्हासा, कर्नाटक येथील मराठी वाचकांनादेखील या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात आली. सातासमुद्रापार या योजनेचा विस्तार होऊ लागला दुबई, यूएई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, फिनलँड, वॉशिंग्टन डीसी, कॅलिफोर्निया, ओमान, मॉरिशस, सिंगापूर येथील मराठी वाचकांसाठी दीड हजारहून जास्त ग्रंथपेट्यांद्वारे अंदाजे २ कोटीहून जास्त मूल्य असलेली १ लाखहून अधिक पुस्तके उपलब्ध झाली. दृष्टीबाधित विद्यार्थ्यांच्या ६५ शाळांत १०० बोलक्या पुस्तकांची एक पेटी याप्रमाणे वितरण सुरू आहे.

जगभरात जिथे मराठी शब्द आहे, जिथे मराठी भाषा आहे, जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे हि योजना जावी यासाठी रानडे सर प्रयन्त करत असतात. रानडे सर म्हणतात कि प्रिंटेड पुस्तके वाचून जो आनंद मिळतो तो इ पुस्तकात नाही. प्रिंटेड पुस्तके हे जास्त परिणाम कारक असतात. १९९० मध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठान अंतर्गत सुरु झालेली हि वाचन चळवळ आज खऱ्या अर्थाने लोकप्रिय ठरत आहे. अनेक माध्यमातून ह्या चळवळीची अन रानडे सरांची दखल घेतली गेली आहे.

 

सचिन कृष्णा तळे

 

Thursday, 4 August 2022

पुस्तकांचं गाव

 


२७ फेब्रुवारी, २०१५ रोजी महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा सांस्कृतिक मंत्री मा. श्री. विनोद तावडे यांनी भाषा गौरव दिनाच्या सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना इंग्लंडमधीलहे ऑन वेया पुस्तकाच्या गावाचा संदर्भ देऊन, महाराष्ट्रातही असेपुस्तकांचं गावनक्की आकाराला येऊ शकेल, असा विचार मांडला. दिनांक मे, २०१७ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देशातील या पहिल्या पुस्तकांच्या गावाचे लोकार्पण भिलार, ता. महाबळेश्वर येथे करण्यात आले. भिलार ह्या गावाची निवड करताना ह्या बाबी सरकारने लक्ष्यात घेतल्या त्या म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जास्तीत जास्त पर्यटकांची वर्दळ असणारे त्या ठिकाणाजवळचे गाव असावे, तसेच पर्यटकांसाठी राहण्याची/जेवणाची किमान सोय असणारे गाव असावे, तंटाबंदी, दारुबंदी, स्वच्छता आणि पर्यटनविषयक विविध शासकीय योजनांमध्ये अग्रेसर असलेले गाव असावे.

 

पुस्तकांचे वर्गीकरण झाल्यानंतर विविध साहित्याचा पुरवठा झाल्यानंतर प्रकल्पात सहभागी घरे सार्वजनिक ठिकाणे येथे साहित्यप्रकारनिहाय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी अत्यंत कल्पकतेने आणि अभिनव पद्धतीने पुस्तकांची मांडणी करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी सुमारे ३५० ते ७०० अशा संख्येने पुस्तके ठेवण्यात आली. प्रथम टप्प्यात एकूण १५,००० पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आली. या प्रकल्पात २५ ठिकाणचे ग्रंथालयात रुपांतर करण्यात आले. अशा प्रकारे संपूर्ण गावाचेच एका मोठ्या सार्वजनिक ग्रंथालयात रुपांतर झाले आहे. प्रकल्पात सहभागी झालेल्या घरे किंवा सार्वजनिक ठिकाणी शासनाकडून पुस्तके ठेवण्यासाठी कपाटे, पुस्तकाचे फिरते स्टँड, टेबल, खुर्च्या, टिपॉय, बोधचिन्ह असलेली छत्री, बीन बॅग, नोंदवही, अभिप्राय वही, घरांवरील पाटी, घरांबाहेरील दिशादर्शक पाटी अशा विविध पूरक साहित्याचा पुरवठा करण्यात आला.

 

नामवंत लेखक, प्राध्यापक, ग्रंथपाल इत्यांदीचा समावेश असलेल्या पुस्तक निवड समितीने पुस्तकांची निवड करण्यासाठी वेळोवळी बैठका घेतल्या. बैठकांमध्ये उपलब्ध प्रकाशन सूच्यांच्या आधारे पुस्तके निवडण्यात आली. प्रत्यक्ष पुस्तके पाहिल्यानंतर अधिक नेमक्या आणि व्यापक पद्धतीने पुस्तक निवड होऊ शकते, हे लक्षात घेऊन थेट निवडक प्रकाशकांकडे जाऊन पुस्तकांची निवड करण्यात आली.कथा, कादंबरी, कविता, चरित्र-आत्मचरित्र अशा रूढ साहित्यप्रकारांसोबतच विज्ञान, क्रीडा, नियतकालिके, विविध कलांविषयक, परिवर्तन चळवळ, निसर्ग-पर्यटन-पर्यावरण, दिवाळी अंक, लोकसाहित्य, मराठी भाषा संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवकालीन इतिहास अशा वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारांची विविध घरांत मेजवानी आहे. ह्या प्रकल्पातील काही सहभागी घरांमध्ये आणि गावात इतरत्रही निवास भोजनाची सशुल्क व्यवस्था उपलब्ध आहे. डॉ. .पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. हेच औचित्य साधून पुस्तकांचं गाव, भिलार येथे शनिवार दि. १२ रविवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी वाचनध्यास या एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


सचिन कृष्णा तळे



“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale